Monday 22 August 2016

गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :- कारखेल ची व्यथा !



गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :-
कारखेल ची व्यथा ! लग्नाच्या वयातल्या पोरांच्या बापाला घोर

तुमच्या गावाला रस्ता नाही ,नको बाबा पोरगी द्यायाची! सात किलो मीटर डोंगर तुडवित यायचे कि काय?असा सवाल मुलींचे बाप करत आहेत .म्हणूनच कि काय कारखेलगावातील  जवळ पास  दीडशे वयात आलेल्या पोरांची शुभ मंगल राहिलीत. गावाला रस्ता नाही म्हणून या  गांवात कोणी मुलगी द्यायला तयार नाही मूलभूत सुविधा पासून कोसो दूर असलेल्या कारखेल गाव ची व्यथा खरंचभयानक  आहे.बातमी बनवण्यासाठी मी कारखेल ला जायला निघालो तर तो अविस्मरणीय रटाळ वाना प्रवास मलाही करावा लागला म्हणुनच  त्यां गावकरर्याचे आणि पोरी न देणार्या बापाचा निर्णय मलाही पटायला लागला स्वातंत्रच्या 70 रीचा  सोहळा साजरा करतांना यांच्या दुखची जाणीव सरकार ला असावी आजही खेड्यात जाताना मैलौ मैल पाई चालत जाव लगत,तेही डोंगरांतून , याचे परिणाम ही वेगळे होत आहेत तर कित्तेकाला प्राण गमवावा लगत आहे

  महाराष्ट्रच्या  ग्रामविकास मंञी महोदयांच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कारखेल गाव, नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील ,व विकासा चा वनवास सहन करणारे लोक  गावची लोक संख्या 2200 गावात इंडो जर्मन या योजने मुळे गावातील पाणी प्रश्ण कायमचा मिटला आणि  बागायती शेती झाली  पण बागायत दाराचीमूल आज लग्नाची बाकी आहेत,गावचा रस्ता पहिला आणि 7 किमी चालत गेल कि पाहूण्यचा इरादाच बदलतो सुविधाच नाहीत तर पोरगी द्यायची कशाल
     गांवात पांरावर बसलेलीं  तरूण मुले गावाला रस्ता नाही म्हणुन संकटात सापडलीं आहेत,चक्क या गांवात 150 तरुण पोराचे सोयरीक जुळवताना रस्ता आडवा येतोय हुन्ड्या साठी कित्तेक लग्न मोड्लेलि एकलीं असतील पण या गांवात रस्ता नाही म्हणून कोणी पोरगी द्यायाला तयार नाही
या गावातील तरुणाशी संवाद साधला पोर संगत होती राव शेती पण भरपूर आहे ,कस बस शिक्षण पण घेतलाय पण वय निघून चालले चार पाच सोयरीक पण आलीं होती,पोरगी पसंत होती पण गावाकडे पहायला आल्यावर सगळ फिसकटल आणि नाहम्हणून सांगितले अस 1नाही दोन नाही तर तब्बल 7ते 8जणांनी सांगितले,म्हणून विश्वास बसला

गांवात याला रस्त्यांची सोय नसल्याने पोरगी च देत नाहीत असे गावातील वयोवृद्ध गावकर्यानी सांगितले ,पोराचा बाप अंधारात मुलीच्या बापाला पैसे देतो तवा कूट एखाद मुलगी द्यायाला तयार होतो अस झुँबरबाई काळे या आज्जी ने सांगितलं तर बाळंतपणातर खुप त्रास सहन कराव लागतो जवळ पास 10 की मी मध्ये कुठेच दवाखाना नाही खुप हाल होतात पोर सोर गाडीवर सायकल वर जातात पण म्हातारी माणसाचे मरण असते अस गुलफाबाई पवार या आज्जी ने सांगितले .तर रस्ता नसल्याने शालेय विद्याथ्याचे हाल होत आहेत विद्याथ्याॅना  शाळेत जाण्यासाठी गुढघाभर पाण्यांतुन जावे लागते तर पावसाळ्यात जास्त पाणी आल्यानंतर आम्हाला  शाळेला दांडीच मारावी लागते.

याच गावच्या रस्ता बाबतीत सरपंच व गावकर्या नी सर्व नेते व प्रशासन याचे दरवाजे ठोठावले पण काहीच उपयोग झाला नाही , आम्ही आमदार महोदयांना विचार तर जिल्हा परिषद ने आत्ता पर्यंन्त दुर्लक्ष  केल आणि अगोदर च्या आमदार वर खापर फोडले आणि जबाबदारी झट्कत उत्तर ही या आमदारांनी दिल गावचा रस्ता खरब आहे खुप त्रास होतोय पण आम्ही रस्ता लवकरच काम हाती घेवुन अस आश्वासन  देवून आमदारांनी सुटका करून घेतली खरी पण रस्ता होईल तेव्हा खरं
          ग्रामविकास  मंञी व  पालकमंत्री  ना.पंकजाताई मुंडे या गावच्या रस्त्या बाबतीत लक्ष देतील कां  योजनांचा गाँजावजा व बडेजाव  मिरवण्या पेक्षा  जिल्ह्यातील 350 वस्ती तंडया पर्यंत रस्ता पोहचला नाही याकडे लक्ष दिले तर या पोरांच्या डोक्यावर अक्षदा पडतील


सुरेश जाधव -9404204008
email-sureahaj99@gmail.com

1 comment: