Saturday 19 May 2018

तीन अंकी नाटिकेचा शेवट -- कर्नाटकी जनतेवर च्या इच्छेविरुद्ध चे सरकार.


येडियुरप्पा च्या बाबतीत "पाल" चुकचूकली !

कर्नाटकतील नाटकी खेळी चे नाटक आता संपले आहे ! इथे कोन जिंकले कोन हरले या पेक्षा न्याय व्यवस्थेवरील विश्वास  लोकांमध्ये द्रढ झाला हे मात्र नक्की !

कॉंग्रेस सरकारच्या विरोधात जनमताचा कौल भाजप ला 104 अशा सर्वादिक जागा निवडून दिल्या.तर कॉंग्रेस ला 78 वर विजय कौल मिळाला.या दोन्ही पक्षाच ठीकपण जेडीएस  ला 37जागा निवडून दिल्या म्हणजे जनमताची तिसरी पसंदी होती. सत्ता स्थापनेत भाजप कडून अतिरेकी सत्तेची महत्वाकांक्षा दिसली यात लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुड्वत राजभवनाच्या पटावर राजकीय पाठ गिरवले. यात अति घाई आणि संकटात नेई या म्हणी प्रमाणे जे घडायचं ते घडलं.यात फक्त कानडी जनतेला अपेक्षित मतदानाच्या कौला विरुध्द राजकीय समीकरने जुळली.(मनाविरुद्ध आणि मता विरुध्द नको असलेले सरकार आणि पक्ष यांच्या हातात सत्ता सूत्र येणे यांचा अर्थ शेवटी कानडी जनतेवर राजकीय बलात्कार म्हणावा लागेल) ज्यालाची तुलना गोवा नी मणिपूर मेघालय त्रिपुरा या बाबतीत जे घडले तेच इथे ही घडले.यात दोष भाजप केंद्रात सत्तेवर आहे म्हणून सर्वजण या बाबतीत बोलणं साहजिक आहे शेवटी सत्ताधारी विरोधी कौल आहेच.पण यात पाच वर्ष कॉंग्रेसची सत्ता असतांना कानडी जनतेने का ? नाकारलं याच उत्तर हे कॉंग्रेस चे अपयश नाकारून चालणार नाही. यात कर्नाटक च्या प्रचाराच्या रणधुमाळी पंतप्रधान पदासाठी मीच म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चडल्या तावातावाने रणांगण गाजवले पण पुन्हा पाच वर्षाची कारकीर्द आडवी आली आणि 78 जागांवर समाधान मानव लागलं यात कुमार स्वामीच्या जेडीएस ला तर कर्नाटकातील फक्त 18%लोकांनी स्वीकारलं होतं. तरी सुध्दा शेवटी - नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे. या म्हणी प्रमाणे  कॉँग्रेस ने  37 जागा असूनही जेडीएसला मुख्यमंत्री पद घ्या म्हणतं आघाडीसाठी हात पुढं केला.नंतर जे घडायचं ते घडलं या तीन अंकी नाटिकेचा आज समारोप झाला.यात कुणाची गेली आणि कुणी मिळवली यावर चर्चा नकोच.

या कर्नाटकी निवडणुकीने मात्र विजयी घोडं दौंड करणाऱ्या भाजपला 104 जागांवर अडकून ठेवलं तर कॉंग्रेस ची पुन्हा नाचक्की केली. जेडीएस ला सपशेल नाकारले.पण या नाट्य खेळीत कुमार स्वामी चे नशीब फळफळले आणि मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली ! मात्र राजकीय व्यभिचार आणि राज शिष्टाचार नैतिक मूल्य या मोठ्या मोठ्या शब्दाचा खेळ रंगला शेवटी महत्वाचं आहे ! या कॉंग्रेस- जेडीएस च्या नव्या सरकार ला शुभेच्छा फक्त -संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे

कानडी ने केला मराठा भ्रतार । एकाशी उत्तर येक नये ॥ 

अशी गत होवू नये ही अपेक्षा !

सुरेश जाधव -9404204008

No comments:

Post a Comment