Tuesday 2 January 2018

फक्त दगड त्यांचे होते! फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती


फक्त दगड त्यांचे होते!  फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती

सड्कि डोकी जरा शांत ठेवा! किती दिवस इतिहासावर दगड मारणार!

विचाराचा इतिहास शिकवणाऱ्या महापुरुषानी जाती वादांची बंधने  झुगारून  निकोप  समाज निर्मिती  साठी  दिलेलं  बलिदान आज आम्ही  विसरलो अहोत  काय?

बुरसटलेल्या मेंदू वाल्याच्या सडक्या डोक्यांन  पुण्याच्या शांतंतेत  मीठ टाकलं विध्वंसक मानसिक तेणें  पुन्हा  बहुजनांच्या पोरांना तोफेचा गोळा  करुन ठिणगी पेटवली खऱ्या इतिहासावर दगड मारून तो  काय पुसला जाणार  होता का मात्रं किळस वाना त्यांचा प्रयत्न होता यानं आमचं खुप मोठं नुकसान  झालं ओ जाती च्या मोर्चा ने निर्माण  झालेली  दरी  आणि दुरावले मन विसरून  माणूस कसा बसा एक येत होता त्या ऐकतेला खिंडार पाडन्याचे शड्डयंत्र रचल गेलं  आणि  त्यात आमची  पोरं भरडली  गेली हातात  दगड दिली बसले तमाशा पाहात! फक्तं दगड  त्यांचे  होते!  फेकणारे हात  आणि  फुटणारी  डोकी आमच्याच बांधावाची होती! कायदा  हातांत घेतो तेव्हा कायद्यांच्या  कचाट्यात अडकनारे पण आमच्याचं समाजातील  कोणाचे नातेवाईक नक्कीच  असणार  त्यांचं  भविष्य काय ? कुटुंबाचं काय? का  फक्तं --बदला आणि सूड ज्याला बुड टेकवायची  अक्कल नाही त्यांला सूडाच्या मागचं गूढ राजकारण काय कळणार! इंग्रज  गेले पण  200 वर्षा नंतर भेद  नीती तशीच आहे तोडाफोंडा आणि राज्य करा. काय?  डोकी गहाण ठेवल्यागत वर्तन  सुरू आहे.इशाऱ्यावर नाचणारी आणि शिकवलेलं बोलणारी पीड़ित पिढी निर्माण होते हेच दुर्दैव. यातच  जातीवाद आणि समाज कारणाचे  अर्ध हळकुंड उगाळून पीलेली काही भगवी  झालित तर  काही निळी पिवळी पडली आहेत.हीच ब्याद तर मुळांवर आलीय.वैचारिक लढा उभारुन प्रश्न सोडवन्यपेक्षा खऱ्या खोट्या भूतकाळावर आज युद्ध सुरू आहे. हे  अतिशय चूक आहे. या  विघ्नसंतोशी व्रतीच्या मुसक्या आज  ना उद्या आवळ्या जाणारच आहेत.

 
गुण्या गोविंदा ने हातात हात घालुन ताटाला ताट नाही  तर ताठ माने ने ताटात जेवण करणारी आमच्या पिढी ची घडी बिघडवू पाहणाऱ्यां शन्ड लोकांची तोंड पाहायची इच्छा नाहीए!  शिकणाऱ्या लोकांची डोकी जास्त भडकतात का? चूक  बरोबर  खरं  खोटं  याची  चिकित्सा  सोडा  पण  शहानिशा पण  करायचं  सोडून  बेताल सोशल मीडिया वर  स्वार व्हायला तयार  होतातच कसे ? वाईट वाटत ज्यांच्यात आपण  वावरतोय  त्यांच्यावर  दगड  कसाचं  उचलला  जातो  घटनां भीमा कोरेगाव ची निंदनीय आहे निषेध आणि  फक्तं निषेध हेच प्रत्येकाचे उत्तर आहे  पण आज  महाराष्ट्रातील गावा गावांत विश्वासा च्या भिंतीचे अंतर आता भीती वर पोचले विश्वासाला तडा जायची वेळ नाही तर परिस्थीती निर्माण झाली!शहरात भागत ओ  कर्फ्यू लावून. आठवड्याचं नियोजन असतं आणि  पर्याय  ही असत्यात. गावांत काय करणार पोट भरण्यासाठी आज ही रोजंदारीवर जावं लागत तेव्हा चूल पेटती त्यात तुमच्या असल्या दगड  फेकीने आमची संस्कृती उध्वस्त होती. या च्या  परिणामांचा कधी  विचार  होणार  आहे  का ? पुन्हा मुहल्ले नगर आणि वाड्यात विभाजन करायचं ! रोज  एक मेका ची तोंड पाहणं चुकणार आहे का ! नाही  ना  मग  गरम  डोकं  जरा  शांत  ठेवा ! बाबासाहेबाची लोकशाही आणि संविधान  तुमच्या सोबत  आहे  ना ! जगाला  शांतता काय असते  हे  शिकवणारे  आमचे आदर्श युगपुरुष बुध्द आमच्य बुद्धीत आहेत का ? फक्तं  फोटो पुरतेचं यांचाही विचार होणं गरजेचं आहे!

कालची घोषणा ऐकली आणि वाईट  वाटलं नमो तस् भगवतो अर्हतो-- या  प्रार्थनेचा वेगळाचं  वापर केला यातचं बुद्ध नको  युद्ध हवं हा  सूर तरुणाई आळवत  होती! ही  धोक्याची  पूर्व घंटा आहे कां याचा  विचार  हिं  व्हायलाच हवा.समाज जीवनाचे खरे तत्व माणुसकी आम्ही  विसरत अहोत.जातीवाद पुन्हा प्यारा वाटू लागलाय इथे माफ करा बाबा मात्र आम्ही  चुकतोय हे कळत असूनही वळत नाही! उचलेला  दगड जशी जात विचारत नाही तो  त्याच  काम करतो तसं फूटनारी काच कितेक तुकड्यांत विभागतें तिच्या नुकसानीचं मोल लावता येत! कदाचीत त्याची  किंमत  कमी जास्त  असेल ही  मात्र  समाज मनाच्या -हदयाला पडलेली  चिर तीच काय? यांचा  विचार करा.हात जोडून विनंती.

मूठभर लोक सुशिक्षित झालेत त्यांचं सोडा खंडीभर  तसेच आहेत.भाकरी चा प्रश्न  तसाच आहे.आकाशाचं पांघरूण करुन  कुडकुडत पडलेली कुटुंब यांचे प्रश्न? कुपोषण?  झोपडपट्टीची व्यथा? शेतकरी आत्महत्या! दहशदवाद? नक्षलवाद? याचा  कधी  विचार  केला  का? दोस्ता हो!


आमची बुध्द शिव शाहू फुले आंबेडकराची लेकर जाती वादांची भाषा बोलायला लागले आपलं तूपलं  याही पेक्षा मप्लंची ची संकुचित शिकवन नडत आहे.असेच किती दिवस विष प्रयोग करणार यानं कुणाचं  बरं झालं आणि  पदरात काय पडलं  याचं ही उत्तर  शोधा. गरीबांची लेकरं दमडी कमवायचे सोडून आयुष्यं गमवायची भाषा करतात अन् पिसाळलेल्या गत बुद्धी भ्रष्ट होवुन कुणाच्याही मागे धावतात हातात पदरात  काहीचं  मिळतही  नाही  आणि  काय  करतो ते  कळत देखील  नाही अशा वेळी  कोण  जिंकतो ? कोण हरतो? या  पेक्षा समाजा ची पार वाट लागते पिढी बर्बाद होते. या क्षणांची  वाट पाहातोय का ? डोकं ठिकान्यवर ठेवा! न्याय व्यवस्था ; कायदा आणि  राज्यघटना या वर विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या  संकल्पानेतूंन  साकारलेल्या खऱ्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.

नसता बिघडल्यागत  असेच किती दिवस इतिहासावर दगड मारणार ! सड्कि डोकी जरा शांत ठेवा!



सुरेश जाधव
9404204008

No comments:

Post a Comment