Wednesday 14 March 2018

दिल्लीवारी एक सुंदर अनुभव. हवा हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !

हवा ! हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !


दिल्लीवारी एक सुंदर अनुभव

विमानात बसणे हा तसा माझा पहिलाच  अनुभव तेवढी हाय फाय लाईफ स्टाईल फक्त  येकुन होतो. कसे असेल विमान या  बाबतीत आम्ही लहान असताना अनभिज्ञ होतो पुन्हा चित्रपटात पाहिल्यावर दुरून डोंगर साजरे तशी ओळख झाली.लहान असताना गावात  कागदाची विमान बनवणे आणि  हवेत उडवणे.तर  जहाज बनवणे तेही कागदाचे पुन्हा वड्या ला जावून पाण्यात सोडणे ईतकेच शहाणे आम्ही! कधी काळी शाळेत आणि चित्रपट पडद्यावर च्या हवाई सफरीचा अनुभव घेण्याचे खुप दिवसा पासून चे ईप्सित होते. 

गावातून शहराकडे आलो तरी याचं कुतूहल होतच.तिकीट कसे असेल?  किती पैसे लागतील? विमानात चहा किती रुपया ला असेल? जेवण घ्यायच की  नको?  सीटबेल्ट कसा बांधायचा?   आणि पदार्थ खाताना काय कशासोबत खायचे? त्यात शाकाहारी मांसाहारी ची भानगड ? मग नकोच का ? काय  सोबत घेवू?  आणि काय नको? गर्ल होस्टेस कशी असते? इथ पासून ते कदचित पोहचायला तर उशीर होणार नाही ना? विमानातून खाली पाहिल्यावर कसे दिसेल? या अनंत प्रश्नानी गोंधळ घातला होता. या सर्व  प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येवून ठेपली..

तस अचानक दिल्ली ची वारी घडली याच कारण ही  वेगळच-- पंढरी च्या वाळवंटातील टाळ थेट दिल्ली मध्ये वाजणार होते.म्हणजे विराट ज्ञानेश्वरी पारायन सोहळा रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी प्रकाश महराज बोधले यांच्या कुशल नियोजनाने भव्य सप्ताह सुरू होता  त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे  भाग्य लाभले धन्यवाद जोगदंड (भाऊ )
---जाताना प्रवास "बाय कार"आणि परत लवकर बीड ला यायचे म्हणून  मी आणि  नाना महाराज यांनी अनेक अडचणीचा सामना करत अखेर दिल्ली गाठली.सप्ताहात सहभाग घेतला कीर्तन येकेले.दिवसभरात दिल्ली दर्शन केल यात बऱ्याच नवनवीन गोष्टी पहिल्या भारतीय लोकशाही चे पवित्र मंदिर पाहिले.त्याच वेळा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो बीड आणि त्या चे प्रश्न दिल्लीत मांडणारे  दिल्लीत मधील 25लाख लोकांचे प्रतिनिधी आठवले.आम्ही या विषयावर बरीच चांगली वाईट चर्चा केली--संबंधित प्रतिनिधी अर्थात --"लोकसेवक " यांच्याशी संपर्क केला.काही काम मुळीच नव्हत मात्र 1400किमी प्रवास करून आल्यावर आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधी ची सहज भेट ही महत्वाचीच असते पण शेवटी नाहीच झाली --यात काही चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधून विषय सोडून दिला.

सर्वात आठवणारी कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे आदरनिय शरद पवार साहेब यांची भेट त्याच बरोबर खा सुप्रिया ताई सुळे सोबत चर्चा यातच आय टी च्या विद्यार्थी यांच्या सोबत पवार साहेब यांच्य मनमोकळ्या गप्पा ऐकण्याचा  योग आला   -- परत दिल्लीतील वारकऱ्यांना भेटायला येणार हा दिलेला शब्द --यात फोटो काढताणाचा बाणेदारपणा आजच्या दिवसाचा वेगळा अनुभव होता नंतर  काढलेले फोटो घेण्यासाठी करावी लागलेली धावपळ आणि तिथे मिळालेली वागणूक यामुळे वरच व्हीव्ही आयपी आणि शिष्ट पण ही अनुभवले असो.

यासर्व घटना क्रमात  जनपथ--राष्ट्रपती भवन --संसदभवन --इंडिया गेट --अमर ज्योत --गांधी संग्रहालय --लाल किल्ला --चांदणी चौक मार्केट --राजघाट -- पाहिले अप्रतिम आणि सौंदर्य तसेच भव्य तेचा दिव्य अनुभव देणारे ठरले. गर्मी आणि ऐसी या दोन्ही वातावरणात शरीराची होणारी पंचाईत सहन करत .. दिवस ढळतला--दिवस मावळा होता.पाय थकले होते.पण  शेवटी नाना महराज यांनी महाराष्ट्र सदन नावांची वास्तू कोणती ती पाहण्याकरता आग्रह धरला.मग आम्ही जायच ठरवल अशा ठिकणि  जिने बऱ्याच जणांचा" वास्तू" करून टाकला. मोबाईल मध्ये लोकेशन टाकून पोचलो.तर भव्य इमारत इमारतीत गेट वर कोमल आवजात नमस्कार शब्द ऐकला.आत प्रवेश करून  रिसेप्शन मधे रूम विचारल्या तर 6 हजार आणि  मंत्र्याची  किँवा आमदार खासदार यांची शिफारस अट ऐकल्यावर धक्काच बसला.आपल्या बजट मध्ये बसत नाही .म्हणून सहज फेर फटका मारला तर  फाईव्ह स्टार हॉटेल ला लाजवेल असे फर्निचर आणि शाही बडदास्त पाहून थक्क झालो.नक्की अस असल पाहीजे शेवटी महाराष्ट्र साम्रद आहे.पण  मूठभर  लोकानाच त्याचा फायदा गरिबाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली वास्तू पुन्हा पैसे उकळन्यासाठी सज्ज हे विक्षिप्त वास्तव पहिले. चहा पिऊन थोड फोटो सेशन करत जय महाराष्ट्र ठोकला.

आत्ता रात्रीचे आठ वाजले होते परत गाड़ी सप्ताह मंडपात आली होती कीर्तन सुरू होते मस्त कीर्तन रंगात आले होते.तोच यमक करणाऱ्या केंद्रीय नेत्याचे आगमन झाले.त्याचे स्वागत वैगेरे वैगेरे झाले.परत त्यांना टाळ "आठवले" आणि वारकरी टोपी घालण्यावर चारोळी झाली.एकमेकाना टोप्या घातल्या नेते प्रेम दाखवून निघून गेले.--कीर्तन डिस्टर्ब होत पुन्हा सुरू झाले. 10 वाजता ज्ञानेश्वर माऊली ने कीर्तन संपले. आता विमान प्रवास त्यांच चक्र डोक्यात फिरत होत.कसे बसे  काही घास पोटात ढकलून हात धुवून रेडी.त्यात एअरपोर्ट वर  फोटो  काढायचे म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला.कधी  12वाजतील आणि कधी  पोचेल अस झाल होत.11.30ला एअरपोर्ट कडे निघालो.गाडी सोडायला आली होती.मैप लावला पण भरवश्याच्या  म्हशी ने टोणगा दिला.मैप मध्ये रस्ता चुकला अक्षरश 1तास फिरत राहिलो रस्ते मोठे ट्राफिक त्यात महिती नाही.आणि  वेळ चुकते की काय याची चिंता पण सोडवायला आलेल्या संतोषराव आणि अशोक घोडके दाजी(भाऊ चे जावई) यांच्या मुळे एकदाचे टर्मिनल 3च्या गेटवर  पोचलो.ड्रॉप करायला आलेल्याचा निरोप घेतला .

पहिल्यांदा अंतर राष्ट्रीय विमान भव्य विमानतळावर जरा सा गोंधळलेल्य अवस्थेत आम्ही दोघो अंदाजे गेट वर तिकीट दाखवून आत प्रवेश केला.इंग्रजीच थोड बहुत ज्ञान कामी आला ! plz म्हणून गोऱ्या मुलीला तिकीट दाखवल.तिनी बोर्डिंग साठी चेकिंग पोस्ट ला जाण्याची सूचना केली. लाईन मध्ये  उभा राहिलो पण शांत नव्हतो कारण महिती काहीच नव्हत  पुन्हा काऊंटर वर जावून  विचारत अतिक्रमण केल .एकदा चा बोर्डिंग पास मिळाला. आत्ता शांत पणे वेटिंग रूम कडे जाता ना मॉल पेक्षा जास्त घमघमाट आणि रात्री चे  1 वाजले आसताना सकाळची घाई आणि लगबग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. फोटो काढायचे का ? नको म्हणत हळूच सेल्फी घेतली.जिकडे पहावे तिकडे नवे द्र्श्य होत नवा अनुभवखूप काही शिकवून जातो. बरेच फोटो  टिपले.1तास वेटिंग केल्यानंतर 2वाजता विमानाच्या दरवाजा जवळ वेलकम करणाऱ्या सुंदरी चा कोमल आवाज कानावर पडला.मग सीट वर जावून बसलो.शेजारी कोण ? हा आणखी कुतूहलाचा प्रश्न ? पण मुंबईचा अंजान मित्र भेटला.बेल्ट अंदाजे लावला.परत माहिती असल्यासारखे अज्ञान झाकत नकळत शेजार्याला फॉलो करत.सर्व क्रिया केल्या.

एकदाच  2.25 मी विमान टेक ऑफ झाल.ताऱ्यांच्या सानिध्यात भारत भूमीचे लुकलुक नारे सुंदर दर्शन घडले. बऱ्याच दिवसाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होताच! हेड फोन कांनात घालून लिव्हल वेळ कसा गेला समजल नाही. मधल्या सर्व सुविधाचा लाभ घेत.सकाळी 5 वाजता मुंबईत  लैन्ड झालो  -- पुन्हां काही वेळाने परत टेकअप झालो थेट औरंगाबाद सकाळी 6.20 एअर पोर्ट मधून दोघे बाहेर  पडलो. तो निर्धार करत पुन्हा प्रवास करायचा ! व्ही आय पी म्हणून ! संपूर्ण प्रवास प्रेरणादाई झाला
 
धन्यवाद
सुरेश

No comments:

Post a Comment