Tuesday, 2 January 2018

फक्त दगड त्यांचे होते! फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती


फक्त दगड त्यांचे होते!  फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती

सड्कि डोकी जरा शांत ठेवा! किती दिवस इतिहासावर दगड मारणार!

विचाराचा इतिहास शिकवणाऱ्या महापुरुषानी जाती वादांची बंधने  झुगारून  निकोप  समाज निर्मिती  साठी  दिलेलं  बलिदान आज आम्ही  विसरलो अहोत  काय?

बुरसटलेल्या मेंदू वाल्याच्या सडक्या डोक्यांन  पुण्याच्या शांतंतेत  मीठ टाकलं विध्वंसक मानसिक तेणें  पुन्हा  बहुजनांच्या पोरांना तोफेचा गोळा  करुन ठिणगी पेटवली खऱ्या इतिहासावर दगड मारून तो  काय पुसला जाणार  होता का मात्रं किळस वाना त्यांचा प्रयत्न होता यानं आमचं खुप मोठं नुकसान  झालं ओ जाती च्या मोर्चा ने निर्माण  झालेली  दरी  आणि दुरावले मन विसरून  माणूस कसा बसा एक येत होता त्या ऐकतेला खिंडार पाडन्याचे शड्डयंत्र रचल गेलं  आणि  त्यात आमची  पोरं भरडली  गेली हातात  दगड दिली बसले तमाशा पाहात! फक्तं दगड  त्यांचे  होते!  फेकणारे हात  आणि  फुटणारी  डोकी आमच्याच बांधावाची होती! कायदा  हातांत घेतो तेव्हा कायद्यांच्या  कचाट्यात अडकनारे पण आमच्याचं समाजातील  कोणाचे नातेवाईक नक्कीच  असणार  त्यांचं  भविष्य काय ? कुटुंबाचं काय? का  फक्तं --बदला आणि सूड ज्याला बुड टेकवायची  अक्कल नाही त्यांला सूडाच्या मागचं गूढ राजकारण काय कळणार! इंग्रज  गेले पण  200 वर्षा नंतर भेद  नीती तशीच आहे तोडाफोंडा आणि राज्य करा. काय?  डोकी गहाण ठेवल्यागत वर्तन  सुरू आहे.इशाऱ्यावर नाचणारी आणि शिकवलेलं बोलणारी पीड़ित पिढी निर्माण होते हेच दुर्दैव. यातच  जातीवाद आणि समाज कारणाचे  अर्ध हळकुंड उगाळून पीलेली काही भगवी  झालित तर  काही निळी पिवळी पडली आहेत.हीच ब्याद तर मुळांवर आलीय.वैचारिक लढा उभारुन प्रश्न सोडवन्यपेक्षा खऱ्या खोट्या भूतकाळावर आज युद्ध सुरू आहे. हे  अतिशय चूक आहे. या  विघ्नसंतोशी व्रतीच्या मुसक्या आज  ना उद्या आवळ्या जाणारच आहेत.

 
गुण्या गोविंदा ने हातात हात घालुन ताटाला ताट नाही  तर ताठ माने ने ताटात जेवण करणारी आमच्या पिढी ची घडी बिघडवू पाहणाऱ्यां शन्ड लोकांची तोंड पाहायची इच्छा नाहीए!  शिकणाऱ्या लोकांची डोकी जास्त भडकतात का? चूक  बरोबर  खरं  खोटं  याची  चिकित्सा  सोडा  पण  शहानिशा पण  करायचं  सोडून  बेताल सोशल मीडिया वर  स्वार व्हायला तयार  होतातच कसे ? वाईट वाटत ज्यांच्यात आपण  वावरतोय  त्यांच्यावर  दगड  कसाचं  उचलला  जातो  घटनां भीमा कोरेगाव ची निंदनीय आहे निषेध आणि  फक्तं निषेध हेच प्रत्येकाचे उत्तर आहे  पण आज  महाराष्ट्रातील गावा गावांत विश्वासा च्या भिंतीचे अंतर आता भीती वर पोचले विश्वासाला तडा जायची वेळ नाही तर परिस्थीती निर्माण झाली!शहरात भागत ओ  कर्फ्यू लावून. आठवड्याचं नियोजन असतं आणि  पर्याय  ही असत्यात. गावांत काय करणार पोट भरण्यासाठी आज ही रोजंदारीवर जावं लागत तेव्हा चूल पेटती त्यात तुमच्या असल्या दगड  फेकीने आमची संस्कृती उध्वस्त होती. या च्या  परिणामांचा कधी  विचार  होणार  आहे  का ? पुन्हा मुहल्ले नगर आणि वाड्यात विभाजन करायचं ! रोज  एक मेका ची तोंड पाहणं चुकणार आहे का ! नाही  ना  मग  गरम  डोकं  जरा  शांत  ठेवा ! बाबासाहेबाची लोकशाही आणि संविधान  तुमच्या सोबत  आहे  ना ! जगाला  शांतता काय असते  हे  शिकवणारे  आमचे आदर्श युगपुरुष बुध्द आमच्य बुद्धीत आहेत का ? फक्तं  फोटो पुरतेचं यांचाही विचार होणं गरजेचं आहे!

कालची घोषणा ऐकली आणि वाईट  वाटलं नमो तस् भगवतो अर्हतो-- या  प्रार्थनेचा वेगळाचं  वापर केला यातचं बुद्ध नको  युद्ध हवं हा  सूर तरुणाई आळवत  होती! ही  धोक्याची  पूर्व घंटा आहे कां याचा  विचार  हिं  व्हायलाच हवा.समाज जीवनाचे खरे तत्व माणुसकी आम्ही  विसरत अहोत.जातीवाद पुन्हा प्यारा वाटू लागलाय इथे माफ करा बाबा मात्र आम्ही  चुकतोय हे कळत असूनही वळत नाही! उचलेला  दगड जशी जात विचारत नाही तो  त्याच  काम करतो तसं फूटनारी काच कितेक तुकड्यांत विभागतें तिच्या नुकसानीचं मोल लावता येत! कदाचीत त्याची  किंमत  कमी जास्त  असेल ही  मात्र  समाज मनाच्या -हदयाला पडलेली  चिर तीच काय? यांचा  विचार करा.हात जोडून विनंती.

मूठभर लोक सुशिक्षित झालेत त्यांचं सोडा खंडीभर  तसेच आहेत.भाकरी चा प्रश्न  तसाच आहे.आकाशाचं पांघरूण करुन  कुडकुडत पडलेली कुटुंब यांचे प्रश्न? कुपोषण?  झोपडपट्टीची व्यथा? शेतकरी आत्महत्या! दहशदवाद? नक्षलवाद? याचा  कधी  विचार  केला  का? दोस्ता हो!


आमची बुध्द शिव शाहू फुले आंबेडकराची लेकर जाती वादांची भाषा बोलायला लागले आपलं तूपलं  याही पेक्षा मप्लंची ची संकुचित शिकवन नडत आहे.असेच किती दिवस विष प्रयोग करणार यानं कुणाचं  बरं झालं आणि  पदरात काय पडलं  याचं ही उत्तर  शोधा. गरीबांची लेकरं दमडी कमवायचे सोडून आयुष्यं गमवायची भाषा करतात अन् पिसाळलेल्या गत बुद्धी भ्रष्ट होवुन कुणाच्याही मागे धावतात हातात पदरात  काहीचं  मिळतही  नाही  आणि  काय  करतो ते  कळत देखील  नाही अशा वेळी  कोण  जिंकतो ? कोण हरतो? या  पेक्षा समाजा ची पार वाट लागते पिढी बर्बाद होते. या क्षणांची  वाट पाहातोय का ? डोकं ठिकान्यवर ठेवा! न्याय व्यवस्था ; कायदा आणि  राज्यघटना या वर विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या  संकल्पानेतूंन  साकारलेल्या खऱ्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.

नसता बिघडल्यागत  असेच किती दिवस इतिहासावर दगड मारणार ! सड्कि डोकी जरा शांत ठेवा!



सुरेश जाधव
9404204008

Thursday, 21 September 2017

ठसाची" चेष्टा,कर्ज माफ़ी चे गाजर

ठशाची" चेष्टा,कर्ज माफ़ी चे गाजर किती हाडभाड़ घेणार,
----
बाळा माझे ठसे उमटत नाहीत रे ,सात दिसा पासून चकरा मारते "माय"---ते आधार कार्ड मागत हाईत,मह्य नवर्याच्या नावावर 40 हजार कर्ज हाय,-- "त्याचे" ठसे उमटले "माय" पण भांडी घासुन अन् पाण्यात काम करून माझे हात उंगळलें की काय?म्हहे उमटू नाय राहिले, तू तरी सांग बावीस तारखी पत्तूर उमटतिल का?




साठीपार करून सत्तरीच्या उमबरठ्यर असेलेल वयोवृद्ध म्हाताऱ्य आज्जी चा हा प्रश्न येकुण धस्स झाल, काठीचा "आधार" घेवुन निराधार जीवन व्यतीत करणाऱ्याला "आधार" च्या रांगेत उभाकरून  छळ चालू केलाय,अख्ही हयात कष्ट उपसुण-- हातचे कातडे निर्जीव चामडे झाले ,कित्तेक वेदने चे फोड़ संवेदना हरवल्या गत याच तळहातावर जिरुन गेले, चटणी मिटाचा मलम लावून,भाग्यरेषा न शोधता आयुष्य रेषा ओलांडणाऱ्या या लोकांना आज रांगेत उभा पाहिले आणि वाईट वाटल,

प्रत्येक बँके समोर च वास्तव खूप भयंकर आहे,यात" सेतु सुविधा केंद्र आणि आपल सरकार" यासर्व ठिकाणी कर्ज माफ़ी साठी रांगेत उभी नाहीतर आडवी झालेली मानस फक्त आशेने उभीआहेत ,यात नेट प्रॉब्लेम, लाईट अडचण,त्यात सर्वर जाम,आणि नंतर आधार मधील बोट यासगळ्याअडचणीचा सामना करत गावापासून बीड पर्यतचे 15 कीमी अंतर कापून आठ दिवस चक्रा मारणार्या याआज्जी आजोबाचे काय चुकलं वो-- बीड तहसीलच्या समोर आधार दूरूति केंद्राच्या रांगेत झाडाखाली बसलेले कुटुंब--- तोंडावर सुर्कुत्य पड्लेल्या आणि थोडा काळजी वजा खिन्न चेहरा,हातात कागद हिरव लुगडे आणि डोक्यावर पदर घेवुन नंबर येण्याच्या प्रतिक्षेत बसलेल्या आजी आणि ताटकळत उभा राहून वैतागून आडवा झालेला त्या म्हातारी चा म्हातारा , मळकट फडक्यत बांधून आणलेली भाकरी,अन् येण्या जाण्याचा होशोब करणारी आणखी काही अनपढ़ मानस, येकर दोन एकर चे मालक पण पूर्ति पंचायत करून टाकली ,आठदिवस चक्रा मारून आधार ने अडवले, शेवटी ठश्याच्या दुरुस्ती न झाल्याने हे कुटुंब पुरते वैतागून गेलय --

गावातिल प्रत्येकजण सुशिक्षित आहे या अवीर्भावाने कर्ज माफ़ी चा फॉम दीड मिनिटात भरन्याचा दावा  मुख्यमंत्री साहेब करत आहेत,एसी च्या खोलीत, बदामचा शिरा तुंप टाकून गँसवर करून खावू घालनाऱ्या तुमच्या मँडमच्या बोटाचे ठसे बघून तुघलकी निर्णय घेतायराव,बाँधावरच कष्ट करून हातावर कूट रेषा राहतात का? जरा ईचार करा दमडी भर कर्जा साठीचामड़ी ची अट कशाला लावता,तिकडे गोर्या कातड्याच्या लोकांसनी विनाअट न मांगता कोट्यावधी देताराव,हा कातड्याचा दोष की सड़क्या मेंदूचा सांगा तरी, साहेब वाटत होत आमच जगण भी आपल्याला मान्य हाय पण ते सपशेल खोट ठरले! शेवटी तुम्ही तुमच्या बेभरवंशाच्या जातीवर आले,
आणि शेतकरी बोगस आहे , त्याच कष्ट नाटक आहे म्हणू लागले,बाप म्हातारा झाला म्हणून त्याच्या कामाच माप काढुण आईच्या कष्टाचा लिलाव करण थांबवा ! जरा लाई लावून वाईन पीनारे कधी पाहिलेत का? डोक जागावर ठेवुन सर्वा समक्ष कर्ज माफ़ी चा विठ्ठलाला दिलेला शब्द पाळा!

काय पोरखेळ लावलाय,अशा किती रांगा लावून आमची वाट लावताय हा भाबडा प्रश्न शेतकरी विचारतोय, त्यात तुमचे मंत्री10 लाख बोगस शेतकरी असल्याचा जावई शोध लावून जखमेवर मीठ चोळण्यचा प्रयत्न करत आहेत,मग साधा प्रश् पडतो सर्व हिशोब ठोकताळे आणि याद्या तुमच्या हातात आहेत, आधार बँक आणि पॅनकार्ड सगळा डेटा तुमाच्या घशातआहे मग रिकाम आमच्या लोकाची धावपळ का करताय लाज वाटू द्या जरा? शेतकर्या च्या घामाची कदर ,कष्टाचा आदर नसेल तर ही गाजर कर्ज माफ़ी देवून पाने कशाला पुसता त्या लोकांना तुम्ही रांगेत उभा करत,सनासुदिचे दिवस यातच आजारी,किती हाडभाड़ घेणार

हे वास्तव आहे कर्ज माफ़ी च्या गाजराच, आधार लिंक केल्यावर परत पुन्हा बोटाचे  ठसे उमटत नाहीत तर आधार च्या डेटा सुरक्षित ठेवण्यची जबाबदारी कुणाची , एक दोन बाबतीत ठीक आहे पण गावातील 100- कुठे 200 लोकांची बोट उमटत नसतीलतर विचार करावा लागेल. तुमच्या अपयशाचे खापर सामान्य गौरगरीब  शेतकरी अडाणी,वयोवृद्ध, लोकांवर नका लादू--- ज्याला बोट नाहीत त्याला ही संविधानाने जगण्याचा आधिकार दिलाय तो हिरावून घेतय का? तसा बोटाचा इतिहास आणि अंगटयाचा पराक्रम "हाताने" पहिलाय. तस बोट धरून चालायला शिकवणारे आणखी आहेत, लोकांना बोट धरून वाट लावायला वेळ लागणार!

शेतकरीपुत्र- सुरेश जाधव महाराष्ट्र1 प्रतिनिधी बीड
मो-9404204008

Sunday, 18 June 2017

"लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"

सुरेश जाधव ,महाराष्ट्र 1 प्रतिनिधी



लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"माझ्या बापाच नाव लक्ष्मणराव जाधव , गावात प्रत्येक व्यक्ति मला हा जाधवाच्या लक्ष्मण चा पोरगा म्हणूनच ओळख ,तसा लहान पणी मी खूप हट्टी ,आणि हेकेखोर् असायचो ,एखादी गोष्ट नाय मिळाली कि भांडण करायचो, मग लगेच प्रेमाने जवळ घेवुन "भाऊ "(भावंडया) ही प्रेमळ हाक आली कि समजावं आपला हट्ट हक्काने पूर्ण होणार, आमच्या कडे आठवडी बाजार नेकनूर चा त्या दिवशी मात्र डोळे बाजार च्या पिशवी वर असायची ,मग दिवसभर उनड्कि करून दिवस मावळताना बाप बाजार घेवुन येणार याची आठवण व्हायची मग गावच्या सूतारनेटावर , वाट पहात बसायचे ,प्रत्येक टमटम ( रिक्षा ) आला कि पळत जायच ,पण नाय दिसला कि परत फिरायचे , "बापू "आले बापू आले अस ओरडत घराकडे पळायचौ.मग पहीला ताबा पिशवीवर मिळवण्यासाठी आमच्या भावंडात झंगड पकड़ व्हायची ,-----!
प्रत्येकच्या आवडी निवडीसाठी रात्र दिवस काम करणारा बापू माझा आदर्श आहे ,आजही मला चांगल आठवते ,मळकट शर्ट आणि पँट वर ढोरा सारख राबन,काबाड़ कष्ट आणि घामाचे पाट हे फक्त आमच्या साठीच होत,आजही ते सुरूच आहे ,शिक्षणा बाबतीत खूप आग्रही ,कारण त्या काळात 7 वी फस् क्लास पास झालेला,बापू फक्त महया "आज्या"च्या शब्दा खातर नौकरी सोडून शेती पत्करली होती,कारण माझ्या आई वडील यांना इथे कोण सोबती नाय म्हणून नौकरी वर पाणी सोडल हुत,बापू नं ----या निर्णयाबाबतीत आम्ही बऱ्याच वेळी तक्रार केली पण या गोष्टी चा पच्छाताप त्याना नाय,उलट स्वाभीमान आहे ,सुख आल तर हुरळून जावु नये आणि दुःख आल तर खचूनही जावु नये ,हे खुप मोठ "बापकडू"मला मिळाले ,तर माझी आई "आकां" बापु सोबत,खाँद्याला खादा लावून आज तागायत सोबत आहे ,सर्व काम तीला येत नांगरने ,पेरने ,येव्हडे च काय तर बैल गाडी ,असो पुरूषी काम पण कसबाने करते ,पण तीचं नेहमी सांगन ,"रिनकाडून संन नको " अर्धी भाकरी सुखची
आज मी याच छायेत घडत आहे,कित्तेक वेळी पाण्या अभावी  पीक जळत असता खिन्न मनाने बसलेला बाप मी पहीलाय ,अर्ध्या रात्री अर्धे तुकडे भिजवुण होईल म्हणून लाईट ची वाट पहात डोळ्यावर् रात काढनारा बापू ,बाजारात घेवुन गेलेल्य मालाच पैसे आले कि स्वप्न पूर्ण करणार अस आश्वासन पूर्ण करण्या साठी ची धडपड़ पहिली ,त्याच्या ऋणात आणि त्याच प्रेमात न्हाऊ निघन मला आवडत ,आज माझा" बापु" 60 वर्षाचा आहे .माझ्या पाठीवर् प्रेमाचा आणि आधाराचा हात आणि मायेची सावली मला कसलेच ऊन लागू देत नाय ,

बापू च्या डोळ्यातले  ते आनंद अश्रू मी कस विसरेल ,त्यांची इच्छा मी गावात कीर्तन कराव ,तेही वजनात ,ती इच्छा पाँच वर्षा पूर्वीच पूर्ण झाली,सप्ताहात पत्रिकेत नाव टाकल होत, कीर्तनात फेटा बाधुन उभा राहिलो तेव्हा बापू ची बेचैन अवस्था ,कस होत आणि कस नाही हे माझ्या पेक्षा त्याना टेन्शन होत,कीर्तन एकदाच झाल सगळे खुष झाले ,बऱ्याच जणांनी बक्षीसही दिले पण त्याच वेळी बापू ला कोण्ही तरी म्हटलं एकच नंबर् कीर्तन झाल ,तेव्हा खळकण पाणी आल ते सार्थक झाल्याच आणि क्रतर्थ झाल्याची पावतीच मिळाली ,

शेवटी बाप तेव बाप,शब्दात कस सांगू

आज फादर्स डे ! माझ्या "बापू"सह सर्वाच्या बापाला हार्दिक शुभेच्छा !

Monday, 22 August 2016

गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :- कारखेल ची व्यथा !



गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :-
कारखेल ची व्यथा ! लग्नाच्या वयातल्या पोरांच्या बापाला घोर

तुमच्या गावाला रस्ता नाही ,नको बाबा पोरगी द्यायाची! सात किलो मीटर डोंगर तुडवित यायचे कि काय?असा सवाल मुलींचे बाप करत आहेत .म्हणूनच कि काय कारखेलगावातील  जवळ पास  दीडशे वयात आलेल्या पोरांची शुभ मंगल राहिलीत. गावाला रस्ता नाही म्हणून या  गांवात कोणी मुलगी द्यायला तयार नाही मूलभूत सुविधा पासून कोसो दूर असलेल्या कारखेल गाव ची व्यथा खरंचभयानक  आहे.बातमी बनवण्यासाठी मी कारखेल ला जायला निघालो तर तो अविस्मरणीय रटाळ वाना प्रवास मलाही करावा लागला म्हणुनच  त्यां गावकरर्याचे आणि पोरी न देणार्या बापाचा निर्णय मलाही पटायला लागला स्वातंत्रच्या 70 रीचा  सोहळा साजरा करतांना यांच्या दुखची जाणीव सरकार ला असावी आजही खेड्यात जाताना मैलौ मैल पाई चालत जाव लगत,तेही डोंगरांतून , याचे परिणाम ही वेगळे होत आहेत तर कित्तेकाला प्राण गमवावा लगत आहे

  महाराष्ट्रच्या  ग्रामविकास मंञी महोदयांच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कारखेल गाव, नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील ,व विकासा चा वनवास सहन करणारे लोक  गावची लोक संख्या 2200 गावात इंडो जर्मन या योजने मुळे गावातील पाणी प्रश्ण कायमचा मिटला आणि  बागायती शेती झाली  पण बागायत दाराचीमूल आज लग्नाची बाकी आहेत,गावचा रस्ता पहिला आणि 7 किमी चालत गेल कि पाहूण्यचा इरादाच बदलतो सुविधाच नाहीत तर पोरगी द्यायची कशाल
     गांवात पांरावर बसलेलीं  तरूण मुले गावाला रस्ता नाही म्हणुन संकटात सापडलीं आहेत,चक्क या गांवात 150 तरुण पोराचे सोयरीक जुळवताना रस्ता आडवा येतोय हुन्ड्या साठी कित्तेक लग्न मोड्लेलि एकलीं असतील पण या गांवात रस्ता नाही म्हणून कोणी पोरगी द्यायाला तयार नाही
या गावातील तरुणाशी संवाद साधला पोर संगत होती राव शेती पण भरपूर आहे ,कस बस शिक्षण पण घेतलाय पण वय निघून चालले चार पाच सोयरीक पण आलीं होती,पोरगी पसंत होती पण गावाकडे पहायला आल्यावर सगळ फिसकटल आणि नाहम्हणून सांगितले अस 1नाही दोन नाही तर तब्बल 7ते 8जणांनी सांगितले,म्हणून विश्वास बसला

गांवात याला रस्त्यांची सोय नसल्याने पोरगी च देत नाहीत असे गावातील वयोवृद्ध गावकर्यानी सांगितले ,पोराचा बाप अंधारात मुलीच्या बापाला पैसे देतो तवा कूट एखाद मुलगी द्यायाला तयार होतो अस झुँबरबाई काळे या आज्जी ने सांगितलं तर बाळंतपणातर खुप त्रास सहन कराव लागतो जवळ पास 10 की मी मध्ये कुठेच दवाखाना नाही खुप हाल होतात पोर सोर गाडीवर सायकल वर जातात पण म्हातारी माणसाचे मरण असते अस गुलफाबाई पवार या आज्जी ने सांगितले .तर रस्ता नसल्याने शालेय विद्याथ्याचे हाल होत आहेत विद्याथ्याॅना  शाळेत जाण्यासाठी गुढघाभर पाण्यांतुन जावे लागते तर पावसाळ्यात जास्त पाणी आल्यानंतर आम्हाला  शाळेला दांडीच मारावी लागते.

याच गावच्या रस्ता बाबतीत सरपंच व गावकर्या नी सर्व नेते व प्रशासन याचे दरवाजे ठोठावले पण काहीच उपयोग झाला नाही , आम्ही आमदार महोदयांना विचार तर जिल्हा परिषद ने आत्ता पर्यंन्त दुर्लक्ष  केल आणि अगोदर च्या आमदार वर खापर फोडले आणि जबाबदारी झट्कत उत्तर ही या आमदारांनी दिल गावचा रस्ता खरब आहे खुप त्रास होतोय पण आम्ही रस्ता लवकरच काम हाती घेवुन अस आश्वासन  देवून आमदारांनी सुटका करून घेतली खरी पण रस्ता होईल तेव्हा खरं
          ग्रामविकास  मंञी व  पालकमंत्री  ना.पंकजाताई मुंडे या गावच्या रस्त्या बाबतीत लक्ष देतील कां  योजनांचा गाँजावजा व बडेजाव  मिरवण्या पेक्षा  जिल्ह्यातील 350 वस्ती तंडया पर्यंत रस्ता पोहचला नाही याकडे लक्ष दिले तर या पोरांच्या डोक्यावर अक्षदा पडतील


सुरेश जाधव -9404204008
email-sureahaj99@gmail.com

Monday, 15 August 2016

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल--!

घर नाही की स्मारक देखील नाही

सुरेश जाधव

ये मेरे वतन के .लोगो जरा आँखों मे भरीलो पाणी जो शहिद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी 
देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुति देणार्या विश्वम्बर जाधव यांच्या पत्नी च दुःख वाटून घेण्या पेक्षा त्रास देणारे व लुबड्नरेच मिळाले अशीक्षित असल्याचा फायदा घेत एकही लाभ मिळू न देणारे नातेवईक आणि सरकार ने पण दुर्लक्ष केले आहे साधे घर देखील नाही बाकी सेवा तर दूरच.सासरच्यानी तर हाकलून दिले माहेर आधार झाल मूल बाळ नसल्याने अख्ख आयुष्य कस जगावं हा प्रश् होतच पण् भाऊ अनिल ने सहकार्य केल यामुळेच अधार मिळाला

बीड जिल्हयातिल नेकनूर येथील शहिद विश्वभर जाधव इंडो पाक वार मध्ये 1971साली कामी आले.तेव्हा पासून संपूर्ण आयुष्य एकटी ने जगत आलेल्या यमुनाबाई जाधव या  शहिदाच्या  पत्नी च्या संघर्षशाचा प्रवास खुपच करूण आहे ,लग्न होवून फ़क्त 2 महीनेच झाले होते तोच पतीच्या शहिद होण्याची बातमी कानावर पडली आणि संसाराची स्वप्न मातीत मिसळून गेली.वयाच्या येन तारुण्यात खडतर  जीवनाला सुरुवात झाली ती 55 व्या वर्षी अध्याप सुरूच आहे.आई वडीला कडे राहणार्या यमुनाबाई ची चुल रोजनदारी वर पेट्ते


हातात फ़क्त कागद पत्रे घेवुन  बसलेल्या यमुनाबाई अशिक्षित आहेत यामुळे काहीच माहिती नाही की प्रशासन हि पोहचले नाही
1971च्या बेसिक च्या आधारावर मिळणारी पेन्शन नेहमी आजारी असल्याने पुरत नाही  म्हणून आज वयाच्या 55 व्या वर्षी हि शेतात रोजंदारि चे काम करून च जगावं लगतआहे
150 रुपये रोज मिळतो आणि काम करून खाते
पण आजही पतीची आठवण आल्यावर फोटो मांडीवर घेवुन बसलेल्या यमुना बाई भूतकाळातील दुःख आठवून एकट्या च रडतात त्यांचे अश्रू पुसनारी 85 वर्षाची वयोवृद्ध आई गेल्या कित्येक दिवसात मुलीची समजूत कांडत आहे,फ़क्त हळदीचा डाग लागला आणि हा वनवास वाटायला आल्ला म्हणताना आई च्या खोल डोळ्यातून अश्रू  आवरता आवरले नाहीत
सगळ्या शासकीय कार्यालयात जावून पाट पुरावाकेल पण् काहीच मदत नाही कलेक्टर  घर देतो म्हणले पण् तेही नाही ,जमीन नाही ,आणि बेसिक कमी म्हणुन पेन्शन पण् कमी आहे स्मारक साठी प्रयत्न केले पण् ग्रामपंचायत जागा देत नाही शेवटी वैतागून सर्व सोडून दिले माझ्या बहिणीला न्याय मिळवा
जय जवान जय किसान हि घोषणा फक्त कागदावरच आहे की काय हा प्रश्ण पडतो साधे स्मारक आणि घर हि देवू न शकल्यामुळे आजही काम होत नसताना मजुरी करून जगण्याचा संघर्ष आजहि सुरूच आहे अशिक्षित  असलेल्या यमुनाबाईनी सुरुवातीला बोलायला नकार दिला आत्ता जाऊदे उभ आयु श्य काडलय सगळ्यानी त्रास दिलाय आत्ता काय होणार आहे पण या माउली चे कहानी खुप काही सांगणारी आहे आजही रक्त सांडलेल्या कुटुंबात सरकार खरी मदत नही पोहचू शकल हे अपयश आहे.या शहीद वीराचे स्मारक व्हावे अशी तिची मनोमन इच्छा आहे ती तरी सरकारने पूर्ण करेल कि नाही आणि समाज फ़क्त बघायची भूमिका घेणार काय?हे प्रश्न तेच राहतात 

Friday, 8 April 2016



मरन मरु देईना अन् समाज जगु देईना!


आत्महत्येच्या दारातील ठोंबरे कुटुंब--------
खरचं एड् स बाधिताना समाज स्विकारतोयं?
अशिच अवस्था.वाट्याला आलेल दुख:भोगनार नरसिंह ठोंबरे च कुटुंब दुर्दैवान एड्स च्या विळख्यात सापडलं. मरनयातना भोगनार्या या कुटुंबातील सर्वच या दुर्धर आजाराने बाधित आहेत.काम होत नाहीं करता येत नाहीं  जरी करायचा प्रयत्न केला तर गावात कोनिन देत नाहीं.मग खायच काय? हा प्रश्न या कुटुंबासमोर आहे.
केज तालुक्यात  उंदरी गावातील एच आय व्ही बाधित ठोंबरे कुटुंबाला गावनेच बहिष्कृत केलय. चार वर्षापुर्वी गावातील नातेवाईक अन समाज कंटकानी हाकलुन देत.गावाबाहेर वाळीत टाकलय. गावापासुन २ किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला आपले बस्तान मा़डले.त्याना गावातील कोन्ही बोलत देखील नाहीं, दुख:तांना आधार तर सोडाच पणपण त्रास द्यायला कमि करत नाहींत.खरंच एच आय व्हि बाबत समाजात जनजागृती झालिय?
समाज व्यवस्थेचा भाग म्हणुन या लोकांना धिर आधार  दिला तर आयुष्य उरलेल आयुष्य सुखाने जगतिल पण हा समाज स्विकारायला तयार नाहींउलट पुंकर घालायची सोडुन जखमेवर मिठ चोळायचे काम करत आहेत.गावातील लोक किराना माल व रेशण सोडाच साध पाणी सुध्दा देत नाहीं.भाजी मिळाली नाहीं म्हनुण उंबराच्या दोडीची भाजी केली सांगताना नरसिंह च्या डोळ डबडबले
खरच दुख:काय असत याच भयान वास्तवमला त्याच्या डोळ्यात जानवलं
या व्यवस्थेशि लडताना नरसिंह ने थेट मुख्यमंत्री महोदया पर्यन्त पत्रव्यवहार केला पोलिसात कंप्लेट केली न्यायालयाात खेटे मारले  पण कोन्हिच मदत केली नाहीं याव्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याच त्यान सागितल त्यात अपंग असलेल्या नरसिंह च्या पत्निनेतर दुख: चा पाडाच वाचुन दाखवला
किराना आनायला गेल तर दुकानदार संपले आमच्याकडे नाहीं असे सांगतात.दळन दळुन देत नाहींत कि बोलत देखिल नाहीं.जगाव कस बर्याच वेळा माझ्या मालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल तुम्हि गेला तर आमच कस म्हणुन समजुत काडल्याची नरसिंहची पत्नी लतिका ठोंबरे हिने सागीतले खरच किती दुख:कोनत्या थरा पर्यन्त जातोय समाज त्याच वनव्यात होरपळनारा नरसिंह चा मुलगा शुभंम
शाळेत वर्गात बसु दिल नाहीं बर्याच वेळा शिक्षण घेताना अडचनि आल्या.जवळ च्यांनीच त्रास दिला.आत्ता तर तुमच्या मयताला पण ऐनार नाहींत तसेच कोल्हे कुत्र्याची धन व्हा असे भाविकतील नातेवाईक म्हनत आहेत .काय विश्वास वाटेल समाजा बदल हाडामासाची मानस मानुसकि विसरलीका?हा प्रश्न पडतो खरच खेड्यात ले संस्कार संपले काय असच वाटात दुख:जानुन घेवुन कमी करन जमेल का? कागदोपत्री सरकार फक्त एड्स बाबतीत जनजागृतीचा दावा करत आहे। पण समाजात आज असा कित्येक कुटुंबांना समाजाने बहिष्कृत केलय.वाट्याला आलेल दुख। भोगताना समाज  काटे टाकतोय हे खरच भयानक सत्य आहे .
अशा कुटुंबातील लोकांना फक्त उपचार  देवुन सरकारची जबाबदारी संपत नाहीं. रोजी रोटिच काय? ते सोडवन गरजेच आहे
भिक मागीतलीतरी कोन्ही देत नाहीं मरन यातना भोगनारे हे कुटुंब जर मदत मिळाली तरच यांची चुल पेटेल व जगेल, नसता आत्महत्येच्या दारातील ठोंबरे कुटुंब माळरानावरच संपुन जाईल
आणि ज्या समाजाला एड्स बाबतीत जनजागृतीचे दाखले दिले तेकिती फोल आहेत.याला जबाबदार कोन? शासन कि समाज. अन् यांच थोडक आयुष्य सुखान जगवण्यासाठी धिर आधार गरजेचा आहे
माळरानावर राहुन पोटाची भुक गिळताईल पण बोलायला कुन्ही नसेल तर मरन स्वीकार नं हाच पर्याय या कुटुंबा समोर समाजान निर्माण केलाययाच्याकडे सकारात्मक दृष्टिकोणातुन पाहने गरजेचे आहे कारण समाजातिल घटक आहे मानुस आहे पण ---कोन्ही हा प्रश्न सुटत नाहीं.
सुरेश जाधव
महाराष्ट्र १ जिल्हा प्रतिनिधि बीड-9404204008

Friday, 20 November 2015

समतेची शिकवण देणारी पंढरीची वारी


यारे यारे लहाण थोर ।  याती भलती नरी नर ।
करावा विचार  नलगे । चिंता कवणाची ।।

     जगाला आध्यात्माच्या शि
कवणीतुन परम आनंदाचा व परोपकाराचा मार्ग  पंढरीच्या वारीच्या माध्यमातुन प्रत्येक वर्षी दिला जात आहे. जात पात धर्म पंथ यांच्या बंधणाला झुगारून वारकरी वाळवंटात एकत्रीत पणे, आनंदाने आषाढी,कार्तीकी वारी मध्ये सहभागी होतात.एकमेकांच्या सुख-दु:खाला पांडुरंगाच्या चरणी आर्पण करून सर्वच या भक्तीच्या सोहळ्यामधे समर्पक भावाने सहभागी होतात. भेदभाव विरहीत,मानवतेच्या परमेश्‍वराची पुजा करण्याचा भाव अंतकरणात धारण करतात.
एकमेका साह्यकरू। अवघे धरू सुपंथ ॥
या संत तुकारामाच्या अंभगाला सार्थ ठरत गेल्या अनेक वर्षापासुन भक्तीची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृ तीक वैभवाची साक्ष देत आहे.वारीचे सर्वअंगाने दर्शन करताना,सामाजिक परिवर्तनाची नांदी,व सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करून समतेची,व विश्‍वबंधुत्वची शिकवण देत जगासमोर आदर्श निर्माण करत आहे.याच वारीचे क्षेत्र पंढरपुरअसुन देव विठोबा प्रेमाची साक्ष देत भक्तीचे दर्शन घडवत आहे.त्याचेच वर्णन संत करतात.
नाचत जावु त्याच्या गावा रे। खेळीया सुख देईल विसावारे॥
संताच्या प्रेमाचा व सर्व सामाण्याच्या श्रध्देचा मुर्तीमंत गाभा भिवरेच्यातिरावरती उभा आहे.त्याच्या दर्शनाने संसराच्या अनंत अडचणींचा सामणाकरण्याचे बळ व कष्टातुन विश्रांतीचा अनुभव प्राप्त होतो. भोळया-भाबड्या भक्तांना आधारवड व श्रध्देने प्रेम वाटणारा विठोबा काही ही मागत नाही.  संत बहीनाबाई खुप सुंदर शब्दात मांडतात
               श्रीमंताचा बालाजी सोण्या चांदीने मडवीला ।
               माझा गं पांडुरंग पाना-फुलात राजी झाला ॥
असा देव जो भक्ताकडे काहीच मागत नाही फक्त भाव युक्त अंतकरणानं आकळला जातो संत महात्मे याच देवाला आपल्या प्रेमाचे स्थान मानतातात.या सर्व  भक्तीच्या साधनेत मानवतेच्या सर्वागीन विकासाची व नैतिक, सामाजीक उत्क्रांतीची  बिजे संत आपल्या वाग्ड:मयात आदिकालापासुन सांगत आले आहेत.12 व्या शतकात सामाजिक विषमतेची दरी व कर्मकांड आणी आणी अंधश्रध्देच्या  विरोधात आवाज उठवुन समाजीक बंड उभारण्याचे साहस वारकरी सांप्रदायातील सर्व संताणी केलेले दिसुन येते.लोकशिक्षणाचे व जागराचे काम निस्वार्थ पणे करून मानतेची शिकवन संतानी  कीर्तन,भजन,भारूड,प्रवचन यांच्या माध्यमातुन केली.अनिष्ठ रूडी पंरपरा व चाली-रितीवर परखड शब्दात विरोध करण्याचे धाडस करणे हि जोखीम पत्कारली.
सामाज हिताचे व लोकाध्दाराचे काम करताना त्या काळातील प्रस्थापिताचे साम्राज्य मोडित काढण्यासाठी पंढरीचे वाळवंट हे विज्ञापिठ झाले होते.तर वारी ज्ञान अविश्काराचा सोहळा .बनली होती त्या भक्तीच्या व ज्ञानदानाच्या यज्ञात प्रत्येक वारकरी धारकरी बनत होता .व प्रबोधनाची चळवळ पुढे चालवत होता.त्यात एकाच वारीच्या साधनेत सर्व विकारांना तिलांजली देत भक्तीचा काला करून प्रत्येक जन त्यात तृप्त होत असें.यात पुरूष स्त्री, जातभेद, लिंगभेद, यांना थाराच नव्हता,एकमेकांच्या हातात हात घालुन.मुखी हरिनामाचा गजर करत भक्तीचे रसपान  एकाच पंगतीस बसुन केले जात होते.
समर्थाचे पंक्ती भोजने । तळील्या वळील्या एकची पक्वोने।
तीच पंरपरा कायम करत वारकरी आजही पंढरीच्या वारीत सहभागी होतात.
वाळवंटात किर्तनातुन  संर्व जाति धमाचे संत एकत्र ऐत आसत यात संत ज्ञानेश्‍वर ,संत नामदेव ,संत चोखा मेळा, संत जनाबाईं संत मुक्ताबांई, संत गोरा कुभार,संत राका -बंका,यासंत मालीकेची मांदी जमत आसे.तीच पंरपरा आजही सुरू ठेवत. आषाढी आणी कार्तीकी या मुख्य वारीसाठी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या काण्या कापर्‍यातुन श्रध्देने मिळेंल त्या साधनाने ,पायी येत आहेत.या वारीतुन सांस्कृतीक चळवळ जोपासण्याचे व सामाजीक ऐक्य टिकुन ठेवण्याचा महान कार्य होत आहे.आज आधुनीक युगात डिजिटल जेाण्यातही वारीचे महत्व तेवढ्याच प्रमाणात पहायला मिळते.आर्थिक सामाजीक सांस्कृतीक,आणी प्रबोधनासाठी प्रभावी परिनामकारक ठरणारी वारी अनुभवुया
                    कार्तिकीचा सोहळा। चला जावु पाहु डोळा ॥
तो सोहळा डोळयाने पाहुया आणि भक्तीच्या कक्षा रुदावुन मानुसकीची,परोपकारची, नैतिकतेची,एकात्मतेची सद्बुध्दी दे.तसेच दुष्काळाने होरपळणार्‍या शेतकर्‍याला धिरान जगणचं बळ दे शेवठी
भेदसारे मावळुदे, वैर सार्‍या वासना ।
मानवाच्या ऐक्यतेची, पुर्ण होवो कल्पना ॥
फक्त आम्ही मुक्त मानु, बंधुतेच्या बंधना।
संत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना॥
                                                             
                                                                           ह.भ.प.प्रा.सुरेश महाराज जाधव
       (संत साहित्य अभ्यासक)
श्री बंकटस्वामी मठ नेकनुर ता.जि.बीड
                                                             मो.9404204008