Monday 3 December 2018

आय पी एस अधिकाऱ्यांना ब्लँकमेलिंगचा प्रकार तर नाही ना? वायरल क्लिप


स्वार्थासाठी समाज पेटवून त्यावर पोळी भाजून ताव मारणारे तमाशा पहात आहेंत ? 

आय पी एस भाग्यश्री नवटक्केची तडकाफडकी बदलींची चर्चा,न्याय कीं अन्याय ?

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न हा कधी कधि गुन्हा ठरतो का ? कायदा हा निकोप समाज व्यवस्थेसाठी असतो,  4 महिन्यापूर्वीची घटना आज उकरून काढण्या पाठीमागचा हेतू काय ! तेव्हा पासून आत्ता पर्यंत माजलगाव शांत होतं.पण वयक्तीक स्वार्थासाठी दोन्ही समाज पेटवून स्वार्थीपोळी भाजण्याचा त्या पोळीवर पोट भरण्याचा केविलवाणा प्रयत्न जर कथित पुढाऱ्यांकढुन होतं असेल तर हें समाज विघातक आहे, 

माजलगाव विभागात कुठल्या गुन्ह्यांत अन्याय झाला ? किंवा ही क्लिप येण्या आगोदर कधी हा विषय चर्चिला गेला ? तर नाही मग  दोन्ही समाज बांधवांनी डोकं ठिकान्यावर ठेवून संवेदशील प्रकरण वाढवू नये ! या प्रकरणात ज्यांचा हेतू आहे तें  पेटवून देवून मोकळे झाले, आत्ता दुरुन तमाशा पहात आहेत.घरा शेजारी आणि दाराशेजारी राहणारे, ताटात खाणाऱ्यानाचे भांडणं लावून काय मिळणार यांना पण विघ्नसंतोषी लोकांचा हा धंदाच म्हणा ! पण यात एकाद्या अधिकाऱ्याला बदनाम करण्याची जर सुपारी घेतल्यासारखं कोणी करत असेल तर कितपत योग्य!

पोलीस प्रशासनातील कठोर कारवाई मुळे अवैद्य धंद्यावर पाणी फिरायला लागले, धंद्याचे वांदे झाले. यात वाळू माफिया, खोटय़ा केस सम्राट, लाल बत्ती, ब्लँकमेलर्स, मद्धसम्राट, हॉस्पिटल माफिया, या सर्वांच्या कारनाम्यांवर अंकुश ठेवल्यानं माजलगाव शांत झालं तें शांत राहून कसं चालेल म्हणून कदाचित अशी क्लिप वायरल करणाराचा हेतू असेल.संविधान आणि कायदा या पेक्षा कोणी अधिकारी मोठा नाही. त्या अधिकाऱ्यांचा हेतू जर कलुषित असेल तर शासन व्हायला पाहिजेच, पण जाणीवपूर्वक पूर्व इतिहास न तपासता एकाद्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यावर असा आरोप करणं चुकीचं ठरेल. चांडाळ  चौकडी च्या दुर्बुद्धीतून  त्यांच्यात पातळयंत्री पणामुळे समाज वेठीस धरला जात असेल तर साध्य काय होनार आहे.धंदेवाईक नजरेतून जर अशा प्रकाराला जाणीवपूर्वक उकरून काढले जात असेल तर गंभीर आहे.

 ठोक मोर्चा सारख्या आक्रमक आंदोलना मध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं हें त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांचे काम असते, तें त्यावेळी केले नसते तर कित्येक दुर्दैवी घटनां घडल्या असत्या पेटलेल्या समाजाला शांत करण्यासाठी कधी कधी आउट ऑफ वे जावून काम करावं लागत. पण त्यामधे सामाजिक शांतता अबाधित ठेवणं हा मुख्य उद्देश असतो, कोणी एक अधिकारी रुजू झाल्यापासून 9/10महिन्याच्या कालवधीत जर कोणाला त्रास झाला असता तर तेव्हा एकादी तक्रार वरिष्ट कार्यालयात द्यायला कोणाची हरकत होती का ? तसे पाहिलं तर बाबासाहेबांच्या कायद्याचा वापर करणं आणि दादा मागायला समाज तरी कधी मागे असतो,पण असं झालं नाही.उलट या कालवधीत गुन्हेगारीचे प्रमाण आणि आगोदर चे प्रमाण तपासले तर प्रामाणिक अप्रामाणिक काम काय असते लगेच लक्षात येईल.थेट वाळू माफियावर केलेल्या कारवाई मधून कोटय़ावधीचे दंड महसूल च्या महिला तहसिलदार आणि पोलीस अधिकारी म्हणून यांनी केले. माजलगावमधे शांतता नांदूलागली होती.पण नाही.चांगल झाल कीं पोटात कलवायला लागलं. इथे विषय जाती धर्मा चा मुळीच नाही.पण अशी सवय जर लागत असेल तर धक्कादायक आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारणारे यशस्वी होतील.भविष्यात अशा घटनां वाढतील आणि कुठल्याच जातीच्या, धर्माच्या अधिकाऱ्याला कायद्यावर बोटं ठेवून काम करता येनार नाही,

 लोक शिवजयंती असली कीं पोलीस कोन हें आगोदर पाहतील, डॉ बाबासाहेब आंबेकरकरांची जयंती असेल, भविष्यात उरूस, ईद आणि इस्तेमाह या सर्वच बाबतीत अपरिहार्य घटनां घडली तर त्यांच संशयाच्या नजरेतून पाहिले जाईल म्हणून या बाबतीत दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायलाच हव! कायद्यावरचा विश्वास उडत असेल त्यांत जाणीवपूर्वक एकाद्याला टार्गेट केलं जात असेल तर योग्य नाहीच. पण प्रश्न हा निर्मान होतोय कीं या क्लिप पूर्वी माजलगाव मधील वातावरण सामजिक सलोखा चांगला होता.कुठलीच तक्रार शहानिशा झाल्याशिवाय घेतली गेली नाही,असं जर असेल जयंती उत्सव , मोर्चे आणि सभा संम्मेलन शांततेंत पार पडले असतील, कन्हैया कुमार यांची सभा माजलगावमध्ये शांततेत संपन्न झाली असेल, शेतकरी आंदोलनात अग्रेसर असलेल्या माजलगावमध्ये कुठला चुकीचा गुन्हा दाखल झाला नाही, कॉलेज पासून तें घरापर्यंत जाईपर्यंत मुलगी सुरक्षित मनाने जावू शकत असेल तर , या सगळय़ा कायद्याच्या यशाला जर तपासून पाहिले तर 100%मार्क मिळतात.येवढेच नाही तर  माजलगावमध्ये कुठल्याही गल्लीत जावून सामान्य लोकांना विचारा उत्तरे आपोआप मिळेल फक्त धर्म आणि जातीचा द्वेषवादी चष्मा दुरु करुन नवटक्के मैड्म सारख्या नवख्या ऑफिसर च्या कामाचे मूल्यमापन केलं तर लक्षात येईल,

बीड जिल्ह्यातील , दसरा मेळावा, असो कीं मुख्यमंत्री दौरा, कोणताही प्रोटोकॉलचा कार्यक्रम असेल, सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न असेल तर पोलीस प्रशासनामधे चोख बंदोबस्त म्हटलं कीं नवटक्के मैड्म वर जबाबदारी असायची यात कधीच अपवादात्मक पण घटनां घडल्या नाहीत.हें सगळं एकीकडे आज क्लिप घेवून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, क्लिप मधे छेडछाड केली.वायरल करणाराचा हेतू काय। ठोक मोर्चा मधे आक्रमक झालेल्या समाजाला शांत करण्याच्या हेतू ने जर कौन्सलिंग केली.त्यामुळे अनुचित प्रकार घडले नाहीत. वातावरण शांत राहिले, तेव्हा पासून आज पर्यंतही शांत आहे, पण आत्ता दोन गट पडले, कारवाईची मागणी करणारे आणि कारवाई झाली तर आक्रमक पणे उत्तर देवू असं बोलणारे, चौकशी अंती जे व्हायच तें होईल पण सद्या तरी जातीच्या ठेकेदार मंडळीनी शांत डोक्यानं या प्रकरणावर विचार करायला हवा, अन्यथा या घटनेमुळे होणारे समाजिक परिणाम खुप भयावह असतील,

आय पी एस अधिकाऱ्यांना ब्लँकमेल करण्याचा तर हा प्रकार नाही ना?या सर्व गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे.शेवटी सगळं काही सोशल मीडियाची वाहूटळ आहे. इथे सत्य असत्य बर वाईट आणि दूरगामी परिणाम पाहिले जात नाहीत. जो तो त्यांच्या फेसबुक ऑल वर न्यायालयाचे निर्णय दिल्यागत पोस्ट करत राहतो, न्यायाधीशाच्या भूमिकेत गेलेला, अतिउत्साही, विवेकशून्य आणि संवेदनशील समाज विनाकारण संकटांना आमंत्रण देत असतो.यांची किंमत माथी भडकवणाऱ्या भाड खावुना नाही तर समाजातील गोर गरिबी लोकांना सहन करावी लागते, यांमुळे होणारे समाजाचे नुसकान आणि बिघडलेंलें सामाजिक स्वास्थ यांची भरपाई होणारी नसते. शेवटी ज्यांना कायद्याचं भय होतं त्यांच्या मनासारखे झालं नवटक्के मैड्म ची तडकाफडकीं बदलीची चर्चा आहे,खरं ठरले तर आत्ता फटाके वाजवून आनंद व्यक्त करायला मागे पुढे पाहणार नाही.

*लक्ष्मणसूत*

Thursday 29 November 2018

ज्या माणसाच्या बलिदानावर महाराष्ट्र पेटला,त्यांच्या कुटुंबाची चूल पेटतें ? जल्लोष करायचा का ?


जल्लोष करायचा का ? जुमला तर नाही!

सरणावर पेटलेल्या प्रेताला मुखाग्नी दिल्यानंतर आपली जबाबदारी संपते का ? बलिदान दिल्यानंतर शिल्लक राहतेती फक्त राख! ज्यांच्या अहुतीणे या संघर्ष ज्योती प्रज्वलित झाल्या तें विझून गेले आहेत.धूसर झालेल्या आठवणीच्या कोपऱ्यात समाजान त्यांना कधीच पुसून टाकल आहे. बलिदान, हौतात्म, शहीद, कामी येणं हे फक्त श्रध्दांजलीच्या कार्यक्रमा पुरतं असतं ? कोडग प्रेम आणि नाटकी अश्रू आणून संवेदनांचा आटलेला पाझर दुःखाचा पदर उकलू शकत नाही. आरक्षणाच्या संघर्षमय यज्ञकुंडात तत्कालीन सामाजिक आणि राजकीय लोकांनी आहुती म्हणून मारलेल्या लोकांना चक्क आम्ही विसरून गेलोय,

भिंतीवर लटकवलेल्या फोटॊ कडे बोटं दाखवत एका विशीतील तरुणाला विचारलं, हा फोटॊ कोणाचा आहे? तरुणांने आगोदर निरखून पाहिले, २मिनिटं डोक खाजवलें,मेंदूला ताण दिला, इतिहास शोधून पाहिला पण कोन ? या प्रश्नांच उत्तर मिळत नाही हे त्यांच्या चेहर्यावर दिसत होतं, रूबाबदार मिश्या, भारदार भाळ, बलदंड शरीर यष्टी, कोन आहे ? मि नाही ओळखलं, असं म्हणत जावूद्या आपल्याकाय करायचं,आगोदर आरक्षणाच बोलू.असं म्हणतं विषय टाळण्याचा प्रयत्न केला. माझं टाळक सरकल, ज्या माणसाच्या बलिदानावर महाराष्ट्र पेटला, ज्यांनी समाजासाठी आरक्षण दिले नाही सरकार ने फसवलं, उद्या समाजाला काय उत्तर देवू म्हणून आत्मबलिदान दिले, त्यांना कीती कस्पटासमान  टाळीवारी टाळाटाळी करतोय.कै.अण्णासाहेब पाटील या युग पुरुषाला विसरणारा़ हा समाज आज फटाके वाजवून जल्लोष करतोय.याचं वाईट वाटत,42 लोकांची  सहा महिन्यात साधी आठवण देखील झाली नाही.आणि करत देखील नाही कीती क्रतघ्नपणे ज्यांच्या मरनावर आणि सरणावर आरक्षणाची पोळी भाजनार त्यांच्या बाबतीत वागत आहोत.

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटला, आरक्षणाच्या वणव्याने एक नाही दोन नाही तब्बल 42जणाचे बलिदान घेतलें, या पैकी बीड मधील बरेच जन आहेत, कुणी रेल्वेरूळ जवळ केलातर खिशात चिठ्ठी लिहून गळफास घेतला, विष पिवून आरक्षणाचा विषय मार्गी लावा म्हणत स्वतःचा विषय संपवून घेतला,तेव्हा कुठे सरकार ने विधेयक पारित केले, आनंद उत्सव करतांना दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, त्यां कुटुंबांच्या दारात फटाके वाजवता, घरातील रडनारा आवाजात तुमच्या कानावर आलंच नाही का?  काकासाहेब, राहुल बाळासाहेब, स्वाती, यांची आई,तिची काय आवस्था असेल, वडील कोणत्या कोपऱ्यात तोंड घालून रडत असतील, अर्धांगिनी च्या मनातील काय विचार असतील, मिळालंय! पण पहायला तु कुठे? लोक आनंदने फटाके वाजवत आहेत.पण आमचं दुःख कुणाला सांगायचं! कल्पना करून दुःख जाणीव होतं नाही, पण संवेदना जाग्या ठेवून दुःख हलकं करू शकतो.

आज आणखी एक गोष्ट महत्वाची आहे,मडय़ाला साक्षी ठेवून सरकार कडून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांच काय ? 10लाख रुपयाचा चेक कुठे ? शासकीय नोकरीतरी दिसते ? घर तरी ? साधं शौचालयाच अनुदान तरी स्मारकाच काय घेवून बसले, पंचनाम्या नंतर कुठला अधिकारी फिरकला का ? या प्रश्नांची उत्तरे कशी मिळतात तें पहा.कोरडय़ा आश्वासनांने पोट भरत नाही. हजारो लोकांच्या समोर,दुःखवट्याच्या घरात  बुडालेल्या लोकां दिलेलं कुठले आश्वासन पाळलं याचं उत्तर मिळेल का ? अधिकारी ओघात बोलत गेले मंजूर मंजूर पण प्रत्यक्षात काहीच मिळालं नसल्याचं धक्कादायक वास्तव या बाबतीत आवज उठवणार कीं आपला काय संबंध आरक्षण तर मिळालं चला आनंदाच्या तोऱयात फटाके फोडू कुठल्या माणुसकीचे प्रदर्शन करतोय,

आज सर्वच जण हा हर्षआनंद घेतं श्रेयवादाच्या गदर्भ शर्यती मधे दौडू लागले.पेढे भरवण्या पासून तें बँडबाजा बारात काढत घोषणा देत गुलाल उधळणारे कमी नव्हते.नक्की आनंद उत्सव साजरा व्हायलाच हवा, स्वतंत्र्याच्या ७०नंतर मराठा समाजा बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेतं,१६%आरक्षण आम्हीच देवू शकतो म्हणतं साफ नियत सही विकास चे पाढे गिरवले, यात अधिवेशनात विरोधी पक्षातील लोकांनी पण चर्चा न करता मूक संमती दर्शवली, चर्चा न होता विधेयक दोन्ही सभागृहात पारित झालं. मुख्यमंत्री महोदयांनी फतें झालीच्या आविर्भावात पेढे भरवले, अभिनंदन प्रस्ताव घेण्यापर्यंत मजल गेली. जे घडलं तें नाटकांच्या पडद्यावरील चित्रा प्रमाणे अगदी ठरवून केल्यासारखे, संवेदशील पणे फसवण्याचे कसब आल्याने साखऱ्याचे पोतें तोंडावर बांधून पटवून दिले, पण जास्त साखर पण डैबिटीज ला आमंत्रण देते हे विसरले वाटत.आज ही अभ्यासक आणि मराठा समाजातील तज्ञ लोकांनी हे आरक्षण टिकणार नाही असा सूर आळवत आहेत, मात्र मुख्यमंञी यांच्या सांगण्यानुसार मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद आम्ही दिला आहे, मागच्या सरकार ने दिलेल्या आरक्षणाला कोर्टानं उपस्थित केलेल्या मुद्दे  विचारतं घेवून आम्ही विधेयक तयार केले जसं कीं सामजिक आणि आर्थिक मागास, आहात का ? तर मागासवर्ग समिती कडून, शिफारस केली  एक्स्ट्राऑडनरी सीचवेशन तयार करुन आम्ही आरक्षण देत आहोत या मुळे ओबीसीला धक्का नाही स्वतंत्र  प्रवर्ग तयार केला असं स्पष्टीकरण मुख्यमंञी महोदय देत आहेत.मात्र अद्याप आरक्षणाची कसोटी शिल्लक आहेच न्यायालय आणि आक्षेप आणि रक्षण महत्वाचे ठरणार आहे. वकिलांची फौज काही न्यायालयात फायरिंग करण्यासाठी नाही, तीथे कायद्याची कसोटी महत्वाची आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल खुला केला जात नाही,तो न्यायालयात द्यावा लागेल. ५०%ची मर्यादा, स्वतंत्र प्रवर्ग आणि बरंच काही यांमुळे आणखी खरचं आरक्षण टिकेल का ? हा देखील जुमला आहे का ? असं वाटणं साहजिक असावं.सामाजिक जबबादारी म्हणून हौतात्म्य गेलेल्यांच्या कुटुंबांसाठी काही तरी सकारात्मक निर्णय होणं गरजेचं आहे.

लक्ष्मणसूत(सुरेश जाधव) 9404204008

Friday 16 November 2018

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या व्यथाच, नव्हे तर चितरकथा !



पांढरभाळ घेवून आभाळ फाटलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त महिलेला येणाऱ्या समस्या ऐकल्या तर डोकं सुन्न होईल
40%महिलांना राशन कार्ड नाही तर 90%मुली उंच शिक्षना पासून वंचित धक्कादायक वास्तव,

घरातील कर्ता पुरुष निघून गेल्यावर आत्महत्या पीडित कुटुंबातील महिलांच्या जगण्यासाठीचा खरा संघर्ष सुरू होतो, 
पांढर भाळ घेवून आभाळ फाटलेल्या एकल महिलेला येणाऱ्या समस्या ऐकल्या तर डोकं सुन्न होईल कुटुंबातील व्यक्ती कडून त्रास, लैंगिक शोषण, आर्थिक विवंचना, आरोग्याच्या समस्या यातच कुशीतून उमललेल्या फुलांना अर्थात पोटाच्या मुलांना सांभाळण्याची जबबदारी,जाणणारा जबाबदारी झटकून निघून जातो पण खरा वनवास सुरू होतो, तो एकल महिलेचा, यामुळे शेतकरी आत्महत्या पीडित महिला मानसीक तणावा खाली वावरत आहेत

शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या योजनां त्यांच्यापर्यंत पोचत नाही,यात घरकुल, राशन कार्ड नावावर नसने ,विधवा पेन्शन न मिळणे, रोजगाराच्या संधी नाही, कर्ज मिळतं नाही , संपत्ती मधील वाटा न देने, जमिनीचे वाद ,  असे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 40% आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना राशन कार्डच दिले नसल्याचे  मकाम च्या सर्वे मध्ये निष्पन्न झाल आहे, तसेच आत्महत्या केलेल्या कुटुंबाकडे कुठलाच अधिकारी फिरकला नसल्याचे महिलां सांगत आहेत,

फोटॊ काढून मदतीचा चेक देणारे,पांढर पेशी बगळे उडून जातात, खुप वाईट झाल लेकरां कड बघून तरी धीर धरा असा फॉर्मेलिटीचा पुळका दाखवणारे, हळहळ व्यक्त करणारे, नातेवाईक पण निघून जातात.दुःख सागरात  ढकलून दिल्यागत गटांगळय़ा खात,पोहायला शिंकताना नाका तोंडात पाणी गेल्यानंतर जी घालमेल होतें ना! तशीच अवस्था होतो,ओरडायला गेलं तरी तोंडात पाणी जात, पण आधार देणारे हात बुडण्याची वाट पहात असतात, पण कशी बसी स्वतःला सावरत, डोळ्यातले अश्रू आवरत, कधी न पाहिलेल्या बाजारभुंगाच्या गर्दीतून वाट काढत, हे कार्यालय तें कार्यालय, तो कागद, शेवटी वैतागून जाते, कधि कधि मलाच का सोडून गेलास!अस आकांताने ऑक्साबोक्सि,पदरात तोंड घालून रडते,पण डोळ्यात.लें अश्रू मुलांच्या समोर कधीच दाखवतं नाही,शेवटी विस्तवाच्या रस्त्यावर अनवाणी पायाचे चालन काही दिवसांनी आंगवळनी पडत, संवेदना बोथट करुन जगण्याचा अवघड घाट पोटाच्या गोळ्यासाठी जगतें ,ज्यांच्या कडे बघून जगायचं त्यांच्या आठवणी तेंच सर्वस्व !
बरेच जण मारणाराला दोष देतात भेकड, पळपुटा अस म्हणता, बऱ्याच वेळा समाजच्या द्रुष्टिने असेलहि पण स्वतः ला संपवणे काही सोपं असतं का हो , काय वेड लागेल, नसतं किंवा मरणाची नशा चढेलेली नसते, आत्महत्येसारखा विचार का करतात, जगणं असह्य का होतं,त्याला कारणीभूत आहे, त्यांच्या पुढ्यात वाढवून ठेवलेलें हतबल करणारे प्रसंग त्यांत कुटुंबांतील व्यक्तींच्या गरजा आणी स्वाभिमानान जगणं त्यात समाजाची खोटी प्रतिष्ठा, यातच आर्थिक विवंचना, कर्जबाजारी पणा,नापिकी हि कारण महत्वाची आहे,

शेतकरी जगण्यासाठीची खुप काही स्वप्न पाहतोय, आणी पाहिलेली स्वप्न काळ्या आई च्या कुशीत पेरतो, बऱ्याच वेळा तें नियतीशी लावलेला जुगार ठरतो, पाऊस पाणी झाल तर स्वप्न उगवत, हवेवर डुलत राहत, एक एक इमले चडवत राहत, मात्र अचानक झालेली अवकाळी , गारपीट, असो वा दुष्काळ, सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी होवून जाते.यात दोष कुणाचा असतो, मेहनत केली नाही, असे टोमणे मारणे कितपत योग असतं, अपयश आलं तर उध्वस्त करुन जात, तेव्हा खचून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणा,असो वा इतर योजनां, मार्गदर्शन महत्वाचं असतं तें होतं का ? नसेल तर का नाही. महिलांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी बाबतीत महिलां बालकल्याण आणी आरोग्य विभाग काम काय करत,या बाबतीत ची पोल खोल केली मकामने.

महिलां किसान अधिकार मंच (मकाम) गेल्या 5 वर्षा पासून महिलां शेतकऱयांच्या बाबतीत काम करत आहे. महाराष्ट्रातील महिलां किसान मंच च्या कार्यकर्त्या मनीषा तोकलें यांनी आज मंच च्या वतीने विदर्भ आणी मराठवाडय़ातील 14जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त  कुटुंबांतील  शेतकरी  महिलांच्या  मागण्या चे निवेदन बीड जिल्हाधीकारी यांना दिले. याचं बरोबर सर्वेतील धक्कादायक माहिती माध्यमांसमोर आणली, या पीडित कुटुंबाच्या मागण्या पुढील प्रमाणे या शेतकरी आत्महत्या चे पात्र-अपात्र तें चे निकशात बदल करा, तातडीच्या मदती मधे पाच पट  वाढ करा,  विधवा पेन्शन मध्ये वाढ करा , आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण,  अर्जा शिवाय राशनकार्ड द्या , मोफत आरोग्य सेवा द्या, वारसा नोंदणी,  रोजगाराच्या संधी आणी नवीन कर्ज , लैंगिक छळ व हिंसाचारा पासून सुरक्षा, शेतकरी आत्महत्या संदर्भात स्वातंत्र  हेल्प लाईन चालू करावी अशा मागण्या निवेदना द्वारे देण्यात आल्या.

गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रा 70 हजार शेतकऱ्यांनी नापिकी कर्जबाजारी पणा, दुष्काळ , आर्थिक विवंचनेतून जीवन संपवले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार काय करत असा प्रश्न विचारला तर ? जाहिरातीमधे लांबच लांब कागदोपत्री लिस्ट डोळ्यासमोर येईल, प्रत्यक्ष फायदा कीती झाला ? कीती शेतकऱयांना आत्महत्येच्या निर्णयां पासून वाचवलं ? याचे आकडेवारी कुठे आहे, हे तर दूर प्रत्यक्षात आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या बाबतीत तरी काय निर्णय घेतला हा खरा प्रश्न आहे,1 लाख रुपये मदत दिल्यानंतर, कुठलाच अधिकरी फिरकला देखील नाही असाच काही वास्तव मराठवाडा आणी बीड जिल्ह्यात काही प्रकरणात समोर आले आहे,  धक्कादायक म्हणजे शासनाच्या योजनां आणी सुविधा सुध्दा लवकर मिळतं नाहीत, इतर राज्याच्या तुलनेत तातडीनं मिळणारी मदत खुप कमी आहे, आर्थिक स्थिती सुधारलेला महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र मग बाकी राज्यांत 3तें 5लाख रुपये मिळतात मग इथेच लाख का ?
आत्महत्या ग्रस्त कुटुंबांतील 60%महिलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे, झोप न येणे, डोके दुखी , असें त्रास आहे,
शिक्षणाचे प्रमाण मुलीचे कमी आहे त्यांत उंच शिक्षणात तर 90%मुलींना शिक्षण दिले जात नाही, यात हि जिल्हा परिषद च्या शाळेत 80%मुलें शिक्षण घेतात, शिक्षणाचा खर्च भागत नाही म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडणाराची संख्या मोठी आहे,
महसूल विभाग असेल वा स्थनिक स्तर अधिकारी यांच्या कडून पालकत्व स्वीकारलं जात नाही, त्यांत व्यवहार सुशिक्षित नसल्याने व शिक्षणाचा अभाव म्हणून इतर योजनां मिळतं नाहीत,  अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत, 

आरोग्य विभागातील बीड च्या प्रेरणा प्रकल्पाचे समुपदेशकाचे (मार्गदर्शकाचे पद रिक्त आहे) आशा वर्कर यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं नाही, पंचायत समिती कडून विहीर घरकुल लाभ वेळेवर मिळतं नाही, बँक कर्जासाठी दारात उभी करत नाही, मोल मजुरी, करुन गुजराण, अशा येक अनंत अडचणी आणी परिस्थिती सोबत संघर्ष करत, व्यवस्थेच्या विरोधात लढाई त्यां स्वता ला सावरन जमतच असं नाही, पण दुःख सांगणार कोणाला , सरकार म्हणून काय जबबदारी पार पाडत , शासनाचे अधिकारी फक्त पाटय़ा टाकण्याच काम करता? समाज म्हणून वागणूक कशी मिळते ? या सर्व गोष्टीचा विचार व्हायलाच हवा, आत्महत्या करण्यात अगोदर कुटुंब डोळ्यासमोर ठेवा, दुःख सागरात ढकलून का जातोय आपण ? याचं विचार व्हायलाच हवा! सरकार ची जबाबदारी म्हणून शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबां बाबतीत आत्ता तरी विचार करायला करुन पालकत्व स्वीकारत त्यांना जगण्याच नव बळ देण्यासाठी आधार द्यावा, नोकरी ,क्रुषिपूरक  ऊद्दोग, व्यवसायाच्या माध्यमांतून पीडित कुटुंबाचे सामजिक आणी आर्थिक स्तर उंचावेल,हा आशावाद!

सुरेश जाधव (लक्ष्मणसूत)
मो-9404204008








Tuesday 31 July 2018

हाच तर गनिमी कावा , लक्षात ठेव भावा !

बलिदान नको !  योगदान द्या,  मग आरक्षण कोणासाठी ! 


सरणावर पेटणाऱ्या प्रेताला आरक्षणाची गरज मुळीच नसते , धगधगता अग्नी पेटवण्याच काम करतो , शिल्लक उरती ती फक्त राख , त्याच़  त्या राखेकडे पाहणारा अभागी "बाप" आणी स्वतः
पोट च्या गोळ्याला पेटताना पाहून आतल्या आता जळणारी "माय" टोकाच्या निर्णयाने  तुमची माती होते  राख झाली की सुटलात  "तुम्हीं" तुमच्या जीवावर घर दार सोडून आलेली "भाळ" आणी आभाळ फाटलेली तीच काय ,  ज्यांच्या आयुष्याची सुरुवात  केली त्या नव्या " फुलांना " आणी त्यांच्या स्वप्नांना बेचिराख करुन तुम्हीं निघून जाताय, मग हा लढा कोनासाठी , आरक्षण कोणासाठी ?  पोरक्या पोरांना पोटाशी धरणारा , पाठीराखा राहता नसेल , पोटाच्या पोरांचा आधार संपून बाप आणी माय  निराधार बनत असेल , तर आरक्षणाच संरक्षण नको आम्हांला ! 


अनेक पिड्या ज्यांना घडवायच्या आहेत , त्यांनी बिघडून कसं चालेल, अन्याया  विरुध्द बंड करुन पेटून उठूण  "शंड" पांढरंपेशी व्यवस्थेला "थंड" करायला मराठा लागतोच़, अशा लढय़ात पुरून उरण हें खऱ्या मावळ्यांच़ लक्षण आहे,  गनिमी कावा करतांना , जीव देन कधीच शिकवलं नाही, लोकशाही शासनास व्यवस्थेत निपक्षपाती राज्यघटनेवर आधारित, न्यायाच्या मार्गाने जान अपेक्षित आहे, साहजिकच़  गेल्या अनेक दशकांमध्ये न्यायिक मार्गाने जावून अन्याय वाट्याला येत असेल , चीड निर्मान होणं साहजिक आहे.जाणीव पूर्वक राजकारणासाठी संवेदनशील मुद्यावर सरकार म्हनून पालक असलेली यंत्रणा कुचकामी ठरत असेल तर , सय्यम सुटे समजू शकतो , मराठा आरक्षणा बाबतीत तेच झालं. आरक्षणाची मागणी ही अनेक दशकांची आहे, मात्र  2004 साली  पहिल्यांदा राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात मराठा आरक्षण देवू  (खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटक ) यांना नोकरीत व शिक्षणात आरक्षण देवू , असं गाजर दाखवलं, त्यांचा फायदा घेत सत्ता समीकरण जुळवली , प्रश्न तसाच आहे. तेव्हा पासून आज पर्यंत अनेक सरकार आली गेली, फक्त राजकारण करण्यात पुरतं , आरक्षण आठवलं , सत्तेवर गेल्यावर मागचे पाढे पंचावन सुरु झाले , 2014 साली भाजप सरकार सत्तेवर आले, आरक्षणासाठी विधेयक पारित करुन कायदा केला पण , हाय कोर्टात अडकलें, डोकं गहाण ठेवल्यागत पुन्हा चूक लक्षात आली ज्या समितीच्या आधारे आरक्षण  दिल्याचं "राण" पेटवल ती समिती सवैधानिक नाही, तो पर्यंत कोणालाच़ काही मालूम नव्हते ?

 फक्त लाळ घोटी धोरण राबवून "मामू" बनवण्याचं काम केल, पुन्हां असचं  कुटं पर्यंत चालणार , 58 आदर्श मोर्चा च्या अंती काही तरी निर्णय अपेक्षित होता पण तेव्हा पाने पुसण्याचे काम केल,  आजचे मरण उद्यावर ढकुण राज्य सरकार मोकळं झालं , आपण कसं फसवलं हें चर्चा करतांना , "पंत" संत पनांचा आव आणून वागू लागले, म्हणून दिल्या घेतल्या वचनांची आठवण करुन देण्यासाठी आणी कामचुकार सरकार ला जाब विचारण्यासाठी  ऑगस्ट क्रांती सुरु झालीय, यात महाराष्ट्राच़ खुप मोठं नुकसान झालं,आणखी होनार आहे, यात आर्थिक नुकसान मोजता येईल पण समाजिक शांतता भंग करणारे वादळ उठले याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे,  नाचता येईना अन् म्हणे आंगन वाकडे अशी गत झाली, जबाबदार पदावरील व्यक्ती कडून बेजबाबदार टेबलावर , दूध खूळ वक्तव्याच़ विखारी विष त्यांची गरळ टाकली , शहाणपणानी मिरवणारी माणसं येड्या गतवागू लागली की डोकं भडकत, हेच कारण झालं  भडका उडण्याचे , यात लाभार्थी बांडगुळ वळवळ करु लागले , आरक्षणाची खरी बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले , "लांडगा आला "या गोष्टींची गत झाली.


आरक्षणाच खरं वास्तव समाजा समोर येणं गरजेचं आहे , महाराष्ट्र सरकार  आरक्षण देण्या संबंधी काय करतं हें मुख्य मंत्र्यांसह ,"फाईल" चे विधान करणाऱया विधानसभा सदस्यानी खरं समजवून सांगावं , भावनिक गोडवे गायच़ थांबवा , असो  पण आत्ता  मागासवर्ग आयोगा कडे प्रकरण दिले, त्यांचा अहवाल येणं बाकी, इथं पर्यंत प्रकरण येवून ठेपल, राज्य मागास वर्ग आयोगा च्या अहवालानुसार किती टक्के आरक्षण द्यायचं हें ठरेल ? नंतर विशेष अधिवेशन बोलवून, त्यावर बहुमताने ठराव  घेवून केंद्राकडे प्रस्ताव पाठवणे , नंतर परिशिष्ट 9 अंतर्गत समावेश आदी कायदेशीर प्रक्रिया त्यामुळं आरक्षणाचा मार्ग आणी प्रक्रिया कीचकट आहे, वेळ लागणार त्यामुळं 
सय्यम ठेवावाच लागणार आहे.

कायदेशीर बाबांविषयी जाणून घाई आणी अतताई पणा करण हें आडमुठ धोरण होईल, कायम स्वरूपी आरक्षण हें सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होवूनच़ मिळणार आहे, कलम( 31ब )परिशिष्ट 9 मध्ये समावेश करण्या बाबतीत तज्ञ मंडळी आग्रही आहेत, मात्र या साठी राज्यसरकारच्या बहुमतांची गरज असतेच , संवैधानिक मार्गाने जाताना या गोष्टीं चा विचार होणं अपेक्षित आहे, मराठा आरक्षण समर पेटत ठेवून भाजप सरकार ला पायउतार करण्याच़ षंढयंत्र सुरु ठेवण्याचा कट आहे का ? असा प्रश्न निर्मान होतो , यंत्रणा मोंडखळीस आणून वा सरकार पाडून मराठ्यांच्या पदरात काय पडणारं? पुन्हा तापवलेल्या तव्यावर भाकरी भाजनारे आणी ताव मारणारे दुसरे काही कमी नाहीत ,म्हणून  हाती धूपटन आलं असं होवू नये.

नव सरकार जून धोरण राबवत नाही पुन्हां नव्यानं  संघर्ष आणी त्यांचं बलिदानाच्या पाठीवर उभी राहणारी क्रांती किती सरण पेटवनार , यासाठी विचार करावा लागेल, सरकार च्या मानगुटीवर बसलेल्या मराठा समजाची समजूत काढून चालणार नाही, हें सरकारला कळून चुकलं आहे, ठोस पणे ठोक निर्णय तर घ्यावाच लागणार आहेच़ , या शिवाय गत्यंतर नाही , पण या प्रकियेत वेळ लागणार आहेच ! म्हनून मराठा बांधवांना कळकळीची विनंती , पेटलेल्या मराठा आरक्षणावर पोळी भजनारा दुसरा वर्ग सक्रिय होतोय, यात हाफ चड्डी पासून ," नेहरू"  पायजम्या पर्यंत चे सगळेच , हातात "विळे" घेवून निघाले आहेत, यात कुणाचा हात "डावा" आहे तर कुणाचा "उजवा" यांना आरक्षणाच़ देन घेणं नाही, सरकारच़  "हें बेन" बदल पाहिजे हें पातळ यंत्री कट कारस्थान सुरु आहे, गोर गरिबी लोकांच्या मडय़ावर राजकारणाच़ लोणी खाणारी हरामखोर डोम कावळे टपून आहेत, यात निष्पाप आणी निरागस तरुण पोरांचा वापर केला जातोय, क्रुपया करुन तसा वापर होवू देवू नका, लढय़ाला यश आली तर लढणारे हात सोहळा भोगण्यासाठी शाबूत राहिले पाहिजेत , मावळा "कामी" येता कामा नये हें छत्रपती सूत्र लक्षात ठेवा, रागाच्या(दुःख) भरत घेतलेला निर्णय आणी आनंदात दिलेला शब्द महागात पडू शकतो, म्हणून डोकं जाग्यावर ठेवा,  विवेक बुद्धीने , विचार करा, जबबदारीची जाणीव ठेवून जन्म दिलेल्या जन्म दात्यांच्या स्वप्नांचे चीज करण्यासाठी तुमचं अस्तित्वात असन गरजेचं आहे, सरकार वर पाहिजे तेवढा दबाव आणी जरब बसवण्यात यश आलय, नाहीच जमलं तर ठोक पाऊल आहेच पण कुठल्याच  मराठ्यांच्या लेकीच़ कपाळ पांढरं पाहण्याची इच्छा नाही, एव्हढंच़ नाही तर माईचा आक्रोश आणी बापाचा फुटलेला कंठ त्यातून येणारा -ह्दय पिळवटून टाकनारा करुण आकांत , त्यातून वाहणारे अश्रूचे पाट असा अवखळ   "घाट"नकोच़ , रक्षा बंधनं साठी वाट पाहणाऱ्या  प्रत्येक बहीणचे संरक्षण करणारे तरुण  मनगट बळकट पणे पाठीशी राहिले पाहिजे, यासाठी आत्मत्याग , आत्मबलिदान , आत्महत्या , जीवनाचा त्याग नको, 


गेलेला जीव परत येत नसतो, "बाप"म्हणून असणारी व्यक्ती कोन हें दाखवण्यासाठी, कुंकवाचे संरक्षक कवच जगलें पाहिजे ,  धीर देणाऱ्या कुंकवाची जागा कोणीच घेवू शकत नाही,  मूल म्हणून जन्मदात्यास दुसरा कोनी आधार होवू शकत नाही, म्हणून कुटुंबांसमोर अंधार उभा करुन निघून जान बरं नव्हं,  कारण व्यक्तीच़ स्थान दुसरं कोनी घेवू शकत नाही, आर्थिक मदत नाही तर भावनिक आधार महत्वाचा असतो, प्रेमळ व्यक्ती च्या सरणावर बांधलेला ताज महल नेहमी मनात "सलत"असतो.म्हनून "सात"बलिदान देणारे मावळे गेल्याच शल्य बोचत राहिल, समाज म्हनून तुमच्या बलिदानाचा इतिहास आम्ही कधी विसरू शकणार नाही, पण कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी तुम्हीं जगणं अपेक्षित होतं.

आरक्षणाच्या जोरावर उद्याच्या पिड्याच़ भविष्य अवलंबून आहे , तुम्हाला चटके सहन करावे लागले, घामाचे रक्त गाळून आणी डोळ्यांची दुर्बीण करुन अभ्यास केला पण उचित यश मिळाल नाही , परिस्थितीच्या जोखडातू शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न भंग पावले , कारण होतं  शिक्षणाच़ शुल्क , बापाच्या रडवलेल्या चेहऱ्यावरील गर्भ गळीत झालेली कैक स्वप्नांची रांग डोळ्यातून वाहून जातांना पाहिली , माझा मुलगा डॉक्टर व्हावा कोणत्या  बापाला वाटणार नाही पण, समोर चा फीसचा डोंगर डोक्यानं धडका देवून फुटणार नाही हें कळून चूकल होतं तर अधांतरी शिक्षण सोडव लागणारी बरीच बांधव आहेत, पण धीर खचून न जाता सय्यमाने शिखर सर करता येते, छत्रपती च्या लढय़ा वर्ष च्या वर्ष चालत होत्या, म्हणून मावळे न गमावता गनिमी घायाळ करुन घालवला पाहिजे ! हाच तर गनिमी कावा , लक्षात ठेव भावा ! 


सुरेश जाधव (महाराष्ट्र1)
मो-9404204008

Tuesday 24 July 2018

बिना शेंडीचा "चाणक्य" ! बोला की "साहेब" ?

  • .


मराठा आरक्षण,  "जाणता" राजाची अस्पष्ट भूमिका !

राजकारणातील "चाणक्य" शेंडी (नसलेला) यांच मराठा आरक्षण संदर्भातलें निवेदन (पत्र ) वाचलं ! सरकार च्या भूमीकेवर संशय घेत ! अतिशय सावध पवित्रा घेतलाय ? शांत संयमाचे आवाहन केलें! त्यांत जेवढी मराठा आरक्षणाची काळजी त्या पेक्षा obc आरक्षणाला धक्का लागू देवू नका ? असा इशारा करुन पुन्हा निसटून जात असलेली "वोट" बँक सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला ? वा साहेब छान अभिमानाने आमच्या छातीत "गोळा"उठला साहेब ! इथं मराठ्यांची पोर मरायला लागली ! स्वतःच जीवन संपवत आहेत, तीथे तुम्हाला obc ची काळजी, एस.सी, एस.टी,  ओ बी सी ला धक्का लावता कामा नये ? तुम्हीं जाणते आहात नां तर मराठा आरक्षणाच खरं काय ते स्पष्ट सांगा ? राज्य सरकार च्या अखत्यारित आहे.असे उच्य न्यायलय सांगत .जे मुस्लिम आरक्षण टिकलं तसं मराठा आरक्षणाच काय झालं ते तर  खरं सांगा ? आरक्षण देता येते का ? नाही?  नसेल तर अडचण काय ? द्यायचं तर कसं ? याबाबत आपली भूमिका स्पष्ट महाराष्ट्राला सांगायाचं सोडून , आपलं कळलाव धोरण सुरुच आहे.

तुमच्याच वरदहस्ताने आमच्याच समाजातील मूठभर चिमूट भर "जातभाई" अर्थात समाज बांधव "सम्राट" झाले.कुणी "सहकार सम्राट" कुणी "साखरसम्राट" कुणी "शिक्षणसम्राट " महर्षी ची काही कमी नव्हती. त्यांत तुम्हीं बागायतदार भागाचे पाण्यानं पुष्कळ दान दिलेल्या शिवार चे !  तुम्हीं आपलपोटी धोरणांचा पाऊस पाडत ! फक्त येका भागाचा विकास केला. तो तुमचा डोळ्या समोरचा सुजलाम सुफलाम पश्चिम महाराष्ट्र याबद्दल आपलं कौतुकच शेवटी "अगोदर पोटोबा नंतर विठोबा " हें ही आम्हांला कळतय .पण नंतर आमचा अर्थात जाती चा विचार होईल पण नाही. पक्ष पातीपनांचं ग्रहण लागल्यागत आपणास या बांधवांचे प्रश्न दिसलेच नाहीत. ओसाड माळरानावर करपून जाणारे शेतकरी दिसलेच नाहीत.आपल्याच संस्थेच्या दारात अँडमिशन साठी ताटकळत उभा राहिलेंला बंडीतील शेतकरी बाप दिसला नाही ! का तर सत्तेचे आवरण आपल्या डोळ्यांवर होते. त्यांत स्कॉलर विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही संस्थांनिकाची बिना भांडवली कंपनी असते. यात वोट बँक पण भरते आणी नोट बँक पण दुहेरी फायदा होतो म्हटल्यावर कोनांचं काय ?  यात उसाचा पैसा असलें आपल्या भागतील सधन कुटुंब एपतीने पैका भरत होती.त्या स्पर्धेत आम्ही कधीच गळून पडलो होतो. आमचे प्रश्न मांडनाऱ्या "गड्या" आपल्या समोर पाय घड्या घालत होत्या त्यात त्यांचं भलं झाल.' अपना काम बनता--मे गई जनता' या धोरणांने सर्व काही सुरु होतं . मात्र या धोरणां मूळ मराठा समाजाचं कधी न भरून निघणारे नुकसान झाले याला जबाबदार कोन ? साहेब उत्तर द्या


वा ! मानलं बुवा साहेब ! आपली भूमिका अजब आणी आपले निर्णय गजबज , महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री होते आपण ? 2 वेळा केंद्रीय मंत्री सुध्दा होते ? दिल्लीतील वजनदार नेते , विरोधकांना आपली करंगळी सुध्दा सापडत नाही ?  आपल्याच देखत मंडल आयोग लागू झाला ?  नामांतर आंदोलन तर आपणच खेळलात ?  पुतळे वाद तर किती भूतलावर केलें ? किती किती लोक रस्त्यावर उतरली. यात आरक्षणा बाबतीत कित्येक समित्या आणी आयोग आले त्यांत आपलं म्हणणं कधी स्पष्ट मांडलं त्यांच्या साठी काय केलं ? आज विचारायचं नव्हतं पण प्रश्न उपस्थिती होतो.आपल्या माणसांनी आपल्याच लोकांना कसं नागवलं! गरजे पुरतं वागवलं ! वाऱ्यावर सोडून भिकेला लावलं ! याचं उत्तर शोधायचं होतं , साहेब आपण ठरवलं तर पंतप्रधान बदलू शकता , राज्याची सत्ता तर आपल्या बाये हात का" खेल" पण अजून मला समजलं नाय मराठा आरक्षण म्हटलं की आपण त्यांची "टिंगल"तरी करता किंवा "बगल" तरी देता अशी भूमिका ?

कै.अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी आयुष्यभर लावून धरली शेवटी अपयश यांमुळे खचून गेले.तेव्हा पासून अर्थातच 1990 पासून या मागणी संदर्भात मराठा समाज आग्रही आहे.त्यांचं कारण समाजिक आणी आर्थिक पीछे हाट ! पण आपल्या राजकारणाचा तो धडाडीचा काळ होता.आपल्याला तेव्हा पासून  2014 पर्यंत या प्रश्नाकडे लक्ष्य द्यावं असं कधी मनातून वाटलच नाही. पुन्हा निवडनुक तोंडावर आली की त्या अगोदर आपल्या चेल्यांकडून  बऱ्याच आरक्षण यात्रा चे महानाटय़ प्रयोग पण केलें. शेवटी चौदाला धोका लक्षात आला की ?  तुम्हीं अस्सल राजकारणी ! 2014 मध्ये 16% आरक्षणाचा फुसका बार सोडला ? येवढच नाही तर घटनां बाह्य आरक्षनाचे आमिष दावखवले.ज्याचं घोंगड न्यायालयात अडकले आहे? का हो साहेब आमच्या गोर गरिबाचे लेकरू शिकून द्यायचं नव्हतं का ? नोकरी तर दूर फक्त चाकरी करावी ?


1999 च्या दरम्यान आपलं अस्तित्व टिकवण्याची वेळ आली त्यावेळी आपल्या नव्या पक्षाला याचं लोकांनी आपला पक्ष "जानता राजा " ची निर्णय म्हनून पूजू लागले भजू लागले ? स्वतंत्र चूल मांडल्या नंतर पुन्हा एकदा समाजाच्या अशा पल्लवीत झाल्या काहीं तरी निर्णय होईल. आपण सत्तेवर आलात थेट पंधरा वर्ष आपण भागीदारी ने सत्तास्थान "रगडुन" काडलें ! कर्जमाफि आदी निर्णय प्रति "बळीराजा"ची उपमा देण्यासाठी आणी कार्यकर्त्यानां घोषणा देण्यासाठी  फायद्याचे ठरले कारण कर्ज माफित पण पक्षपाती पणा झाला." पश्चिम "बाजू सरस ठरली.असो शेवटि आपण राजकरण "पट्टु ", लाभाशिवाय वेळ आणी अर्थ ,व्यर्थ खर्ची करु नये.  या नुसार आपण आज तागायत काम केलेंली संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.

खंत येवढीच आहे पहाडासारखे तुमचे व्यक्तीत्वं आणी कर्तुत्व पण मराठा समाजासाठी वांझोटी का ठरले वो ?, शिवस्मारक , मराठा आरक्षण , गड किल्ले संवर्धन , अभ्यास क्रमातील छत्रपतीचा खरा इतिहास, "छत्रपती शाहू स्कॉलरशिप " अण्णासाहेब पाटील महामंडळ भरीव आर्थिक मदत, मराठा समजातील मुलांचे उच्य शिक्षणातील प्रमाण वाढवणे.मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत ,
मराठा वसतिगृह संदर्भात ठोस पाऊल ?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत का ? साहेब आपल्या पक्षाकडे? कागदोपत्री उत्तराचा भूतकाळ सांगुन भविष्यात बदल्याचे आमिष दाखवू नका ? आज दिशाहीन झालेल्या तरुणांना आरक्षणाचे म्रूगजळ आज गोड वाटू लागले.कारण "पाटील" असलेला समाज भिकाला लागलाय?  तशी तुमच्या चिमूटभर बगल बच्चाचीचलती आहे.कारण ते आज  "सम्राट" वरून "माफिया" झाले आहेत हें वेगळं सांगायला नको ? पण मराठा समाजाचं वास्तव विचित्र आहे.गावातील मुलं किती टक्के शिक्षित आहेत , त्यांत ऊच्च शिक्षणानं पुढारलेली किती आहेत ? क्लास 1किती ? एम बी बी एस ? एम डि ?  या बाबतीत "पश्चिम"भाग वगळता आकडे वारी काडा बरं जरा एकदा मग लक्षात येईल.याही पेक्षा आपण शेतकरी आत्महत्ये बाबतीत खुप सजग आहात म्हणे ? मग तोही आकडा घ्या एकटय़ा मराठवाडा आणी विदर्भात 42 आत्महत्या मराठा समाजच्या आहेत.मग तरी तुम्हांला जातीचं देन घेणं नाही .तुम्हाला काळजी obc,  sc, st, च्या मताची कारण भाजप सरकार चा डोळा त्यांच्यावर गोळा झालाय. शेवटी मराठे कुटं जातील ते तर आपलें आहेत."सत ना गत " पण लोकांच्या लक्षात येतय.58 मोर्चा मध्ये कुणाचं किती पाठबळ आणी संख्या बळ होतं.पण या मोर्चा नी येक झाक झालं, श्रेय वादच संपुष्टात आणला, बेगडी पुळका दाखवणारी माणसं बाजूला केली, तर "पुडी" सोडणाराची काडी लावायला मागे पुढे पाहत नाहीत.आत्ता जन मतांचा उद्रेक झाला आहे, "नवरा मेला तरी चालेल पण सवत राडव झाली पाहिजे "ही शेंडी ची  राजनिती तुमची असली तरी लोक आत्ता जाणून आहेत.

तुम्हाला अट्रोसिटीची काळजी ती असायलाच पाहिजे, कारण तुम्हीं "पुरोगामी " अट्रोसिटीचा कायदा बदलू देणार नाही, obc आरक्षनाला धक्का लागू देणार नाय ? एस सी एस टी  वरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत ? अशी तुमची भूमिका ? नाय  तुम्हीं काळजी करायलाच पाहिजे? पण यात महाराष्ट्रातील मराठा समाज कुठंय ! कुणबी बांधव ते पण मराठा आहेत , त्या obc मधील जागेची वाटणी करा ना साहेब तुमची जात कुठंय ?  हो आत्ता आठवलं तुम्हीं पुरोगामी नव्हं का ?  काय बुरखा पांगरलाय राव झक्कास ! "घरचे नागवले येशी पाशी , दाशीचे डोहाळे पुसी"अशी गत झाली ?

भाजप वाल्यांना तर  obc सह इतर मागसवर्गीय यांच्या वर डल्ला मारायची नामी संधी आलीती ते सोडणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहेच महाराष्टातील 60% मराठा समाज हा कॉँग्रेस राष्ट्रवादी मध्ये 20% शिवसेना 20%भाजप आणीउरला सुरला 10%इकडे तिकडे , मग ओबीसी ची  "वोट बँक" 52%आरक्षण लाभान्वित घटक म्हणजेच मी लाभार्थी यांना नाराज करुन कसे चालेल .भले मराठा झाला तरी चाललेलं म्हनून नोकरभरी थांबवायची नको? असा घाट सुरु आहे. यात मराठा आणी इतरवाद लावून पोळी भाजण्याचे षडयंत्र सुरु आहे.सरकार आणी विरोधक यांच्यात त्राता,  वाली, तारक असं प्रामाणिक कोणीच नाही हा गैर विश्वास या तरुणांत बळावत चालला आहे.तो लोकशाहीस घातक आहे, अशी परिस्थिती ओढवून घेण्यात इथली राजकीय इच्छा शक्ती कारणीभूत आहे. संवेदनशील मुद्याच्या गरमी वर स्वार्थी राजकारणाची पोळी कशी भाजली जाईल यांचा विचार करणाऱ्या औलादी सत्तेवर आल्या त्यामुळं वाटोळं झालं .

आता कोणाचं किती योगदान बिगदान आहें ते घाला चुलीत आदी आरक्षण द्या या हट्टाला पेटलेल्या तरुणांनाची समजूत कशी काढणार ?  का पुन्हा यांच्यात लढाई लावायची दंगली घडवायच्या रक्तपात करायला लावून, दंगली वर रक्त रंजीत सत्ता मिळवायची हें ठरवा, यात आत्ता जातीच्या नावावर स्वार्थी पोळी भाजनाऱ्याच्या बुडा पर्यंत ऊब जाणार हें निश्चित आहें? जाती वादला खत पाणी द्यायच थांबवा ! मराठा तरुणां मधील तीव्र असंतोष आत्ताचा नाही याला बरीच दशक जबाबदार आहेत, यात कोणते पक्ष होते आणी कोणते पिल्लू यांचा वाट किती ? हें सर्वांना ठावूक आहे,

यात भिती येवढीच आहे ज्यांच्या साठी चे आरक्षण समर सुरु तोच यात खचून आत्महत्या करतोय.दुर्दैव याबाबतीत गेंडय़ाच्या कातडी च्या गाजरानां काहीच देन घेणं नाही उलट तोंडातून विखारी विष ओखूण आगीत पेट्रोल टाकीत आहेत, पण लक्षात ठेवा हा आता पर्यंत मूक असलेला मोर्चा आत्ता  ठोक मोर्चा  झाला यात पांढरपेशी विरुध्द ची खदखद संतापातून बाहेर येते, यांचा रोख ठोक महाप्रसाद घेण्याचं अहो पुण्य एकास लाभले , त्यांची "खैर" झाली तर दुसरे "भांबारुन" गेले म्हंजे कानाऊन गेलं !

शेवटी आरक्षण हें काही कपाटात ठेवलेली फाईल किंवा धनाची पेटी नाही , ते घटनेमध्ये आणी न्यायालयाच्या चौकटी बसवले पाहिजे  हें ही आम्हांला कळत , जसं आहे तसं कायद्याच्या कसोटीत बसवायचं काम सरकारच आहे.यात वेळेच गाजर नको ? ठोस निर्णय हवा आहें,  म्हनून ठोक मोर्चा सुरु आहे यांची तीव्र जाणीव सरकारनं घ्यावी अन्यथा , पेटले ल्या प्रत्येक सरणावर क्रांतीची मशाल पेटायची वाट पाहता ? मायबाप सरकार काय ते या तरुणांना समजवून सांगा फक्त गाजर नको" शेवटि  

सरणावरती जळतात आज अमुची प्रेते, उठतिल त्या ज्वाळा मधुनी भावी क्रांतीचे नेते,
लोह दंड हें पाया मधले खळाखळातुटणार , आई! खळाखळातुटणार गर्जा जय जय कार क्रांती चा गर्जा जय जयकार !  


 सुरेश जाधव
मो -9404204008,

Sunday 22 July 2018

समतेचे क्रांतीस्थळ ,भक्तीचे वाळवंट - पंढरीची वारी


आषाढी एकादशी

आता विश्वतमके देवे !या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानांच्या मागणी मधील सर्व समावेशक तत्व हें वारकरी संप्रदायांच्या व्याप्ती आणी मर्यादा या बाबतीत बोलकं आहे .वारकरी विचार धारेने आजवर जी आदर्श घालून दिली.त्यामुळे समाजिक मूल्यांची बीजारोपण 12व्या शतकां पासून आजवर या मातीत तशीच जिवंत आहेत . भेद भाव तोडोणि घेतला प्रेमाचा गरळा। शुद्ध नाम श्री हरिचे लागला निज मुखी टाळा । हरी स्मरणाचेणी बळे अंकित केलें कळीकाळा । एका जनार्धनी अखंड सुख सोहळा ॥ 

या अभंगाच्या द्वारा भेदाच्या भिंतीनां मूठ माती देत अभेदाची अभेद्य विचार धारा तयार केली. त्या सर्व संत मंडळीनी  समाजिक क्रांती चे हबूक याचं पंढरी च्या वाळवंटात ठोकले होते. कर्मकांड आणी धर्ममार्तंडा विरोधात प्रबोधनाची चळवळ या वेळी सक्रिय झाली यांचे सूत्रधार-ज्ञानोबा यांच्या खांद्याला खांदा देवून चोखा मेळा होतेतर संत कबीर मोमीन हें मुसलमान होते.सेना नाव्ही -होते अशा अनेक संत मंडळीनां एकत्रित करून गोरोबा आणी संत नामदेव यांनी कीर्तन सुरु केलें यावेळी मुक्ताई जनाई गोनांई या कीर्तनात सहभागी असतं .ही समाजिक समानतेची गुडी याचं कीर्तनात उभी राहिली.

समर्थाच्या पंक्ती भोजने । तळील्यावळी ल्या एकची पक्वान्ने ॥
या प्रमाणाची प्रचिती येत असे.ज्या वेळी स्पृश्य-अस्पृश्य तेच्या संकल्पना मानवी मूल्य आणी माणुसकीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करतं होती त्या वेळी पंढरपूर मध्ये  सर्वाना एकत्रित करुन वाळवंटात  "काला"  करण्यात आला.यात
 एक मेका घालू मुखे।  सुखे घालू हुंबरी॥
भानुदास गीती गाता । प्रसाद देत पंढरी नाथ।

या विचाराच्या परिपक्वतेणें  रूढ परंपरा वर वार केला.म्हनून वारी ही आज सर्व अंगाने महत्वाची आहे, वारकरी या शब्दाची महती इथून सुरु होते.

खट नट यावे शुद्ध होवूनही जावे । दवंडी पिठी भावे चोखा मेळ ॥

यारे यारे लहान थोर । याती भलती नारी नर ।

आदी करुन वेश्या ही।  ही आरोळी त्या वेळी ठोकणे हें काही कमी कमालीचे धाडस नव्हते .म्हनून तर समाजिक क्रांती चे वाळवंट हेच शक्ती स्थळ होते तर विठोबा हा शक्ती देवता होता.याला भेदाचा विटाळ आहे.म्हनून तर आज संपूर्ण देश भरतील वारकरी या वारीला वेडावला आहे. या वारी च्या माध्यमातून खूप मोठी जाणीवेची उत्क्रांती झाली. संसारात थकलेला जीव या भोळ्याभाबडय़ाचा देव । पांडूरंगाच्या चरणी लीन होतं.संकटांशी दोन हात करण्याच बळ घेवून जावू लागला.

देवा सांगू सुख दुःख । देव निवारिल भूक या !

हा विश्वास या विठाबाई च्या बाबतीत आहे. म्हनून तर लाखो लोक ऊन वारा पाऊस व्यवस्था अव्यवस्था या बाबतीत विचार न करताना पंढरीची वाट धरतात. या वाटेवर जो भेटलं तो त्यांच्या साठी माऊली असतो ! म्हणजेच प्रत्येक जन हा माऊली रूपात भेटतो. उंच नीच गरीब श्रीमंत हा भेद मुळातच नसतो.यात वैचारिक देवानं घेवाण या बरोबर भावनिक आधार देणारी माणसे अर्थातच" माऊली" यांच्या सोबत गप्पा मरताना मनावरील दुखाचे ओझे  हलके होते.कित्तेक सासुरवाशीण आणी कित्येक सून पीडित, पती पीडित येव्ह्डेच नाही तर पत्नी पीडित या दुःखाला  अश्रू वाटे मोकळे करुन देता. माऊली जाऊ द्या!  हें आधाराचे वाक्य शक्ती आणी बळ देणारं असते.या बरोबर संसाराचे  मिथ्यत्वं सांगणारे संताचे अभंग स्व त्वची जाणीव करुन देतात.यामुळे वारीतील काकडआरती अभंग नाटाचे अभंग आदी अभंग सहज कानांवर पडतात. त्यातून दुःख निवृतीचे  अमृत शिंपडलें जाते.ते असे


 संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ । विश्रांती नाही कोठेरात्र दिवस तळमळ ।
काम क्रोध शूनी पाठीलागले ओढाळ । कवनामी शरण जावू द्रुष्टि देई निर्मळ !

या सर्व अभंगाच्या माध्यमातून संसारी रंजल्या गंजलेल्या जिवांना  जागे करण्याचे काम केलें जाते म्हनून वारकरी तत्व ज्ञान हें उद्धार करणारे आहे.

आषाढी कार्तिकी एकादशी च्या निमिताने एकत्रित येणारा वारकरी चंद्र भागेच्या वाळवंटात पाऊली खेळतो । एक मेकाच्या हातात हात घेवून विठ्ठल विठ्ठल गजरात न्हाऊन निघतो .तो त्यांचा भक्ती भाव आणी श्रद्धा विश्वास महत्वाचा असतो.नित्य नियमाने  आयुष्याच्या जगण्याच्या बळ घेवून जाण्यासाठी वारकरी विठ्ठल चरनी लीन होतात. वर्षभर ती ऊर्जा जिवंत राहते. म्हनून तर सामान्य लोकांच्या प्रेमाचा आणी विश्वासाचाठेवा अर्थात विसावा हा विठोबा आहे.

याचं वारीतील प्रत्येक बदल हा टिपण्याजोगा आहे. प्रबोधनांची पंढरी विधायक वारी ही संदेश देताना.सर्व अंगांचा विचार यात दडलेला आहे.याचं कारण ही तसंच आहे. यावर्षी स्वच्छ वारी निर्मळ वारी हरित वारी व्यसन मुक्त वारी , प्रदूषण मुक्त वारी .जाती निर्मूलनांची वारी, अशा अनेक अंगणाने आज भरून पावत आहे. यातच आधुनिक वारकऱ्यांची संख्या वाढली सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जगातील प्रत्येक देशात वारकरी तयार जाहले आहेत  विश्वस्वधर्म सूर्य पावो ।  या ज्ञानोबा च्या संकल्पनेची अनुभूती येत आहे. राजकीय, समाजिक, आर्थिक , माणुसकीच्या मळ्याला नवं संजीवनी देणारी वारी अनुभवातून कळते.

ज्ञान विज्ञानाची कास धरायला लावणारा "विठ्ठल "हा अध्यात्माचा विसावा आहे. तर विठ्ठल भक्ती ची पताका अखंड फडकवत ठेवणारे  वारकरी या भक्तीमार्गातील नंदादीप , प्रकाश दीपस्तंभ , आहेत.म्हनून तर

पंढरीशी जारे आल्यानो संसारा।  दिनाचा सोयरा पांडुरंग ॥ 
वाट पाहे उभा भेटीची आवडी । क्रूपाळू तातडी उतावीळ ॥ 
मागील परिहार पुढे नाही शीन।झालीया दर्शन एक वेळा॥ 
तुका म्हणे नेदी आणीकांच्या हाती । बैसला तो चित्ती निवडेनां ॥ 

या अभंगाची अनुभूती घेण्यासाठी या माऊली -- हा सोहळा आनंद । तुका म्हणे नाही भेद ॥ 

आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा !


प्रा.सुरेश महाराज जाधव (संत साहित्य अभ्यासक )
श्री बंकटस्वामी महाराज मठ नेकनूर
मो -9404204008

Tuesday 12 June 2018

अष्टपैलू गणू (गण्या )---!(सरपंच)

अष्टपैलू गणू (गण्या )---!(सरपंच)

पत्रकारिता शिकण्याचा श्री "गणेशा" स्व वसंतराव काळे महाविद्यालयातून सुरू करतं सकाळ सारख्या दैनिकात दमदार पत्रकारिता करणारा "गण्या"  आजचा पत्रकार गणेश  सावंत (सरपंच )
आमची ओळख कॉलेज मध्ये झाली तसा तो  गावाकडून आलेला आणि मी खेड्यातला लवकर घट्टी जमली . दोघांना शहर ही समस्या काय हे लवकर न उमलणरी  होती. कॉलेज मध्ये जास्त कोणी ओळखीचं नव्हतं.शोधायचं झालं तर गावाकडंच़ कोणी तरी म्हणून गणेश' प्रकाश' ची मैत्री झाली. पण त्यावेळी अनेक शहरातील मुलं मुली कॉलेज ला यायची त्यांच़  राहणीमान गाड़ी वैगेरे वैगेरे  सर्व काही पाहून आम्ही त्यांच्याशी तुलना करण्याच्या भानगडीत पडत नसतं. भांडण वैगेरे पासून दूर असतं.मुली काय पण मुला कडे पहायला पण भीती वाटायची पण त्यावेळी आम्हाला प्रा गणेश सर प्रा बापूसाहेब  सर
व्यंकटेश सर प्रा सानप सर याचं मार्गदर्शन लाभलं.पत्रकारिते चे पाट गिरवताना वक्तृत्व स्पर्धां मध्ये मात्र बाजी मारली.विषयाची मांडली पासून ते स्टेज करेज या सगळ्या गोष्टी कॉलेज मध्ये  या माझ्या दोस्ता चा कोणी हात धरू शकत नव्हतं .धरलातर  फक्त पायच  शिल्लक होते.सुरवातीला बुजरा स्वभाव पण गुरु च्या तालमीत असा पट्टया तयार झाला की  युवक मोह्त्सव असो की कोणती स्पर्धा त्यात नंबर एक च़ बक्षीस "गण्याच़" ठरलेल.आम्ही दोघांनी बऱ्याच वाद विवाद स्पर्धा केल्या.नंतर  अमोल आणि  गणेश स्पर्धेला जायचे त्या यात के एस के  मध्ये तर ठरलेल असायचं पत्रकारितेचे विद्यार्थि आले की बक्षीस घेवून जाणारच़  हा शिक्का होता.याच कालावधी "गणेश" ला विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मग एन एस एस कँप असो की युथ फेस्टिवल .संस्कृतीक कार्यक्रम सगळ्या मध्ये अग्रेसर राहिला. त्याच वेळी माणूसकी ग्रुप च्या माध्यमातून जेल मध्ये(कारागृह ) अनेक कार्यक्रम घेतले.तसं जेल वर "गण्याच़" जास्तच़ प्रेम असल्यामुळं ते शक्य व्हायचं ! पण तो "कैद"झाला नाही .

 कॉलेज मध्ये तर बरेच वेगवेगळया  प्रकऱणाचा तसा तो साक्षीदार आहे..यात "मध्यस्थ" म्हणून भूमिका महत्वाची ठरली.कॉलेज करतं सकाळ मध्ये पत्रकरिता केली. याच पत्रकारितेचेच्या जोरावर गावांत लोकांची कामे करतं सत्ता मिळवली वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचा सरपंच म्हणून ओळख निर्मान केली.मग सरपंच परिषद पासून ते  सर्व शासकीय आणि राजकीय व्यासपीठावर आवाजाचा दबदबा कायम होताच़ . पाच वर्षात काय कमावलं गमावलं या पेक्षा समाजकारनातून खुप मोठी हुशारी आणि जबाबदारीची समजदारी मिळवली.आजही गावातील  लोक त्याच नाव घेतात. एकाच इनिंग मध्ये बाय बाय करत.पुन्हा सामजिक क्षेत्रात सक्रिय झाला यात  क्रांती मोर्चा पासून ते  माणुसकी ग्रुप या सर्व पातळ्यावर दांडगा जनसंपर्क घेवून आज कार्यारंभ मध्ये पुन्हा  पत्रकारितेचा आरंभ करत बीड च्या पत्रकारिता मध्ये  मध्ये गणेश सावंत (सरपंच ) हे नाव कमावलं आहे.बऱ्याच वेळा एकमेकाच्या  बापाच्या नावांचा उधार करणारे आम्ही एकमेकाचे सल्ले घेतोच. आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वक्तृत्व स्पर्धेतील  शेतकऱ्यांच्या वेदना जागवणारी कथा कायम लक्षात राहते.

सकाळी सकाळी --- वांगे तोंडताना पारुश्या  हातात गूसलेला काटा टच दिशी डोळ्यात पाणी आणतो.मात्र माझं कुटुंब जगवायच़ म्हणून अनेक सलत्या काट्या -हदयात दडपून वांगे बाजारात मांडणाऱ्या माझ्या बापाला जेव्हा गावाकडे जाताना पैसे कमी पडतात तेव्हा त्या सलनाऱ्या काटया पेक्षा जास्त वेदनांच त्यांच्या डोक्यात काहूर माजत कारण बाजार ची वाट पाहणारी मुलं आणि हातातली रिकामी पिशवी.-----! हे दुःख तुम्हांला काय समजणार !  हा सवाल  -हदयाचा ठाव घेणारा असायचा !

गणू आत्ता महापुरुष व्याख्यानातून सांगत आहेत.तर  लेखणीतून  सामान्यचे प्रश्न सोडवत आहेत.तसा माझ्या मित्रा चा पाटील वाडा तयार झाला.फक्त -----_ ची वाट पाहत आहे. त्या वाड्यात चतुर्भज होवून प्रवेश लवकरच होणार असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांकडून समजली. असो.अशा माझ्या मित्राला.यशस्वी माजी सरपंचाला. हुश्शार राजकारन्याला. हरहुन्नरी पत्रकाराला. शब्दप्ररचुर वक्त्याला.पाटलीनीची वाट पाहणाऱ्या पाटलाला अर्थात गणेश सावंत यांना प्रगट दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ! 

सुरेश जाधव (लक्ष्मणसूत)

Saturday 19 May 2018

तीन अंकी नाटिकेचा शेवट -- कर्नाटकी जनतेवर च्या इच्छेविरुद्ध चे सरकार.


येडियुरप्पा च्या बाबतीत "पाल" चुकचूकली !

कर्नाटकतील नाटकी खेळी चे नाटक आता संपले आहे ! इथे कोन जिंकले कोन हरले या पेक्षा न्याय व्यवस्थेवरील विश्वास  लोकांमध्ये द्रढ झाला हे मात्र नक्की !

कॉंग्रेस सरकारच्या विरोधात जनमताचा कौल भाजप ला 104 अशा सर्वादिक जागा निवडून दिल्या.तर कॉंग्रेस ला 78 वर विजय कौल मिळाला.या दोन्ही पक्षाच ठीकपण जेडीएस  ला 37जागा निवडून दिल्या म्हणजे जनमताची तिसरी पसंदी होती. सत्ता स्थापनेत भाजप कडून अतिरेकी सत्तेची महत्वाकांक्षा दिसली यात लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुड्वत राजभवनाच्या पटावर राजकीय पाठ गिरवले. यात अति घाई आणि संकटात नेई या म्हणी प्रमाणे जे घडायचं ते घडलं.यात फक्त कानडी जनतेला अपेक्षित मतदानाच्या कौला विरुध्द राजकीय समीकरने जुळली.(मनाविरुद्ध आणि मता विरुध्द नको असलेले सरकार आणि पक्ष यांच्या हातात सत्ता सूत्र येणे यांचा अर्थ शेवटी कानडी जनतेवर राजकीय बलात्कार म्हणावा लागेल) ज्यालाची तुलना गोवा नी मणिपूर मेघालय त्रिपुरा या बाबतीत जे घडले तेच इथे ही घडले.यात दोष भाजप केंद्रात सत्तेवर आहे म्हणून सर्वजण या बाबतीत बोलणं साहजिक आहे शेवटी सत्ताधारी विरोधी कौल आहेच.पण यात पाच वर्ष कॉंग्रेसची सत्ता असतांना कानडी जनतेने का ? नाकारलं याच उत्तर हे कॉंग्रेस चे अपयश नाकारून चालणार नाही. यात कर्नाटक च्या प्रचाराच्या रणधुमाळी पंतप्रधान पदासाठी मीच म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चडल्या तावातावाने रणांगण गाजवले पण पुन्हा पाच वर्षाची कारकीर्द आडवी आली आणि 78 जागांवर समाधान मानव लागलं यात कुमार स्वामीच्या जेडीएस ला तर कर्नाटकातील फक्त 18%लोकांनी स्वीकारलं होतं. तरी सुध्दा शेवटी - नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे. या म्हणी प्रमाणे  कॉँग्रेस ने  37 जागा असूनही जेडीएसला मुख्यमंत्री पद घ्या म्हणतं आघाडीसाठी हात पुढं केला.नंतर जे घडायचं ते घडलं या तीन अंकी नाटिकेचा आज समारोप झाला.यात कुणाची गेली आणि कुणी मिळवली यावर चर्चा नकोच.

या कर्नाटकी निवडणुकीने मात्र विजयी घोडं दौंड करणाऱ्या भाजपला 104 जागांवर अडकून ठेवलं तर कॉंग्रेस ची पुन्हा नाचक्की केली. जेडीएस ला सपशेल नाकारले.पण या नाट्य खेळीत कुमार स्वामी चे नशीब फळफळले आणि मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली ! मात्र राजकीय व्यभिचार आणि राज शिष्टाचार नैतिक मूल्य या मोठ्या मोठ्या शब्दाचा खेळ रंगला शेवटी महत्वाचं आहे ! या कॉंग्रेस- जेडीएस च्या नव्या सरकार ला शुभेच्छा फक्त -संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे

कानडी ने केला मराठा भ्रतार । एकाशी उत्तर येक नये ॥ 

अशी गत होवू नये ही अपेक्षा !

सुरेश जाधव -9404204008

Sunday 6 May 2018

घामाचे सवंग लचके तोडायचे थांबवा ! महाश्रमाचे "महाइव्हेंट" !



श्रमांच्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची थांबवा ! 

राबणाऱ्या हातांना विश्रांतीचा स्पर्श नाही.हर्ष तो कसला इथे सवंग महाश्रमाला अर्थ नाही.

आग ओखनार्या सूर्याला मस्तकावर घेवून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या हातांनाकधी आम्ही विश्रांती देणारा का ? आज हाय टेक च्या आणि डिजिटल च्या नावाखाली तुमची मंत्रालय हाय फाय आणि वायफाय झाली. लिफ्ट आणि शिफ्ट वर तुमची नोकरशाही ची बडदास्त सुरू आहे.एसी मध्ये बसून लिहायला कोमल हाताला कष्ट होत होते  म्हणून कॉम्पुटराईझ करून टाकलं.तरी सही चे कष्ट त्यात किती रेषा ओढ्याच्या म्हणून त्या ए सी तल्या आणि "तिशीतल्याची" लईच काळजी.डिजिटल सिग्नेचर केली झंज्टच नकोयाची सोय केली .पण आमच्या साठीतल्या बापाच्या हातातील कुदळ फावडं टिकाव आणि माईच्या हातातली पाटी यांना दिसत नाय.म्हणे श्रम दान करा!  महाश्रमदानातून जल चळवळ ! तूमच्या डोक्यातली वळवळ अगोदर थांबवा. उन्हा तान्हात बाया पोरांना घेवून चर खोदण्यासाठी जीवाची हाल अपेष्टा ! करून घेणाऱ्या सोबत सेल्फी पुरत आणि फोटोसेशन चा महाइव्हेंट कशासाठी ? राबणाऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आसुरी आनंद घेवू नका.

लाही लाही होणाऱ्याच्या हातातले टिकाव नक्की घ्या पण कमीत कमी 4 तास तर महाश्रमात घाम गाळा.मग घामाचे थेंब झटकता ना चे फोटो नक्की खेचा पण तेव्हा कपाळावर चा घाम नाही तर  पाठी पोटावर पाट वहायला लागतील.यांची जान ठेवा तसं होन दूर फक्त चार टिकाव हाणून पावन झाल्यानं शिवार पणेदार होतो का ?  मग आम्हाला लोक सहभागाचे गीन्यान शिकवा. धुरळा उडवत गाडी नी यायच अन गोवर्धन उचलल्या गत फुकटचा रुबाब दाखवत निघून जायचं काय पोरं खेळ लावला का ? पुन्हा नाव लावयला मोकळे श्रेय घेण्याचातर भस्म्या जडला आहे.   

लईचश्रम परिहार करायचं ज्ञान पाजळायची हौस आहे ना तर मग  सगळ्या क्लास 1अधिकाऱ्यानी हातात कुदळ फावडं घेवून चैत्रातच्या भर उन्हात एक दिवसच काम करावं .ताका पुरतं रामायण आणी फोटो पुरत श्रमदान कुठं तरी थांबवा.तुम्हाला पाटी उचलण्यासाठी आणि टिकाव धरण्याचासाठी संवैधानिक पदावर नाय पाठवलं.माय बाप शेतकऱ्यांच्या हातातले कायमच टिकाव कसं जाईल याचा निर्णय घेण्या साठी पाठवलं आहे. लई पुढारलेल्या गप्पा मारतानार्या 
पुढाऱ्यांना लांजा सोडल्यासारखं कशाचं भांडवल करावं आणि मार्केटिंग करावं याला जणांच्या नाही तर मनांच्या मर्यादा तरी ठेवा म्हणावं.  गेल्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात डोक्यावरचा हंडा आणि कमरेवरची घागर या बाबतीत विचार केला असता तर ही वेळ आली नसती.तीन वर्षात जलसंधारणाच्या बाबतीत काय केलं याच गणित कागदोपत्री नकोय? किती शेतातला उन्हाळा संपलय पीक आणि पाणी आहे.किती गावाची खरी तहान भागली हे प्रत्यक्ष फेर फटका मारून पहा मग अमक्या शिवार आणि तमक्या योजना चे खरे वास्तव कळेल.बसण्या पासून उठण्यापर्यंत सर्व कामे करणारे मशीन तयार आहेत. यंत्र युगात जगतोय हे सगळं असतांना "महाइव्हेंट" कशा साठी परत या गोरगरीबांच्या रक्त गोठून तयार झालेल्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची का ?  घरात वातानुकूलित; गाडीत ए सी; बाथरूम मध्ये एसी; आहे.म्हणून तुमच्या बुडाला गरम लागत नाही.पन बारा महिने आणि चोवीस तास राबणाऱ्या हातांना परत या महाइव्हेंट च्या नावाखाली  राबायला लावून  गाजर दाखवू नका.बीड जिल्ह्यासाठी सरकार म्हणून काय जबाबदरी पार पाडली हे अगोदर सांगा किती प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पूर्ण केलं .अधूर्या आणि अपुऱ्या प्रकल्पाचं वीस वीस वर्षाचे घोंगडे आडल कुटं? सिंचन विहिरी आणि शेततळी या बाबतीत आग्रह सोडून अंमलबजावणी कधी ?  सिंचन घोटाळ्याच्या नावान तेल लावून बोंबलत होता त्याच काय झालं ? या प्रश्नाची उत्तर द्यायचं सोडून  फोटो सेशन चा "महाइव्हेंट" ची चांगली मार्केटिंग चालू आहे.तुमचं अपयश झाकून ठेवण्यासाठी चा  केविलवाणा  प्रयत्न करू नका. सुंदर अप्सरा लग्नाला सजवायची अन स्वयंवर सांगून गाढवाच्या लग्नाची गोष्ट करायची.ही गत तुकडा टाकून पोट भरत नसत.तसे बक्षिसाचे अमिष दाखवून कायम राबणाऱ्या लोकांचं रक्त आटवू नका?  वर्षातून एक दिवस ठरवा सगळे अधिकारी आणि पांढरपेशी बगळे शेतात आणून फक्त येक दिवससक्तीने  काम करायला लावा.मग महाइव्हेंट मध्ये पाच मिनीटं केलेली फोटोग्राफि'  दिवस भर करा. म्हणावं ! पन घामाचे सवंग लचके तोडायचे थांबवा. कोटीच्या घोषणेचे मुरलेलं पाणी आणि पाणी योजनेच लीकेज काढलं तरी.बिना घामाचा शिवार पा पाणेदार  होईल.

सामजिक जबाबदारी ची जान ठेवत पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून लोकजनचळवळ उभी राहिली.हे कौतुक आहे मात्र आपलीच पाट आपण किती दिवस थोपटून घ्यायची. कर्तव्य करण्यात आणि जबाबदरी पार पाडण्यात सरकार कमी पडतंय का ? बीड जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न सोडवणे बाकी आहे?  त्यात पाणी या गंभीर प्रश्नावर फक्त तोंडाला पाने पुसून भागणार नाही. घामानं माखलेली बनेल अन खडीच्या साली पोटाची भूकेसाठी चे हाताला पडलेले  घट्टे आणखी भूजले नाहित ! प्रत्येक हात राबत होता.तेव्हा पासून आज पर्यंत केलं.बदल काय झाला तर झोपडीतले प्रश्न सोडवण्यासाठी बांधण्यात आलेली विटा माती ची ऑफिस  आज आर सी सी झाली.ऑफिसमधे बसणारी जनसेवक जनतेकडून सेवा करून घेण्यात मग्न झाली. कधी गरिबांच्या रोटी चा विचार झालाच नाही.त्या राबणाऱ्या हातांच्या जागी मशीन आलेच नाही.म्हणूनच की काय पून्हा दोन पायांची माणसे मशीन प्रमाणे राबवून घ्यायचा माणस ठेवून तर हे होत नाही ना ? 

वाटलं होत अधिकाऱ्याच्या आणि नेत्यांच्या हातातील कुदळ आत्ता शांत बसणार नाय  ! फावडयाच (खोर)अन पाटी (घमेंल )चे ही शीन फिटणार शेवटी हात लागला नव्हं का ? महाश्रम दाण च्या पटावर सगळंच कसं "झाक" असतं. डपड वाजत असतं रुबाब झाडणारांची संख्या कमी नसते. असो पन खरं काम करणारी माणसं बाजूला राहतात.त्यांचं कष्ट आणि श्रम हे लक्षात घेतले जातच नाही हे दुर्दैव .शासन म्हणून जबाबदरी पार पूर्ण केली तर ही वेळ येणार नाही .शेवटी  गोर गरीबाच्या महाश्रमाचा  फक्त सेल्फी पुरता "महाइव्हेंट" होवु नये.तसेच महाश्रमाचे महा शोषण थांबवावे ही अपेक्षा .


सुरेश जाधव "लक्ष्मनसूत ! 

Tuesday 20 March 2018

माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार! दिल्लीवारी एकअनुभव भाग 2

माफ कर  "विठ्ठला" आज फराळ तर करणार!  

आपुलीकीचा अविस्मरणीय पाहुणचार दिल्लीवारी एकअनुभव 


सारे भारतीय माझे बांधव आहेत-
--
सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर विठ्ठला आज फराळ तर करणार. --असेच काही किस्से अविस्मरणीय 

प्रवास करतांनाचे काही प्रसंग कदचित कधीच विसरता येत नसतात. मानस ओळखीची नसली तरी  आपुली आणि प्रेम मिळाले की कायम स्वरूपी -हदयात घर करून राहतात.असाच अचानक दिल्ली जाण्याचा प्रसंग आला.नियोजन कुटलेच  नव्हते फक्त आमच्या दोघांवर निर्भेळ प्रेम करणारे हरिदास (भाऊ) जोगदंड यांच्या अति आग्रहामुळे शेवटीटाळता  आले नाही.बीड वरून निघालो प्रवास करत औरंगाबाद वरून धुळे - इंदौर प्रवास सुरू झाला.सहज गप्पा  सुरू आसताना .इंदौर शहरातून बाय पास ने चाललो होतो. जोगदंड भाऊ नी सहज विषय काढत इथे आपल्या कडचे अंकुश भवर आहेत.त्यांना फोन केला तर लगेच घरी या तसे जावू देणार नाही.आग्रह मोडता येन शक्य नव्हत.बाय पास ने 10 किमी पुढे गेलेलो परत गाडी फिरवली.शहरात प्रवेश केला.

घर शोधत रस्त्याने फिरताना इंदौर शहराच्या स्वच्छतेच्या प्रेमात पडायला वेळ लागल नाही.प्रत्येक चौकात सुंदर झाडे आणि शिस्तीत चालणारी वाहतूक रस्त्याच्या दुतर्फा ग्रीन बेल्ट विशेष त्यात झाडे होती.अन तीही हिरवीगार.यामुळे सुंदर शहर असल्याचा खास अनुभव आला.20 ते पंचवीस किलोमीटर च्या विस्तीर्ण भूभागात पसरलेल शहरात आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे घाण नजरेस पडलीच नाही.शोधत शोधत घरी पोचलो.कोल्हे यांच्या घरी सुंदर जेवण टचुन खाल्ले. अन ढेकर देते वेळी नकळत मनातल्या मनात सुंदर जेवण बनवणाऱ्या ताई चे आभार मानले.सहज गप्पा निघाल्या इंदौर मध्ये आम्ही शिवजयंती मोठ्या थाटात करतो अख्ख इंदौर पाहतच राहत.अस म्हणताणा त्यांच शिवछत्रपतीवरील प्रेम पटकन डोळ्यात टिपले.आम्ही  प्रत्येक महिन्याला सप्ताह करतो.खुप महाराज मंडळी येतात.आम्हला वारकरी संप्रदाय इथे मोठ्या वैभवात टिकून ठेवायचा.दिवसभर काम करायच कीर्तनात तेवडं सर्व विसरून सहभागी होतो यात आमचा स्वार्थ काहीच नाही.हे वाक्य एखाद्या महाराजा पेक्षा महत्वाच वाटल. पण शेवटी नाळ कीर्तनात जोडलेली आहे. 20-30वर्षा पूर्वी गाव सोडलेली ही मानस या अपरिचित प्रदेशात लहान मोठे उद्दोग करत. स्वतःच अस्तित्व निर्माण करून आहे

त गाव सोडून चांगला जम बसला म्हणत आसताना अर्धा इंदौर मध्ये महाराष्ट्रातील मानस आहेत.एक मेकांना मदत करत आम्ही गुण्यागोविंदाने राहतो.आता इथल्या महानगर पालिकेत काही नगरसेवक आहेत.एक आमदार आहे अस अभिमानांने सांगत होती.त्या वेळी आम्हाला गड काबीज केल्या गत आपुलकी आणि दुसऱ्या क्षणी आनंद वाटला.

त्यांचा निरोप घेवून पुढं निघालो.उज्जैन मध्ये महा कालेश्वर दर्शन घेतले. तिथेच कालभैरव मंदिरात गेलो देवाला दारू पाजताना पुजारी पाहिले मंदिराच्या समोर देशी विदेशी सर्व प्रसादालय होती.श्रध्देने लोक घेऊन यायचे मूर्ती समोर बसलेल्या पुजार्याच्या हातात. ती शिलबंद बाटली द्यायची .मग येटित बाटली चे झाकण फोडून समोर ठेवलेय छोट्या प्लेट मध्ये अर्धी ओतून देवाच्या समोर धरली हळू हळू हात कानोडा करत अर्धी बाटली मूर्ती च्या तोंडात ओतली.अर्धी प्रसाद म्हणून दिली हे सगळं आम्ही दुरून पाहत होतो. मला हे मुळीच आवडल नाही.आमच्यातील एक जण सांगत होता.दारू कुठे जाते याचा पत्ता लागत नाही. मनात वाटत इथे किती ब्रँड एकत्र होत आहेत.आत मध्ये कॉकटेल होत असेल.कस पचवत असेल.परत हे पुजारी सर्वजण गेल्यावर आतली दारू कशी काडत असतील कदचित त्याच मंदिरात देवाचा प्रसाद  म्हणून कॉकटेलचा चेस तर होत नसेल. असा विचार करत मंदिरतून  बाहेर पडताना सहज वाक्य सुचले.यहाँ  प्रसाद के  तौर पे शराब मिलता है! टोपण टोपण सर्वजण घ्या म्हणत सर्वजण गाडीत बसलो.

मध्य प्रदेश मधील रस्त्याने थेट शिवपुरी मार्गे आग्रा  सर करायचे डोक्यात होते.जवळजवळ 600किमी चा प्रवास होता.रात्री थांबायचे कोठे विचार सुरू होता. लगेच जोगदंड भाऊ च्या डिक्शनरी मधील माजी सैनिकाचे नाव समोर आले.अशोक शीकदल याना फोन  केला. किती वेळ झाला तरी घरी या.वाट पाहतोय अस फोन वरून सांगितले.प्रवास करत पहाटे 2वाजता  पोचलो यात गुगल मैप असल्यामुळे अपार्टमेंट च्या समोर गेट वर गाडी उभा केली.सेकुरिटि ने विचार पुस केली.2 वाजता कॉल केला की लगेच तो माजी  सैनिक गेट वर हाजर.गाडी बंगल्यासमोर पार्क केली लागलीच सर्वजण उतरलो.घरात गेलो पाणी घेतल.आराम करायला सांगितले.सकाळी जेवण केल्याशिवाय जायच नाही."भाऊसाहेब "अस सांगितलं आम्ही उपवास आहे.काही करू नका ! बोलणार तेवडयात आम्हाला पण एकादशी असते उपवासाचे करू म्हणत तुम्ही आराम करा सांगून काकू निघून गेल्या  प्रवासामुळे पटकन  आम्ही सर्वजण झोपलो पण हे मेजर आणि त्यंच्या पत्नी तीन वाजल्या पासून तयारीला लागले झोपेत त्यांची कुजबुज आणि धडपड येकु येत होती.

सकाळी सहा वाजता आम्ही उठलो सात जण आंघोळ करून तयार होई पर्यंत काकूनी गरम चहा आणून दिला.सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार. सकाळी तीन वाजल्यापासून आग्रहाने स्वयंपाक करणारी माऊली आणि तिला मदत करण्यासाठी धावपळ करणारे मेजर भेंडी चिरून देण्यापर्यंत कष्ट आणि त्यामागच प्रेम.सकाळी 7.30वाजता प्रेमाने  सात जणांसाठी स्वयंपाक करून आग्रहाने वाढणारे शीकदल  दांपत्य आणि पुढे एकादशी ठरवले चला यांचे मन मोडायच नाही.

म्हणून पोटभर जेवण केल.स्वीट म्हणून काकूनी त्यांच्या माहेर अर्थात कोलकाता येथून आणलेला स्पेशल पेढा दिला.तो खाण्याचा सर्वात जास्त आनंद संतोष जोगदंड यांना मिळाला.शेवटी जेवण झाल्यावर आम्ही निघण्याच्या बेताने बाहेर आलो तर ते कुटुंब भारावून गेल डबडबल्या डोळ्यानी त्यांनी निरोप दिला."भाऊसाहेब" थोडा और लीजीए हा त्यांनी उच्चारलेला शब्द आज ही कांनात घुमतोय. सकाळी तीन वाजता स्मित हास्य चेहर्यावर  घेवून स्वागत करतांनाचा भाव आणी तीच स्माईल निरोप देतांना.भेटून आनंद वाटला या माणसाला तस पाहिलेतर आम्ही मित्राचे मित्र म्हणजे पाहुणे नाही तर रावले होतो मात्र त्यांनी केलेला पाहुणचार चिर स्मरणात राहील.किती प्रेमळ मानस तेही ना नात्यातले ना गोत्यात आणणारे खुप काही शिकवून गेले.शेवटी नाना महाराज यांच त्यावेळी बोललेल वाक्य आठवले भाग्यवान आहोत देशभक्ताच्या घरी एकादशीचा  फराळ मिळाला.मी त्यांना हिंदीत हे वाक्य सांगितले हसत मुख त्यानी आनंदने हमे भी तो वारकरी महराज के सेवा का अवसर मिला! हम धन्य हो गये. बोलत बोलत निरोप घेतला.सहज विचार मानत आला भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत याचा अनुभव आला -- या दांपत्य बाबतीत मूळ  पश्चिम बंगाल चे रहवाशी. राहतात  आग्ऱ्यात आणि महाराष्ट्रीयन  लोकांशी आपुलकी चे नाते हा अनोखा योगा योग अविस्मरणीय ठरला.

असो शेवटी आपुलकी आणि माणुसकी या मुळेच सर्व ठिकाणी प्रेम मिळत 
--
सुरेश जाधव 

Wednesday 14 March 2018

दिल्लीवारी एक सुंदर अनुभव. हवा हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !

हवा ! हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !


दिल्लीवारी एक सुंदर अनुभव

विमानात बसणे हा तसा माझा पहिलाच  अनुभव तेवढी हाय फाय लाईफ स्टाईल फक्त  येकुन होतो. कसे असेल विमान या  बाबतीत आम्ही लहान असताना अनभिज्ञ होतो पुन्हा चित्रपटात पाहिल्यावर दुरून डोंगर साजरे तशी ओळख झाली.लहान असताना गावात  कागदाची विमान बनवणे आणि  हवेत उडवणे.तर  जहाज बनवणे तेही कागदाचे पुन्हा वड्या ला जावून पाण्यात सोडणे ईतकेच शहाणे आम्ही! कधी काळी शाळेत आणि चित्रपट पडद्यावर च्या हवाई सफरीचा अनुभव घेण्याचे खुप दिवसा पासून चे ईप्सित होते. 

गावातून शहराकडे आलो तरी याचं कुतूहल होतच.तिकीट कसे असेल?  किती पैसे लागतील? विमानात चहा किती रुपया ला असेल? जेवण घ्यायच की  नको?  सीटबेल्ट कसा बांधायचा?   आणि पदार्थ खाताना काय कशासोबत खायचे? त्यात शाकाहारी मांसाहारी ची भानगड ? मग नकोच का ? काय  सोबत घेवू?  आणि काय नको? गर्ल होस्टेस कशी असते? इथ पासून ते कदचित पोहचायला तर उशीर होणार नाही ना? विमानातून खाली पाहिल्यावर कसे दिसेल? या अनंत प्रश्नानी गोंधळ घातला होता. या सर्व  प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येवून ठेपली..

तस अचानक दिल्ली ची वारी घडली याच कारण ही  वेगळच-- पंढरी च्या वाळवंटातील टाळ थेट दिल्ली मध्ये वाजणार होते.म्हणजे विराट ज्ञानेश्वरी पारायन सोहळा रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी प्रकाश महराज बोधले यांच्या कुशल नियोजनाने भव्य सप्ताह सुरू होता  त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे  भाग्य लाभले धन्यवाद जोगदंड (भाऊ )
---जाताना प्रवास "बाय कार"आणि परत लवकर बीड ला यायचे म्हणून  मी आणि  नाना महाराज यांनी अनेक अडचणीचा सामना करत अखेर दिल्ली गाठली.सप्ताहात सहभाग घेतला कीर्तन येकेले.दिवसभरात दिल्ली दर्शन केल यात बऱ्याच नवनवीन गोष्टी पहिल्या भारतीय लोकशाही चे पवित्र मंदिर पाहिले.त्याच वेळा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो बीड आणि त्या चे प्रश्न दिल्लीत मांडणारे  दिल्लीत मधील 25लाख लोकांचे प्रतिनिधी आठवले.आम्ही या विषयावर बरीच चांगली वाईट चर्चा केली--संबंधित प्रतिनिधी अर्थात --"लोकसेवक " यांच्याशी संपर्क केला.काही काम मुळीच नव्हत मात्र 1400किमी प्रवास करून आल्यावर आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधी ची सहज भेट ही महत्वाचीच असते पण शेवटी नाहीच झाली --यात काही चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधून विषय सोडून दिला.

सर्वात आठवणारी कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे आदरनिय शरद पवार साहेब यांची भेट त्याच बरोबर खा सुप्रिया ताई सुळे सोबत चर्चा यातच आय टी च्या विद्यार्थी यांच्या सोबत पवार साहेब यांच्य मनमोकळ्या गप्पा ऐकण्याचा  योग आला   -- परत दिल्लीतील वारकऱ्यांना भेटायला येणार हा दिलेला शब्द --यात फोटो काढताणाचा बाणेदारपणा आजच्या दिवसाचा वेगळा अनुभव होता नंतर  काढलेले फोटो घेण्यासाठी करावी लागलेली धावपळ आणि तिथे मिळालेली वागणूक यामुळे वरच व्हीव्ही आयपी आणि शिष्ट पण ही अनुभवले असो.

यासर्व घटना क्रमात  जनपथ--राष्ट्रपती भवन --संसदभवन --इंडिया गेट --अमर ज्योत --गांधी संग्रहालय --लाल किल्ला --चांदणी चौक मार्केट --राजघाट -- पाहिले अप्रतिम आणि सौंदर्य तसेच भव्य तेचा दिव्य अनुभव देणारे ठरले. गर्मी आणि ऐसी या दोन्ही वातावरणात शरीराची होणारी पंचाईत सहन करत .. दिवस ढळतला--दिवस मावळा होता.पाय थकले होते.पण  शेवटी नाना महराज यांनी महाराष्ट्र सदन नावांची वास्तू कोणती ती पाहण्याकरता आग्रह धरला.मग आम्ही जायच ठरवल अशा ठिकणि  जिने बऱ्याच जणांचा" वास्तू" करून टाकला. मोबाईल मध्ये लोकेशन टाकून पोचलो.तर भव्य इमारत इमारतीत गेट वर कोमल आवजात नमस्कार शब्द ऐकला.आत प्रवेश करून  रिसेप्शन मधे रूम विचारल्या तर 6 हजार आणि  मंत्र्याची  किँवा आमदार खासदार यांची शिफारस अट ऐकल्यावर धक्काच बसला.आपल्या बजट मध्ये बसत नाही .म्हणून सहज फेर फटका मारला तर  फाईव्ह स्टार हॉटेल ला लाजवेल असे फर्निचर आणि शाही बडदास्त पाहून थक्क झालो.नक्की अस असल पाहीजे शेवटी महाराष्ट्र साम्रद आहे.पण  मूठभर  लोकानाच त्याचा फायदा गरिबाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली वास्तू पुन्हा पैसे उकळन्यासाठी सज्ज हे विक्षिप्त वास्तव पहिले. चहा पिऊन थोड फोटो सेशन करत जय महाराष्ट्र ठोकला.

आत्ता रात्रीचे आठ वाजले होते परत गाड़ी सप्ताह मंडपात आली होती कीर्तन सुरू होते मस्त कीर्तन रंगात आले होते.तोच यमक करणाऱ्या केंद्रीय नेत्याचे आगमन झाले.त्याचे स्वागत वैगेरे वैगेरे झाले.परत त्यांना टाळ "आठवले" आणि वारकरी टोपी घालण्यावर चारोळी झाली.एकमेकाना टोप्या घातल्या नेते प्रेम दाखवून निघून गेले.--कीर्तन डिस्टर्ब होत पुन्हा सुरू झाले. 10 वाजता ज्ञानेश्वर माऊली ने कीर्तन संपले. आता विमान प्रवास त्यांच चक्र डोक्यात फिरत होत.कसे बसे  काही घास पोटात ढकलून हात धुवून रेडी.त्यात एअरपोर्ट वर  फोटो  काढायचे म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला.कधी  12वाजतील आणि कधी  पोचेल अस झाल होत.11.30ला एअरपोर्ट कडे निघालो.गाडी सोडायला आली होती.मैप लावला पण भरवश्याच्या  म्हशी ने टोणगा दिला.मैप मध्ये रस्ता चुकला अक्षरश 1तास फिरत राहिलो रस्ते मोठे ट्राफिक त्यात महिती नाही.आणि  वेळ चुकते की काय याची चिंता पण सोडवायला आलेल्या संतोषराव आणि अशोक घोडके दाजी(भाऊ चे जावई) यांच्या मुळे एकदाचे टर्मिनल 3च्या गेटवर  पोचलो.ड्रॉप करायला आलेल्याचा निरोप घेतला .

पहिल्यांदा अंतर राष्ट्रीय विमान भव्य विमानतळावर जरा सा गोंधळलेल्य अवस्थेत आम्ही दोघो अंदाजे गेट वर तिकीट दाखवून आत प्रवेश केला.इंग्रजीच थोड बहुत ज्ञान कामी आला ! plz म्हणून गोऱ्या मुलीला तिकीट दाखवल.तिनी बोर्डिंग साठी चेकिंग पोस्ट ला जाण्याची सूचना केली. लाईन मध्ये  उभा राहिलो पण शांत नव्हतो कारण महिती काहीच नव्हत  पुन्हा काऊंटर वर जावून  विचारत अतिक्रमण केल .एकदा चा बोर्डिंग पास मिळाला. आत्ता शांत पणे वेटिंग रूम कडे जाता ना मॉल पेक्षा जास्त घमघमाट आणि रात्री चे  1 वाजले आसताना सकाळची घाई आणि लगबग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. फोटो काढायचे का ? नको म्हणत हळूच सेल्फी घेतली.जिकडे पहावे तिकडे नवे द्र्श्य होत नवा अनुभवखूप काही शिकवून जातो. बरेच फोटो  टिपले.1तास वेटिंग केल्यानंतर 2वाजता विमानाच्या दरवाजा जवळ वेलकम करणाऱ्या सुंदरी चा कोमल आवाज कानावर पडला.मग सीट वर जावून बसलो.शेजारी कोण ? हा आणखी कुतूहलाचा प्रश्न ? पण मुंबईचा अंजान मित्र भेटला.बेल्ट अंदाजे लावला.परत माहिती असल्यासारखे अज्ञान झाकत नकळत शेजार्याला फॉलो करत.सर्व क्रिया केल्या.

एकदाच  2.25 मी विमान टेक ऑफ झाल.ताऱ्यांच्या सानिध्यात भारत भूमीचे लुकलुक नारे सुंदर दर्शन घडले. बऱ्याच दिवसाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होताच! हेड फोन कांनात घालून लिव्हल वेळ कसा गेला समजल नाही. मधल्या सर्व सुविधाचा लाभ घेत.सकाळी 5 वाजता मुंबईत  लैन्ड झालो  -- पुन्हां काही वेळाने परत टेकअप झालो थेट औरंगाबाद सकाळी 6.20 एअर पोर्ट मधून दोघे बाहेर  पडलो. तो निर्धार करत पुन्हा प्रवास करायचा ! व्ही आय पी म्हणून ! संपूर्ण प्रवास प्रेरणादाई झाला
 
धन्यवाद
सुरेश

Tuesday 13 February 2018

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण

चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

(वळखण ) मातीतल्या माणसाचा मातीत जाई पर्यंत चा संघर्ष माणुसकी च्या नात्याने समजून घेता येईल का ? अस्मानी सोबत सुलतानी जीवावर उठते तेव्हा वाली कोण हा प्रश्न आजही अधांतरी च आहे. आत्महत्यावर  राजकारण करणारे  सर्वच जण  एका माळेचे मनी आहेत.राजकीय पोळी भाजण्यासाठी सरनाची  होळी  कमी  पडते की काय? याचा विचार  करतात लोकांच्या सेवेची हमी देणारे हमखास धोका देतात याच  उत्तर  70 वर्षाच्या स्वातंत्र्यात मिळाल नाही. जगण्याचा संघर्ष थांबला नाही तिथे आश्वासन देण्यात आणि स्वप्न दाखवण्यात डिजिटल पणा आलाय.खर तर चटणी मीठ  पाण्या सोबत ओली झालेली हक्काची भाकर मिळण्याचे स्वतंत्र जरी देवू शकलात तरी महापुरुषाचे लोकशाही चे स्वप्न पूर्ण होइल.अन्यथा इथली संवेदना विरहात स्वार्थी लबाड मंडळी लोकशाही चे कधी न सरनारे  ग्रहणच म्हणाव लागेल

---- लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगा! विकास होईल ही भोळी अशा घेवून जगणारा मतदार तरी कुठे राहिला आहे ,आणि अजेन्डा घेवून वागणारा उमेदवार तरि कुठं राहिला ,कारण !सत्ता आणि पद हे जर लोकशाही चे भ्रष्टाचार पोसनारे कुरन असेल तर ,सामान्य मतदार त्याचा हक्क बजावत नाही तर ,या कुरणाला कुंपण लावत आहेत ,समिकरण ठरलय ,राजकारणात भांडवल गुंतवताना किती पट परत येईल याच गणित मांडलेल असत ,किती उल्लू बनवता राव ,एका रस्त्याला 10 नावं ,गावातल्या पाण्यात पाप ,आणि लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगायला पहिजे . ज्याच्या बूढ़ा खाली सायकल नव्हती तो आज जनतेच्य छतडावर  एसी च्य गाड्या घेवून फिरवतो.हे कस शक्य होत ,गोर् गरीब लोकांच्या मुलाच्या खाऊ मध्ये डोकावनारे ,खाऊ राजकारनात आल्याने कुठली लोकशाही सम्रध होणार हा खरा प्रश्न आहे  बहिणी बाळी च्या कुंकवाला दारूचे व्यसन लावून समाज भूषण म्हणून मिरवणाऱ्या षंड आणि स्वःतला गुंड म्हणवून घेणार्या लोकांनी समाजाची इज्जत वेशिला टांगली आहे !

आर ! बस करा या तमास गिराचा कलुशित गैर व्यवहार ,नीति आणि मती गुंग झाल्या नंतर राजनीति च्या नादी लागलेल्या माकडा गत अवस्था आज यांची झालीय , लोकांची ----पुसण्या पर्यंत पुंड पुंड करणार्या आवलादी ची कमी आज  राजकारणात  नाही .

    त्यांच ही एक परती खर लोक घड़ी चा विचार करतेत तिथं पीढ़ी चं त्यांना काय देन घेण !पण आयुष्य बर्बाद करून मताचा घोळ आणखी कळून घेवु शकले नाहित तर भोगा आपल्या कर्मची फळ ! सुविधाच्या नावान असुविधा निर्माण करून समाजाला उध्वस्त करणारी लोक संधी साधु टपुन आहेत !
       लोक प्रतिनिधी म्हणून छक्के पंजे करण्या पेक्षा हे काय करतात . गाव आणि स्वःताची मानस ज्यालोकाना फक्त नावं वापरण्यासाठी लागतात त्या ठीकाणी राक्षसी वर्त्ती बळावलेली असतें ! कधी कधी नाक कापल तरी भोक शिल्लक आहे अस म्हणणारे काहि कमी नाहित ,आन ,भाका घेवून आणि पदरात घ्या म्हणणारे आणि  ,लोकमातेच्या पदराला भोक पाडून मातेचा पदर फाडनारे आज ही औसा पुणवेला उगवत असतात.अरे हलकटा नो कुठंल्या तोंडाने मत मागता !लाज वाटू द्या .स्वतःच्या स्वार्थ ची झोली भरण्यासाठी बंगल्यावर बंगले बंधून ,भूत पैदा करण्यासाठी आणि पोसण्य साठी  हे जर करत असाल तर याद राखा , तर छी थूक आहे तुमच्या जिन्याची ,दाडा आणि झेंडा कोणता यापेक्षा कोणत्या लोकांच्या समस्या सोडवूं शकतो याच चित्र माँडा म्हणावं ,काय लागत ओ सामान्य लोकांना ,कोणत्या?गरजा आहेत त्यांच्या जरा समजून घ्या !नुसते जाहिर नामे आणि प्रचार सभा घेवून लाखो रुपयाच्या उधळण करून मिळवलेला विजय आणि त्यानंतर निर्माण झालले प्रश्न हे वर्षानूः वर्ष तसेच आहेत !उन्माद आणि माजोरी पणा आता सोडून द्या ,तुम्हि मेंबर नंतर आहत आधी गावात माणूस आहत याच भान विसरून कस चालेल!बर् लोकशाही मध्ये पद आणि अधिकार काय कुणाच्या बापाची जहागिरी थोडीच आहे ! जे जमत नाही तें पुन्हा करण्याचा प्रयत्न का करता ! आत्ता तू नाही तर तुझा बाप दुसरा अस म्हणून धडा शिकवणे गरजेचं आहे!

शेवटी माझ पोरगं कुटं शिकल ,पहिजे पोरगीने काय केल पाहिजे घर कस असल पहिजे !दार कुटं  हे जस ठरवता ना .मग! विवेक जागा असेल तर माझा समाज कसा आहे ,कदाचित तो मझ्या आयुष्याशी तितकासा महत्वाचे नसेलही पण परिणाम करणारा तर नक्की आहे ! या कडे मी डोळस पणे लक्ष दिल पहिजे !पाच वर्षा साठी आपल प्रतिनिधीत्व आपन मत देवून बहाल करणार आहोत !फक्त नंतर लाज वाटू देवू नका आत्ता वेळ आहे , पुन्हा ------:----- म्हणण्याची वेळ येवू नये !

 इतिहास बदलायला मशाल गरजेची असते आज बेरोजगार आणि बेकार  युवक एकत्र  होवून  संघर्ष  करत आहेत.इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत ला प्रश्न  विचारत  आहेत  याला दुर्लक्ष करून चालणार नाही शेवटी. चिंनगारी  छोटी असली तरी  वणवा पेटवायला कारणीभूत  असेते !


सुरेश जाधव

Sunday 14 January 2018

"ती"चा कुंकवा शिवायचा संघर्ष ---! व्यथा


"कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे" धड पेट ही  घेईना आणि विजुन ही जाईनां!

कुंकू तस सौंदर्य अलंकारांतील एक भाग मात्र कधी ते भाग्य- अभाग्य आणि सौभाग्य या समाजांच्याखुळ्या कल्पणा आणि  समजूतीचे वर स्वर होवुन ते जीवन मरणाचे प्रतीक तर नाही ना? याचा विचार कारवांच लागेल --स्वतंत्र पूर्व काळात सती प्रथा बंद करण्या साठी चा संघर्ष आज विधवा प्रथा बंद करण्या साठी आवश्यक आहे --त्या वेळी एकदाच्या मरणाने दुःख संपत होते--मात्र आज कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे  समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे 
धड पेट ही  घेईना आणि वीजुन ही जाईनां अशीच काही स्थिती असते --यात दोष काय असतो "त्यांच्या" मरनाने मरून गेलेला जोडीदार मात्र "हिच्या" आयुष्यत समाजाच्या विखारी आणि विषारी बिजाची पेरणी करून जातो 

हळदी कुंकवाचा सण म्हणजेच मकरसंक्रांती  प्रेमाचे स्नेह मिलन आणि दुःख वेदनेवर  फुंकर घालून आनंद गीत गात महिलांनी धरलेला फेर हाच या सणाचा मुख्य उद्देश -- मात्र या उत्सवात तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश ही दिला जातो पण खरंच आपण अस वागतो का ? आपल्याच घरांतील जिचा पती वारला "ती" -- मुलगी.आई .बहिण चुलती मामी आत्या मावशी  या  महिलांना आजच्या दिवशी सन्मान देतो का ?  संक्रांतीची साडी घेतो का ? हळदी कुंकू जावूद्या पण तीळ गुळासाठी सन्मानाने बोलावणार आहोत का ! तर  या शुभेच्छाला  महत्व आहे - नाही तर संस्क्रुतीच्या  नांवाने गळे काढून कित्येकांच्या भावविश्वाचे बळी घेणार आहोत! पती पत्नी च्या पवित्र नात्यांत दुर्दैवाने अकाली जोडीदार गमावलेल्या ती च्या बाबतीत थोड़ा विचार केला तर बर  होईल.कारण "ती" सुद्धा समाजातील माणूस म्हणून जीवनाचा संघर्ष करणारी आहे --एका कार्यक्रमात गेलो आणि जे पाहिले त्याने चीड आली कुटल्या आधुनिक युगात जगतो की अश्मयुगात या प्रश्नाच उत्तर मिळालं नाही!

वाजंत्री वाजवत होती .तरुणाई नाचत होती--निमित्त होत लग्नाच्या हळदी समारंभाच  सर्वजण आनंदात होते.नवरा मुलगा पाटावर येवूं बसतो --हळदी च ताट पुढं येत तसी नवऱ्या मुलांची बहीण ते ताट हातात घेवून हळद लावण्यासाठी समोर येते हळद सुरू असते.पण त्याचं वेळी मुलींची मोठी बहीण हळद लावण्या साठी ताट हातात घेते तेव्हा "ति"च्या हातुन ताट हिसकावून घेण्यासाठी स्पर्धा लागल्यागत धडपड सुरू होते .हळद लावतांना हातातील ताट विस्कवून घेण्यात आल् याच कारण तिचा पती काही दिवसा पूर्वी मयत झालेला होता.बहिणीच्या अंगाला हळद पण लावता येत नसल्याने स्वताच्या नशीबाला दोष देत डोळ्यातलं पाणी आवरन्यासाठी कोपऱ्यात जाऊं अश्रू ला वाट वेगळी करून देणारी दुर्दैवी बहीण  पहिली आणि धस्स झाला --- डोकं सुन्न झाल 


बऱ्याच शुभप्रसंगी (चांगल्या कामी)जस की लग्न मुंज आदी करून आनंदच्या प्रसंगी आपण (जिचा पती वारला) "ती" या बाबतीत काय विचार करतो --जरा लक्षात आणा!  भावाचं लग्न होत असतांना हळद लावण्याचा मांन कलवरी म्हंणुन बहिणी चा आहे .मात्र कुंकू नसेल तर कित्येक बहिणीला रोखलं जात --काय वाटत असेल यांनी यात तिचा काय दोष --या पुढे ओवाळणी करणं ओटी भरणं आदी.महिलांच्या कार्यक्रमात या माऊली कडे तोऱ्यात मिरवणाऱ्या कुंकू वाली कडून वारंवार हिणवले जात एव्हडंच काय तर --कां काय होत जर का तीन भावाला हळद लावली ओन्टि भरली तर काय होणार आहे पण नाही आणखी बुरसटलेले विचार डोक्यातून गेलेच नाहीत. दुर्दैव आपण फक्त कुडा च्या घरातुन सिमेंट च्या बंगल्यात आलोत "भिंताड" सुधारली पण "छाताड"नाही याच वाईट वाटत 

-दुःखी माणसाला आधार द्या त्याचे अश्रू पुसा हे सर्व ग्रंथ शास्त्र सांगत आणि आपण काय करतो त्यांच्या जखमेवर मीठ सिंपडतो. ईथेच थांबतो का तर नाही उलट तिच्या कमजोर पोकळी ची जाणीव सतत व्हावी या साठी वारंवार टाळलं जात.बोलूं तर कधी क्रतीने हेटाळल जात हे विचित्रच आहे एकीकडे समतेचे झेंडे मिरवून स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरिकडे सुशिक्षीत लोकांनीच "सुवासिनी"सौभाग्यवती"या मोठं विषेशनांच्या नांवाने पुन्हा दुसरी दरी निर्माण करायची .यात पुरुषा पेक्षा महिला जास्त जबाबदार आहेत.कुटल खुळ डोक्यांत घेतील समजत नाही.मात्रा "ती" अव्हेर न्याची कोणतीच संधी सोडत नाहीत.

प्रवास असो की सामाजिक प्रसंग यात कुंकू नसलं की टपून बसलेला डोम कावळे  आणि त्यांच्या विषारी भेदक नजरा चुकवण्यासाठी करावी लागणारी धडपड ही  "ती" ला रोजचीच असते येव्हडेच काय तर त्रास देणारे आणि चोच मारणारे कावळे यांच्या पासून संरक्षण व्हावं म्हणून  छोटी टिकली लावते अस एका माऊली ने सांगितलं --

जन्म आणि  मर्त्यू कोणाला  चुकलाय का ? मग  जिवंत माणसाकडे आपण एव्हड्या हिंन भावनेने का पाहतो ! की त्यांच्या माणूस पणावरच आपलां संशय आहे --सुखाने जगण्यासाठी माणसाने समाज निर्माण केला यात समाजातील कुटुंब संस्था ही प्रमुख समजली जाते  --पुरुष आणि स्त्री ही  संसार रुपी रथाची दोन चाके असतात --मात्र कधी कधी या  सुंदर रथाला नियतीची द्रष्ट लागते आणि  एक चाक निखळून पडते --मात्र जबाबदारी चा रथ एका चाकांवर सुरू असतो यात पुरुष असेल तर "नवं"चाक म्हंजेच दुसरं लग्न करायला लगेच तयार होतो मात्र स्त्री ला याची संमती दिली जाते का ? तर याचं उत्तरं नाही असंच येतं काही ठिकाणी मिळतंही  असेल परवानगी पण क्वचित -बरं मग या संसाररथाच्या जबाबदाऱ्या पेलताना काय वाढून ठेवलं जात याची कल्पना केली तरी अंगावर काटे उभे राहतात -- लग्नात शुभेच्छा आणि भेट वस्तू घेवून आलेले नातेवाईक अशा दुःखद प्रसंगी श्राध्द झालं की मोकळे होतात आणि सुरू होतो तो  नसंपणाऱ्या आयुष्याच्या प्रवासाचा टप्पा ज्यात "ती" एकलीच असते 


 हाडा मांसाची आणि रक्तानात्याची माणसे ज्यांच्या  आशीर्वाद आणि शुभेच्छाने  "ती" चा सुरू झालेला सुवासिनीचा सुमधुर प्रवास मात्र पती च्या अकाली जाण्याने खडतर होवुं जातो --पती निधनाने "ती"च  आयुष्यंच हिसकावून घेण्याचा समाज प्रयत्न करतो अस करणारे  काही दूर चे नसतात मात्र खुळचट रुढी आणि परम्परा यांचे पालन करण्यांत आसुरी आनंद मिळतो का यांना--दुःख सागरात बुडालेल्या त्या असाह्य माऊली ला आधार देण्यायाऐवजी कुंकू पुसण्याची  आणि मंगळसूत्र तोडण्याची घाई का असते --तसही चालतं बोलत आधार देणार माणूस निघून गेल्यावर निर्जीव रंगात आणि धातू मधें काय असतं --त्यांची आसक्ती थोडी असते? जीव लावलेलं माणूस निघून गेल्यावर कशात जीव अडेकेलं का पण किती --निष्ठूरपणे सर्वा समक्ष कुंकू पुसणारी आणि मंगळसूत्र तोडून दुःख सागरात डकलुन देणार्यानी  तिच्या वेदांनाचा विचार केला कां? जखमेवर मीठ चोळनारी  ही  कुटंली घाणेरडी मानसिकता थांबलं पाहीजे कुटं तरी हे कुंकवाशिवाय चा संघर्ष काय असतो तो नाही कळणार --?

ऐन तारुण्यात वादळी आयुष्याची सुरुवात करून स्वप्नांच्या पाऊलवाटा शोधणाऱ्याला मनाला असा अचानक धक्का बसतो आणि आयुष्याची सुंदर रांगोळी विस्कटू जीवनाची घडी बिघडून जाते -- यात समाजाने कूट तरी "ती"ला सावरलं पाहिजे.आधार देवून सन्मानाने वागवलं पाहिजे .जगण्यासाठी चा संघर्ष तर  प्रतेक जण करतो मात्र अशा प्रसंगी धीर आणि आधार महत्वाचा असतो.

एकीकडे शहिदांच्या बाबतीत विचार करतो पण  वीर पत्नीला सन्मानाने जगू देतो का ? यांच आत्म परीक्षण व्हाव -- या संक्रांति दिवशी विधवाना सन्मानाने वागणूक देवून त्यांच्या बाबतीत विचार करायला लागलो तर खरी संक्रांत गोड होईल-- 


काल काकड हिरा  गावात अशीच वेगळी संक्रांत पहिली आनंद वाटला -- मनीषा जायभाये आणि प्रतिभा हावळे या दोन शिक्षिका विधवा प्रथेविरोधात चळवळ उभी करत आहेत.काल रात्री ही संक्रांत  85 विधवा महिलाना तिळगूळ आणि साडी वाटप करून संपन्न झाली---अशादायक चित्र समोर उभा राहील चळवळ व्हावी.


सुरेश जाधव 
9404204008

Tuesday 2 January 2018

फक्त दगड त्यांचे होते! फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती


फक्त दगड त्यांचे होते!  फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती

सड्कि डोकी जरा शांत ठेवा! किती दिवस इतिहासावर दगड मारणार!

विचाराचा इतिहास शिकवणाऱ्या महापुरुषानी जाती वादांची बंधने  झुगारून  निकोप  समाज निर्मिती  साठी  दिलेलं  बलिदान आज आम्ही  विसरलो अहोत  काय?

बुरसटलेल्या मेंदू वाल्याच्या सडक्या डोक्यांन  पुण्याच्या शांतंतेत  मीठ टाकलं विध्वंसक मानसिक तेणें  पुन्हा  बहुजनांच्या पोरांना तोफेचा गोळा  करुन ठिणगी पेटवली खऱ्या इतिहासावर दगड मारून तो  काय पुसला जाणार  होता का मात्रं किळस वाना त्यांचा प्रयत्न होता यानं आमचं खुप मोठं नुकसान  झालं ओ जाती च्या मोर्चा ने निर्माण  झालेली  दरी  आणि दुरावले मन विसरून  माणूस कसा बसा एक येत होता त्या ऐकतेला खिंडार पाडन्याचे शड्डयंत्र रचल गेलं  आणि  त्यात आमची  पोरं भरडली  गेली हातात  दगड दिली बसले तमाशा पाहात! फक्तं दगड  त्यांचे  होते!  फेकणारे हात  आणि  फुटणारी  डोकी आमच्याच बांधावाची होती! कायदा  हातांत घेतो तेव्हा कायद्यांच्या  कचाट्यात अडकनारे पण आमच्याचं समाजातील  कोणाचे नातेवाईक नक्कीच  असणार  त्यांचं  भविष्य काय ? कुटुंबाचं काय? का  फक्तं --बदला आणि सूड ज्याला बुड टेकवायची  अक्कल नाही त्यांला सूडाच्या मागचं गूढ राजकारण काय कळणार! इंग्रज  गेले पण  200 वर्षा नंतर भेद  नीती तशीच आहे तोडाफोंडा आणि राज्य करा. काय?  डोकी गहाण ठेवल्यागत वर्तन  सुरू आहे.इशाऱ्यावर नाचणारी आणि शिकवलेलं बोलणारी पीड़ित पिढी निर्माण होते हेच दुर्दैव. यातच  जातीवाद आणि समाज कारणाचे  अर्ध हळकुंड उगाळून पीलेली काही भगवी  झालित तर  काही निळी पिवळी पडली आहेत.हीच ब्याद तर मुळांवर आलीय.वैचारिक लढा उभारुन प्रश्न सोडवन्यपेक्षा खऱ्या खोट्या भूतकाळावर आज युद्ध सुरू आहे. हे  अतिशय चूक आहे. या  विघ्नसंतोशी व्रतीच्या मुसक्या आज  ना उद्या आवळ्या जाणारच आहेत.

 
गुण्या गोविंदा ने हातात हात घालुन ताटाला ताट नाही  तर ताठ माने ने ताटात जेवण करणारी आमच्या पिढी ची घडी बिघडवू पाहणाऱ्यां शन्ड लोकांची तोंड पाहायची इच्छा नाहीए!  शिकणाऱ्या लोकांची डोकी जास्त भडकतात का? चूक  बरोबर  खरं  खोटं  याची  चिकित्सा  सोडा  पण  शहानिशा पण  करायचं  सोडून  बेताल सोशल मीडिया वर  स्वार व्हायला तयार  होतातच कसे ? वाईट वाटत ज्यांच्यात आपण  वावरतोय  त्यांच्यावर  दगड  कसाचं  उचलला  जातो  घटनां भीमा कोरेगाव ची निंदनीय आहे निषेध आणि  फक्तं निषेध हेच प्रत्येकाचे उत्तर आहे  पण आज  महाराष्ट्रातील गावा गावांत विश्वासा च्या भिंतीचे अंतर आता भीती वर पोचले विश्वासाला तडा जायची वेळ नाही तर परिस्थीती निर्माण झाली!शहरात भागत ओ  कर्फ्यू लावून. आठवड्याचं नियोजन असतं आणि  पर्याय  ही असत्यात. गावांत काय करणार पोट भरण्यासाठी आज ही रोजंदारीवर जावं लागत तेव्हा चूल पेटती त्यात तुमच्या असल्या दगड  फेकीने आमची संस्कृती उध्वस्त होती. या च्या  परिणामांचा कधी  विचार  होणार  आहे  का ? पुन्हा मुहल्ले नगर आणि वाड्यात विभाजन करायचं ! रोज  एक मेका ची तोंड पाहणं चुकणार आहे का ! नाही  ना  मग  गरम  डोकं  जरा  शांत  ठेवा ! बाबासाहेबाची लोकशाही आणि संविधान  तुमच्या सोबत  आहे  ना ! जगाला  शांतता काय असते  हे  शिकवणारे  आमचे आदर्श युगपुरुष बुध्द आमच्य बुद्धीत आहेत का ? फक्तं  फोटो पुरतेचं यांचाही विचार होणं गरजेचं आहे!

कालची घोषणा ऐकली आणि वाईट  वाटलं नमो तस् भगवतो अर्हतो-- या  प्रार्थनेचा वेगळाचं  वापर केला यातचं बुद्ध नको  युद्ध हवं हा  सूर तरुणाई आळवत  होती! ही  धोक्याची  पूर्व घंटा आहे कां याचा  विचार  हिं  व्हायलाच हवा.समाज जीवनाचे खरे तत्व माणुसकी आम्ही  विसरत अहोत.जातीवाद पुन्हा प्यारा वाटू लागलाय इथे माफ करा बाबा मात्र आम्ही  चुकतोय हे कळत असूनही वळत नाही! उचलेला  दगड जशी जात विचारत नाही तो  त्याच  काम करतो तसं फूटनारी काच कितेक तुकड्यांत विभागतें तिच्या नुकसानीचं मोल लावता येत! कदाचीत त्याची  किंमत  कमी जास्त  असेल ही  मात्र  समाज मनाच्या -हदयाला पडलेली  चिर तीच काय? यांचा  विचार करा.हात जोडून विनंती.

मूठभर लोक सुशिक्षित झालेत त्यांचं सोडा खंडीभर  तसेच आहेत.भाकरी चा प्रश्न  तसाच आहे.आकाशाचं पांघरूण करुन  कुडकुडत पडलेली कुटुंब यांचे प्रश्न? कुपोषण?  झोपडपट्टीची व्यथा? शेतकरी आत्महत्या! दहशदवाद? नक्षलवाद? याचा  कधी  विचार  केला  का? दोस्ता हो!


आमची बुध्द शिव शाहू फुले आंबेडकराची लेकर जाती वादांची भाषा बोलायला लागले आपलं तूपलं  याही पेक्षा मप्लंची ची संकुचित शिकवन नडत आहे.असेच किती दिवस विष प्रयोग करणार यानं कुणाचं  बरं झालं आणि  पदरात काय पडलं  याचं ही उत्तर  शोधा. गरीबांची लेकरं दमडी कमवायचे सोडून आयुष्यं गमवायची भाषा करतात अन् पिसाळलेल्या गत बुद्धी भ्रष्ट होवुन कुणाच्याही मागे धावतात हातात पदरात  काहीचं  मिळतही  नाही  आणि  काय  करतो ते  कळत देखील  नाही अशा वेळी  कोण  जिंकतो ? कोण हरतो? या  पेक्षा समाजा ची पार वाट लागते पिढी बर्बाद होते. या क्षणांची  वाट पाहातोय का ? डोकं ठिकान्यवर ठेवा! न्याय व्यवस्था ; कायदा आणि  राज्यघटना या वर विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या  संकल्पानेतूंन  साकारलेल्या खऱ्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.

नसता बिघडल्यागत  असेच किती दिवस इतिहासावर दगड मारणार ! सड्कि डोकी जरा शांत ठेवा!



सुरेश जाधव
9404204008