Monday 15 August 2016

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल--!

घर नाही की स्मारक देखील नाही

सुरेश जाधव

ये मेरे वतन के .लोगो जरा आँखों मे भरीलो पाणी जो शहिद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी 
देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुति देणार्या विश्वम्बर जाधव यांच्या पत्नी च दुःख वाटून घेण्या पेक्षा त्रास देणारे व लुबड्नरेच मिळाले अशीक्षित असल्याचा फायदा घेत एकही लाभ मिळू न देणारे नातेवईक आणि सरकार ने पण दुर्लक्ष केले आहे साधे घर देखील नाही बाकी सेवा तर दूरच.सासरच्यानी तर हाकलून दिले माहेर आधार झाल मूल बाळ नसल्याने अख्ख आयुष्य कस जगावं हा प्रश् होतच पण् भाऊ अनिल ने सहकार्य केल यामुळेच अधार मिळाला

बीड जिल्हयातिल नेकनूर येथील शहिद विश्वभर जाधव इंडो पाक वार मध्ये 1971साली कामी आले.तेव्हा पासून संपूर्ण आयुष्य एकटी ने जगत आलेल्या यमुनाबाई जाधव या  शहिदाच्या  पत्नी च्या संघर्षशाचा प्रवास खुपच करूण आहे ,लग्न होवून फ़क्त 2 महीनेच झाले होते तोच पतीच्या शहिद होण्याची बातमी कानावर पडली आणि संसाराची स्वप्न मातीत मिसळून गेली.वयाच्या येन तारुण्यात खडतर  जीवनाला सुरुवात झाली ती 55 व्या वर्षी अध्याप सुरूच आहे.आई वडीला कडे राहणार्या यमुनाबाई ची चुल रोजनदारी वर पेट्ते


हातात फ़क्त कागद पत्रे घेवुन  बसलेल्या यमुनाबाई अशिक्षित आहेत यामुळे काहीच माहिती नाही की प्रशासन हि पोहचले नाही
1971च्या बेसिक च्या आधारावर मिळणारी पेन्शन नेहमी आजारी असल्याने पुरत नाही  म्हणून आज वयाच्या 55 व्या वर्षी हि शेतात रोजंदारि चे काम करून च जगावं लगतआहे
150 रुपये रोज मिळतो आणि काम करून खाते
पण आजही पतीची आठवण आल्यावर फोटो मांडीवर घेवुन बसलेल्या यमुना बाई भूतकाळातील दुःख आठवून एकट्या च रडतात त्यांचे अश्रू पुसनारी 85 वर्षाची वयोवृद्ध आई गेल्या कित्येक दिवसात मुलीची समजूत कांडत आहे,फ़क्त हळदीचा डाग लागला आणि हा वनवास वाटायला आल्ला म्हणताना आई च्या खोल डोळ्यातून अश्रू  आवरता आवरले नाहीत
सगळ्या शासकीय कार्यालयात जावून पाट पुरावाकेल पण् काहीच मदत नाही कलेक्टर  घर देतो म्हणले पण् तेही नाही ,जमीन नाही ,आणि बेसिक कमी म्हणुन पेन्शन पण् कमी आहे स्मारक साठी प्रयत्न केले पण् ग्रामपंचायत जागा देत नाही शेवटी वैतागून सर्व सोडून दिले माझ्या बहिणीला न्याय मिळवा
जय जवान जय किसान हि घोषणा फक्त कागदावरच आहे की काय हा प्रश्ण पडतो साधे स्मारक आणि घर हि देवू न शकल्यामुळे आजही काम होत नसताना मजुरी करून जगण्याचा संघर्ष आजहि सुरूच आहे अशिक्षित  असलेल्या यमुनाबाईनी सुरुवातीला बोलायला नकार दिला आत्ता जाऊदे उभ आयु श्य काडलय सगळ्यानी त्रास दिलाय आत्ता काय होणार आहे पण या माउली चे कहानी खुप काही सांगणारी आहे आजही रक्त सांडलेल्या कुटुंबात सरकार खरी मदत नही पोहचू शकल हे अपयश आहे.या शहीद वीराचे स्मारक व्हावे अशी तिची मनोमन इच्छा आहे ती तरी सरकारने पूर्ण करेल कि नाही आणि समाज फ़क्त बघायची भूमिका घेणार काय?हे प्रश्न तेच राहतात 

No comments:

Post a Comment