Saturday, 19 May 2018

तीन अंकी नाटिकेचा शेवट -- कर्नाटकी जनतेवर च्या इच्छेविरुद्ध चे सरकार.


येडियुरप्पा च्या बाबतीत "पाल" चुकचूकली !

कर्नाटकतील नाटकी खेळी चे नाटक आता संपले आहे ! इथे कोन जिंकले कोन हरले या पेक्षा न्याय व्यवस्थेवरील विश्वास  लोकांमध्ये द्रढ झाला हे मात्र नक्की !

कॉंग्रेस सरकारच्या विरोधात जनमताचा कौल भाजप ला 104 अशा सर्वादिक जागा निवडून दिल्या.तर कॉंग्रेस ला 78 वर विजय कौल मिळाला.या दोन्ही पक्षाच ठीकपण जेडीएस  ला 37जागा निवडून दिल्या म्हणजे जनमताची तिसरी पसंदी होती. सत्ता स्थापनेत भाजप कडून अतिरेकी सत्तेची महत्वाकांक्षा दिसली यात लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुड्वत राजभवनाच्या पटावर राजकीय पाठ गिरवले. यात अति घाई आणि संकटात नेई या म्हणी प्रमाणे जे घडायचं ते घडलं.यात फक्त कानडी जनतेला अपेक्षित मतदानाच्या कौला विरुध्द राजकीय समीकरने जुळली.(मनाविरुद्ध आणि मता विरुध्द नको असलेले सरकार आणि पक्ष यांच्या हातात सत्ता सूत्र येणे यांचा अर्थ शेवटी कानडी जनतेवर राजकीय बलात्कार म्हणावा लागेल) ज्यालाची तुलना गोवा नी मणिपूर मेघालय त्रिपुरा या बाबतीत जे घडले तेच इथे ही घडले.यात दोष भाजप केंद्रात सत्तेवर आहे म्हणून सर्वजण या बाबतीत बोलणं साहजिक आहे शेवटी सत्ताधारी विरोधी कौल आहेच.पण यात पाच वर्ष कॉंग्रेसची सत्ता असतांना कानडी जनतेने का ? नाकारलं याच उत्तर हे कॉंग्रेस चे अपयश नाकारून चालणार नाही. यात कर्नाटक च्या प्रचाराच्या रणधुमाळी पंतप्रधान पदासाठी मीच म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चडल्या तावातावाने रणांगण गाजवले पण पुन्हा पाच वर्षाची कारकीर्द आडवी आली आणि 78 जागांवर समाधान मानव लागलं यात कुमार स्वामीच्या जेडीएस ला तर कर्नाटकातील फक्त 18%लोकांनी स्वीकारलं होतं. तरी सुध्दा शेवटी - नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे. या म्हणी प्रमाणे  कॉँग्रेस ने  37 जागा असूनही जेडीएसला मुख्यमंत्री पद घ्या म्हणतं आघाडीसाठी हात पुढं केला.नंतर जे घडायचं ते घडलं या तीन अंकी नाटिकेचा आज समारोप झाला.यात कुणाची गेली आणि कुणी मिळवली यावर चर्चा नकोच.

या कर्नाटकी निवडणुकीने मात्र विजयी घोडं दौंड करणाऱ्या भाजपला 104 जागांवर अडकून ठेवलं तर कॉंग्रेस ची पुन्हा नाचक्की केली. जेडीएस ला सपशेल नाकारले.पण या नाट्य खेळीत कुमार स्वामी चे नशीब फळफळले आणि मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली ! मात्र राजकीय व्यभिचार आणि राज शिष्टाचार नैतिक मूल्य या मोठ्या मोठ्या शब्दाचा खेळ रंगला शेवटी महत्वाचं आहे ! या कॉंग्रेस- जेडीएस च्या नव्या सरकार ला शुभेच्छा फक्त -संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे

कानडी ने केला मराठा भ्रतार । एकाशी उत्तर येक नये ॥ 

अशी गत होवू नये ही अपेक्षा !

सुरेश जाधव -9404204008

Sunday, 6 May 2018

घामाचे सवंग लचके तोडायचे थांबवा ! महाश्रमाचे "महाइव्हेंट" !



श्रमांच्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची थांबवा ! 

राबणाऱ्या हातांना विश्रांतीचा स्पर्श नाही.हर्ष तो कसला इथे सवंग महाश्रमाला अर्थ नाही.

आग ओखनार्या सूर्याला मस्तकावर घेवून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या हातांनाकधी आम्ही विश्रांती देणारा का ? आज हाय टेक च्या आणि डिजिटल च्या नावाखाली तुमची मंत्रालय हाय फाय आणि वायफाय झाली. लिफ्ट आणि शिफ्ट वर तुमची नोकरशाही ची बडदास्त सुरू आहे.एसी मध्ये बसून लिहायला कोमल हाताला कष्ट होत होते  म्हणून कॉम्पुटराईझ करून टाकलं.तरी सही चे कष्ट त्यात किती रेषा ओढ्याच्या म्हणून त्या ए सी तल्या आणि "तिशीतल्याची" लईच काळजी.डिजिटल सिग्नेचर केली झंज्टच नकोयाची सोय केली .पण आमच्या साठीतल्या बापाच्या हातातील कुदळ फावडं टिकाव आणि माईच्या हातातली पाटी यांना दिसत नाय.म्हणे श्रम दान करा!  महाश्रमदानातून जल चळवळ ! तूमच्या डोक्यातली वळवळ अगोदर थांबवा. उन्हा तान्हात बाया पोरांना घेवून चर खोदण्यासाठी जीवाची हाल अपेष्टा ! करून घेणाऱ्या सोबत सेल्फी पुरत आणि फोटोसेशन चा महाइव्हेंट कशासाठी ? राबणाऱ्याच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आसुरी आनंद घेवू नका.

लाही लाही होणाऱ्याच्या हातातले टिकाव नक्की घ्या पण कमीत कमी 4 तास तर महाश्रमात घाम गाळा.मग घामाचे थेंब झटकता ना चे फोटो नक्की खेचा पण तेव्हा कपाळावर चा घाम नाही तर  पाठी पोटावर पाट वहायला लागतील.यांची जान ठेवा तसं होन दूर फक्त चार टिकाव हाणून पावन झाल्यानं शिवार पणेदार होतो का ?  मग आम्हाला लोक सहभागाचे गीन्यान शिकवा. धुरळा उडवत गाडी नी यायच अन गोवर्धन उचलल्या गत फुकटचा रुबाब दाखवत निघून जायचं काय पोरं खेळ लावला का ? पुन्हा नाव लावयला मोकळे श्रेय घेण्याचातर भस्म्या जडला आहे.   

लईचश्रम परिहार करायचं ज्ञान पाजळायची हौस आहे ना तर मग  सगळ्या क्लास 1अधिकाऱ्यानी हातात कुदळ फावडं घेवून चैत्रातच्या भर उन्हात एक दिवसच काम करावं .ताका पुरतं रामायण आणी फोटो पुरत श्रमदान कुठं तरी थांबवा.तुम्हाला पाटी उचलण्यासाठी आणि टिकाव धरण्याचासाठी संवैधानिक पदावर नाय पाठवलं.माय बाप शेतकऱ्यांच्या हातातले कायमच टिकाव कसं जाईल याचा निर्णय घेण्या साठी पाठवलं आहे. लई पुढारलेल्या गप्पा मारतानार्या 
पुढाऱ्यांना लांजा सोडल्यासारखं कशाचं भांडवल करावं आणि मार्केटिंग करावं याला जणांच्या नाही तर मनांच्या मर्यादा तरी ठेवा म्हणावं.  गेल्या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळात डोक्यावरचा हंडा आणि कमरेवरची घागर या बाबतीत विचार केला असता तर ही वेळ आली नसती.तीन वर्षात जलसंधारणाच्या बाबतीत काय केलं याच गणित कागदोपत्री नकोय? किती शेतातला उन्हाळा संपलय पीक आणि पाणी आहे.किती गावाची खरी तहान भागली हे प्रत्यक्ष फेर फटका मारून पहा मग अमक्या शिवार आणि तमक्या योजना चे खरे वास्तव कळेल.बसण्या पासून उठण्यापर्यंत सर्व कामे करणारे मशीन तयार आहेत. यंत्र युगात जगतोय हे सगळं असतांना "महाइव्हेंट" कशा साठी परत या गोरगरीबांच्या रक्त गोठून तयार झालेल्या घामावर स्वतःची राजकीय पोळी भाजायची का ?  घरात वातानुकूलित; गाडीत ए सी; बाथरूम मध्ये एसी; आहे.म्हणून तुमच्या बुडाला गरम लागत नाही.पन बारा महिने आणि चोवीस तास राबणाऱ्या हातांना परत या महाइव्हेंट च्या नावाखाली  राबायला लावून  गाजर दाखवू नका.बीड जिल्ह्यासाठी सरकार म्हणून काय जबाबदरी पार पाडली हे अगोदर सांगा किती प्रकल्प पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पूर्ण केलं .अधूर्या आणि अपुऱ्या प्रकल्पाचं वीस वीस वर्षाचे घोंगडे आडल कुटं? सिंचन विहिरी आणि शेततळी या बाबतीत आग्रह सोडून अंमलबजावणी कधी ?  सिंचन घोटाळ्याच्या नावान तेल लावून बोंबलत होता त्याच काय झालं ? या प्रश्नाची उत्तर द्यायचं सोडून  फोटो सेशन चा "महाइव्हेंट" ची चांगली मार्केटिंग चालू आहे.तुमचं अपयश झाकून ठेवण्यासाठी चा  केविलवाणा  प्रयत्न करू नका. सुंदर अप्सरा लग्नाला सजवायची अन स्वयंवर सांगून गाढवाच्या लग्नाची गोष्ट करायची.ही गत तुकडा टाकून पोट भरत नसत.तसे बक्षिसाचे अमिष दाखवून कायम राबणाऱ्या लोकांचं रक्त आटवू नका?  वर्षातून एक दिवस ठरवा सगळे अधिकारी आणि पांढरपेशी बगळे शेतात आणून फक्त येक दिवससक्तीने  काम करायला लावा.मग महाइव्हेंट मध्ये पाच मिनीटं केलेली फोटोग्राफि'  दिवस भर करा. म्हणावं ! पन घामाचे सवंग लचके तोडायचे थांबवा. कोटीच्या घोषणेचे मुरलेलं पाणी आणि पाणी योजनेच लीकेज काढलं तरी.बिना घामाचा शिवार पा पाणेदार  होईल.

सामजिक जबाबदारी ची जान ठेवत पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून लोकजनचळवळ उभी राहिली.हे कौतुक आहे मात्र आपलीच पाट आपण किती दिवस थोपटून घ्यायची. कर्तव्य करण्यात आणि जबाबदरी पार पाडण्यात सरकार कमी पडतंय का ? बीड जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न सोडवणे बाकी आहे?  त्यात पाणी या गंभीर प्रश्नावर फक्त तोंडाला पाने पुसून भागणार नाही. घामानं माखलेली बनेल अन खडीच्या साली पोटाची भूकेसाठी चे हाताला पडलेले  घट्टे आणखी भूजले नाहित ! प्रत्येक हात राबत होता.तेव्हा पासून आज पर्यंत केलं.बदल काय झाला तर झोपडीतले प्रश्न सोडवण्यासाठी बांधण्यात आलेली विटा माती ची ऑफिस  आज आर सी सी झाली.ऑफिसमधे बसणारी जनसेवक जनतेकडून सेवा करून घेण्यात मग्न झाली. कधी गरिबांच्या रोटी चा विचार झालाच नाही.त्या राबणाऱ्या हातांच्या जागी मशीन आलेच नाही.म्हणूनच की काय पून्हा दोन पायांची माणसे मशीन प्रमाणे राबवून घ्यायचा माणस ठेवून तर हे होत नाही ना ? 

वाटलं होत अधिकाऱ्याच्या आणि नेत्यांच्या हातातील कुदळ आत्ता शांत बसणार नाय  ! फावडयाच (खोर)अन पाटी (घमेंल )चे ही शीन फिटणार शेवटी हात लागला नव्हं का ? महाश्रम दाण च्या पटावर सगळंच कसं "झाक" असतं. डपड वाजत असतं रुबाब झाडणारांची संख्या कमी नसते. असो पन खरं काम करणारी माणसं बाजूला राहतात.त्यांचं कष्ट आणि श्रम हे लक्षात घेतले जातच नाही हे दुर्दैव .शासन म्हणून जबाबदरी पार पूर्ण केली तर ही वेळ येणार नाही .शेवटी  गोर गरीबाच्या महाश्रमाचा  फक्त सेल्फी पुरता "महाइव्हेंट" होवु नये.तसेच महाश्रमाचे महा शोषण थांबवावे ही अपेक्षा .


सुरेश जाधव "लक्ष्मनसूत ! 

Tuesday, 20 March 2018

माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार! दिल्लीवारी एकअनुभव भाग 2

माफ कर  "विठ्ठला" आज फराळ तर करणार!  

आपुलीकीचा अविस्मरणीय पाहुणचार दिल्लीवारी एकअनुभव 


सारे भारतीय माझे बांधव आहेत-
--
सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर विठ्ठला आज फराळ तर करणार. --असेच काही किस्से अविस्मरणीय 

प्रवास करतांनाचे काही प्रसंग कदचित कधीच विसरता येत नसतात. मानस ओळखीची नसली तरी  आपुली आणि प्रेम मिळाले की कायम स्वरूपी -हदयात घर करून राहतात.असाच अचानक दिल्ली जाण्याचा प्रसंग आला.नियोजन कुटलेच  नव्हते फक्त आमच्या दोघांवर निर्भेळ प्रेम करणारे हरिदास (भाऊ) जोगदंड यांच्या अति आग्रहामुळे शेवटीटाळता  आले नाही.बीड वरून निघालो प्रवास करत औरंगाबाद वरून धुळे - इंदौर प्रवास सुरू झाला.सहज गप्पा  सुरू आसताना .इंदौर शहरातून बाय पास ने चाललो होतो. जोगदंड भाऊ नी सहज विषय काढत इथे आपल्या कडचे अंकुश भवर आहेत.त्यांना फोन केला तर लगेच घरी या तसे जावू देणार नाही.आग्रह मोडता येन शक्य नव्हत.बाय पास ने 10 किमी पुढे गेलेलो परत गाडी फिरवली.शहरात प्रवेश केला.

घर शोधत रस्त्याने फिरताना इंदौर शहराच्या स्वच्छतेच्या प्रेमात पडायला वेळ लागल नाही.प्रत्येक चौकात सुंदर झाडे आणि शिस्तीत चालणारी वाहतूक रस्त्याच्या दुतर्फा ग्रीन बेल्ट विशेष त्यात झाडे होती.अन तीही हिरवीगार.यामुळे सुंदर शहर असल्याचा खास अनुभव आला.20 ते पंचवीस किलोमीटर च्या विस्तीर्ण भूभागात पसरलेल शहरात आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे घाण नजरेस पडलीच नाही.शोधत शोधत घरी पोचलो.कोल्हे यांच्या घरी सुंदर जेवण टचुन खाल्ले. अन ढेकर देते वेळी नकळत मनातल्या मनात सुंदर जेवण बनवणाऱ्या ताई चे आभार मानले.सहज गप्पा निघाल्या इंदौर मध्ये आम्ही शिवजयंती मोठ्या थाटात करतो अख्ख इंदौर पाहतच राहत.अस म्हणताणा त्यांच शिवछत्रपतीवरील प्रेम पटकन डोळ्यात टिपले.आम्ही  प्रत्येक महिन्याला सप्ताह करतो.खुप महाराज मंडळी येतात.आम्हला वारकरी संप्रदाय इथे मोठ्या वैभवात टिकून ठेवायचा.दिवसभर काम करायच कीर्तनात तेवडं सर्व विसरून सहभागी होतो यात आमचा स्वार्थ काहीच नाही.हे वाक्य एखाद्या महाराजा पेक्षा महत्वाच वाटल. पण शेवटी नाळ कीर्तनात जोडलेली आहे. 20-30वर्षा पूर्वी गाव सोडलेली ही मानस या अपरिचित प्रदेशात लहान मोठे उद्दोग करत. स्वतःच अस्तित्व निर्माण करून आहे

त गाव सोडून चांगला जम बसला म्हणत आसताना अर्धा इंदौर मध्ये महाराष्ट्रातील मानस आहेत.एक मेकांना मदत करत आम्ही गुण्यागोविंदाने राहतो.आता इथल्या महानगर पालिकेत काही नगरसेवक आहेत.एक आमदार आहे अस अभिमानांने सांगत होती.त्या वेळी आम्हाला गड काबीज केल्या गत आपुलकी आणि दुसऱ्या क्षणी आनंद वाटला.

त्यांचा निरोप घेवून पुढं निघालो.उज्जैन मध्ये महा कालेश्वर दर्शन घेतले. तिथेच कालभैरव मंदिरात गेलो देवाला दारू पाजताना पुजारी पाहिले मंदिराच्या समोर देशी विदेशी सर्व प्रसादालय होती.श्रध्देने लोक घेऊन यायचे मूर्ती समोर बसलेल्या पुजार्याच्या हातात. ती शिलबंद बाटली द्यायची .मग येटित बाटली चे झाकण फोडून समोर ठेवलेय छोट्या प्लेट मध्ये अर्धी ओतून देवाच्या समोर धरली हळू हळू हात कानोडा करत अर्धी बाटली मूर्ती च्या तोंडात ओतली.अर्धी प्रसाद म्हणून दिली हे सगळं आम्ही दुरून पाहत होतो. मला हे मुळीच आवडल नाही.आमच्यातील एक जण सांगत होता.दारू कुठे जाते याचा पत्ता लागत नाही. मनात वाटत इथे किती ब्रँड एकत्र होत आहेत.आत मध्ये कॉकटेल होत असेल.कस पचवत असेल.परत हे पुजारी सर्वजण गेल्यावर आतली दारू कशी काडत असतील कदचित त्याच मंदिरात देवाचा प्रसाद  म्हणून कॉकटेलचा चेस तर होत नसेल. असा विचार करत मंदिरतून  बाहेर पडताना सहज वाक्य सुचले.यहाँ  प्रसाद के  तौर पे शराब मिलता है! टोपण टोपण सर्वजण घ्या म्हणत सर्वजण गाडीत बसलो.

मध्य प्रदेश मधील रस्त्याने थेट शिवपुरी मार्गे आग्रा  सर करायचे डोक्यात होते.जवळजवळ 600किमी चा प्रवास होता.रात्री थांबायचे कोठे विचार सुरू होता. लगेच जोगदंड भाऊ च्या डिक्शनरी मधील माजी सैनिकाचे नाव समोर आले.अशोक शीकदल याना फोन  केला. किती वेळ झाला तरी घरी या.वाट पाहतोय अस फोन वरून सांगितले.प्रवास करत पहाटे 2वाजता  पोचलो यात गुगल मैप असल्यामुळे अपार्टमेंट च्या समोर गेट वर गाडी उभा केली.सेकुरिटि ने विचार पुस केली.2 वाजता कॉल केला की लगेच तो माजी  सैनिक गेट वर हाजर.गाडी बंगल्यासमोर पार्क केली लागलीच सर्वजण उतरलो.घरात गेलो पाणी घेतल.आराम करायला सांगितले.सकाळी जेवण केल्याशिवाय जायच नाही."भाऊसाहेब "अस सांगितलं आम्ही उपवास आहे.काही करू नका ! बोलणार तेवडयात आम्हाला पण एकादशी असते उपवासाचे करू म्हणत तुम्ही आराम करा सांगून काकू निघून गेल्या  प्रवासामुळे पटकन  आम्ही सर्वजण झोपलो पण हे मेजर आणि त्यंच्या पत्नी तीन वाजल्या पासून तयारीला लागले झोपेत त्यांची कुजबुज आणि धडपड येकु येत होती.

सकाळी सहा वाजता आम्ही उठलो सात जण आंघोळ करून तयार होई पर्यंत काकूनी गरम चहा आणून दिला.सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार. सकाळी तीन वाजल्यापासून आग्रहाने स्वयंपाक करणारी माऊली आणि तिला मदत करण्यासाठी धावपळ करणारे मेजर भेंडी चिरून देण्यापर्यंत कष्ट आणि त्यामागच प्रेम.सकाळी 7.30वाजता प्रेमाने  सात जणांसाठी स्वयंपाक करून आग्रहाने वाढणारे शीकदल  दांपत्य आणि पुढे एकादशी ठरवले चला यांचे मन मोडायच नाही.

म्हणून पोटभर जेवण केल.स्वीट म्हणून काकूनी त्यांच्या माहेर अर्थात कोलकाता येथून आणलेला स्पेशल पेढा दिला.तो खाण्याचा सर्वात जास्त आनंद संतोष जोगदंड यांना मिळाला.शेवटी जेवण झाल्यावर आम्ही निघण्याच्या बेताने बाहेर आलो तर ते कुटुंब भारावून गेल डबडबल्या डोळ्यानी त्यांनी निरोप दिला."भाऊसाहेब" थोडा और लीजीए हा त्यांनी उच्चारलेला शब्द आज ही कांनात घुमतोय. सकाळी तीन वाजता स्मित हास्य चेहर्यावर  घेवून स्वागत करतांनाचा भाव आणी तीच स्माईल निरोप देतांना.भेटून आनंद वाटला या माणसाला तस पाहिलेतर आम्ही मित्राचे मित्र म्हणजे पाहुणे नाही तर रावले होतो मात्र त्यांनी केलेला पाहुणचार चिर स्मरणात राहील.किती प्रेमळ मानस तेही ना नात्यातले ना गोत्यात आणणारे खुप काही शिकवून गेले.शेवटी नाना महाराज यांच त्यावेळी बोललेल वाक्य आठवले भाग्यवान आहोत देशभक्ताच्या घरी एकादशीचा  फराळ मिळाला.मी त्यांना हिंदीत हे वाक्य सांगितले हसत मुख त्यानी आनंदने हमे भी तो वारकरी महराज के सेवा का अवसर मिला! हम धन्य हो गये. बोलत बोलत निरोप घेतला.सहज विचार मानत आला भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत याचा अनुभव आला -- या दांपत्य बाबतीत मूळ  पश्चिम बंगाल चे रहवाशी. राहतात  आग्ऱ्यात आणि महाराष्ट्रीयन  लोकांशी आपुलकी चे नाते हा अनोखा योगा योग अविस्मरणीय ठरला.

असो शेवटी आपुलकी आणि माणुसकी या मुळेच सर्व ठिकाणी प्रेम मिळत 
--
सुरेश जाधव 

Wednesday, 14 March 2018

दिल्लीवारी एक सुंदर अनुभव. हवा हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !

हवा ! हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !


दिल्लीवारी एक सुंदर अनुभव

विमानात बसणे हा तसा माझा पहिलाच  अनुभव तेवढी हाय फाय लाईफ स्टाईल फक्त  येकुन होतो. कसे असेल विमान या  बाबतीत आम्ही लहान असताना अनभिज्ञ होतो पुन्हा चित्रपटात पाहिल्यावर दुरून डोंगर साजरे तशी ओळख झाली.लहान असताना गावात  कागदाची विमान बनवणे आणि  हवेत उडवणे.तर  जहाज बनवणे तेही कागदाचे पुन्हा वड्या ला जावून पाण्यात सोडणे ईतकेच शहाणे आम्ही! कधी काळी शाळेत आणि चित्रपट पडद्यावर च्या हवाई सफरीचा अनुभव घेण्याचे खुप दिवसा पासून चे ईप्सित होते. 

गावातून शहराकडे आलो तरी याचं कुतूहल होतच.तिकीट कसे असेल?  किती पैसे लागतील? विमानात चहा किती रुपया ला असेल? जेवण घ्यायच की  नको?  सीटबेल्ट कसा बांधायचा?   आणि पदार्थ खाताना काय कशासोबत खायचे? त्यात शाकाहारी मांसाहारी ची भानगड ? मग नकोच का ? काय  सोबत घेवू?  आणि काय नको? गर्ल होस्टेस कशी असते? इथ पासून ते कदचित पोहचायला तर उशीर होणार नाही ना? विमानातून खाली पाहिल्यावर कसे दिसेल? या अनंत प्रश्नानी गोंधळ घातला होता. या सर्व  प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येवून ठेपली..

तस अचानक दिल्ली ची वारी घडली याच कारण ही  वेगळच-- पंढरी च्या वाळवंटातील टाळ थेट दिल्ली मध्ये वाजणार होते.म्हणजे विराट ज्ञानेश्वरी पारायन सोहळा रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी प्रकाश महराज बोधले यांच्या कुशल नियोजनाने भव्य सप्ताह सुरू होता  त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे  भाग्य लाभले धन्यवाद जोगदंड (भाऊ )
---जाताना प्रवास "बाय कार"आणि परत लवकर बीड ला यायचे म्हणून  मी आणि  नाना महाराज यांनी अनेक अडचणीचा सामना करत अखेर दिल्ली गाठली.सप्ताहात सहभाग घेतला कीर्तन येकेले.दिवसभरात दिल्ली दर्शन केल यात बऱ्याच नवनवीन गोष्टी पहिल्या भारतीय लोकशाही चे पवित्र मंदिर पाहिले.त्याच वेळा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो बीड आणि त्या चे प्रश्न दिल्लीत मांडणारे  दिल्लीत मधील 25लाख लोकांचे प्रतिनिधी आठवले.आम्ही या विषयावर बरीच चांगली वाईट चर्चा केली--संबंधित प्रतिनिधी अर्थात --"लोकसेवक " यांच्याशी संपर्क केला.काही काम मुळीच नव्हत मात्र 1400किमी प्रवास करून आल्यावर आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधी ची सहज भेट ही महत्वाचीच असते पण शेवटी नाहीच झाली --यात काही चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधून विषय सोडून दिला.

सर्वात आठवणारी कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे आदरनिय शरद पवार साहेब यांची भेट त्याच बरोबर खा सुप्रिया ताई सुळे सोबत चर्चा यातच आय टी च्या विद्यार्थी यांच्या सोबत पवार साहेब यांच्य मनमोकळ्या गप्पा ऐकण्याचा  योग आला   -- परत दिल्लीतील वारकऱ्यांना भेटायला येणार हा दिलेला शब्द --यात फोटो काढताणाचा बाणेदारपणा आजच्या दिवसाचा वेगळा अनुभव होता नंतर  काढलेले फोटो घेण्यासाठी करावी लागलेली धावपळ आणि तिथे मिळालेली वागणूक यामुळे वरच व्हीव्ही आयपी आणि शिष्ट पण ही अनुभवले असो.

यासर्व घटना क्रमात  जनपथ--राष्ट्रपती भवन --संसदभवन --इंडिया गेट --अमर ज्योत --गांधी संग्रहालय --लाल किल्ला --चांदणी चौक मार्केट --राजघाट -- पाहिले अप्रतिम आणि सौंदर्य तसेच भव्य तेचा दिव्य अनुभव देणारे ठरले. गर्मी आणि ऐसी या दोन्ही वातावरणात शरीराची होणारी पंचाईत सहन करत .. दिवस ढळतला--दिवस मावळा होता.पाय थकले होते.पण  शेवटी नाना महराज यांनी महाराष्ट्र सदन नावांची वास्तू कोणती ती पाहण्याकरता आग्रह धरला.मग आम्ही जायच ठरवल अशा ठिकणि  जिने बऱ्याच जणांचा" वास्तू" करून टाकला. मोबाईल मध्ये लोकेशन टाकून पोचलो.तर भव्य इमारत इमारतीत गेट वर कोमल आवजात नमस्कार शब्द ऐकला.आत प्रवेश करून  रिसेप्शन मधे रूम विचारल्या तर 6 हजार आणि  मंत्र्याची  किँवा आमदार खासदार यांची शिफारस अट ऐकल्यावर धक्काच बसला.आपल्या बजट मध्ये बसत नाही .म्हणून सहज फेर फटका मारला तर  फाईव्ह स्टार हॉटेल ला लाजवेल असे फर्निचर आणि शाही बडदास्त पाहून थक्क झालो.नक्की अस असल पाहीजे शेवटी महाराष्ट्र साम्रद आहे.पण  मूठभर  लोकानाच त्याचा फायदा गरिबाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली वास्तू पुन्हा पैसे उकळन्यासाठी सज्ज हे विक्षिप्त वास्तव पहिले. चहा पिऊन थोड फोटो सेशन करत जय महाराष्ट्र ठोकला.

आत्ता रात्रीचे आठ वाजले होते परत गाड़ी सप्ताह मंडपात आली होती कीर्तन सुरू होते मस्त कीर्तन रंगात आले होते.तोच यमक करणाऱ्या केंद्रीय नेत्याचे आगमन झाले.त्याचे स्वागत वैगेरे वैगेरे झाले.परत त्यांना टाळ "आठवले" आणि वारकरी टोपी घालण्यावर चारोळी झाली.एकमेकाना टोप्या घातल्या नेते प्रेम दाखवून निघून गेले.--कीर्तन डिस्टर्ब होत पुन्हा सुरू झाले. 10 वाजता ज्ञानेश्वर माऊली ने कीर्तन संपले. आता विमान प्रवास त्यांच चक्र डोक्यात फिरत होत.कसे बसे  काही घास पोटात ढकलून हात धुवून रेडी.त्यात एअरपोर्ट वर  फोटो  काढायचे म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला.कधी  12वाजतील आणि कधी  पोचेल अस झाल होत.11.30ला एअरपोर्ट कडे निघालो.गाडी सोडायला आली होती.मैप लावला पण भरवश्याच्या  म्हशी ने टोणगा दिला.मैप मध्ये रस्ता चुकला अक्षरश 1तास फिरत राहिलो रस्ते मोठे ट्राफिक त्यात महिती नाही.आणि  वेळ चुकते की काय याची चिंता पण सोडवायला आलेल्या संतोषराव आणि अशोक घोडके दाजी(भाऊ चे जावई) यांच्या मुळे एकदाचे टर्मिनल 3च्या गेटवर  पोचलो.ड्रॉप करायला आलेल्याचा निरोप घेतला .

पहिल्यांदा अंतर राष्ट्रीय विमान भव्य विमानतळावर जरा सा गोंधळलेल्य अवस्थेत आम्ही दोघो अंदाजे गेट वर तिकीट दाखवून आत प्रवेश केला.इंग्रजीच थोड बहुत ज्ञान कामी आला ! plz म्हणून गोऱ्या मुलीला तिकीट दाखवल.तिनी बोर्डिंग साठी चेकिंग पोस्ट ला जाण्याची सूचना केली. लाईन मध्ये  उभा राहिलो पण शांत नव्हतो कारण महिती काहीच नव्हत  पुन्हा काऊंटर वर जावून  विचारत अतिक्रमण केल .एकदा चा बोर्डिंग पास मिळाला. आत्ता शांत पणे वेटिंग रूम कडे जाता ना मॉल पेक्षा जास्त घमघमाट आणि रात्री चे  1 वाजले आसताना सकाळची घाई आणि लगबग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. फोटो काढायचे का ? नको म्हणत हळूच सेल्फी घेतली.जिकडे पहावे तिकडे नवे द्र्श्य होत नवा अनुभवखूप काही शिकवून जातो. बरेच फोटो  टिपले.1तास वेटिंग केल्यानंतर 2वाजता विमानाच्या दरवाजा जवळ वेलकम करणाऱ्या सुंदरी चा कोमल आवाज कानावर पडला.मग सीट वर जावून बसलो.शेजारी कोण ? हा आणखी कुतूहलाचा प्रश्न ? पण मुंबईचा अंजान मित्र भेटला.बेल्ट अंदाजे लावला.परत माहिती असल्यासारखे अज्ञान झाकत नकळत शेजार्याला फॉलो करत.सर्व क्रिया केल्या.

एकदाच  2.25 मी विमान टेक ऑफ झाल.ताऱ्यांच्या सानिध्यात भारत भूमीचे लुकलुक नारे सुंदर दर्शन घडले. बऱ्याच दिवसाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होताच! हेड फोन कांनात घालून लिव्हल वेळ कसा गेला समजल नाही. मधल्या सर्व सुविधाचा लाभ घेत.सकाळी 5 वाजता मुंबईत  लैन्ड झालो  -- पुन्हां काही वेळाने परत टेकअप झालो थेट औरंगाबाद सकाळी 6.20 एअर पोर्ट मधून दोघे बाहेर  पडलो. तो निर्धार करत पुन्हा प्रवास करायचा ! व्ही आय पी म्हणून ! संपूर्ण प्रवास प्रेरणादाई झाला
 
धन्यवाद
सुरेश

Tuesday, 13 February 2018

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण

चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

(वळखण ) मातीतल्या माणसाचा मातीत जाई पर्यंत चा संघर्ष माणुसकी च्या नात्याने समजून घेता येईल का ? अस्मानी सोबत सुलतानी जीवावर उठते तेव्हा वाली कोण हा प्रश्न आजही अधांतरी च आहे. आत्महत्यावर  राजकारण करणारे  सर्वच जण  एका माळेचे मनी आहेत.राजकीय पोळी भाजण्यासाठी सरनाची  होळी  कमी  पडते की काय? याचा विचार  करतात लोकांच्या सेवेची हमी देणारे हमखास धोका देतात याच  उत्तर  70 वर्षाच्या स्वातंत्र्यात मिळाल नाही. जगण्याचा संघर्ष थांबला नाही तिथे आश्वासन देण्यात आणि स्वप्न दाखवण्यात डिजिटल पणा आलाय.खर तर चटणी मीठ  पाण्या सोबत ओली झालेली हक्काची भाकर मिळण्याचे स्वतंत्र जरी देवू शकलात तरी महापुरुषाचे लोकशाही चे स्वप्न पूर्ण होइल.अन्यथा इथली संवेदना विरहात स्वार्थी लबाड मंडळी लोकशाही चे कधी न सरनारे  ग्रहणच म्हणाव लागेल

---- लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगा! विकास होईल ही भोळी अशा घेवून जगणारा मतदार तरी कुठे राहिला आहे ,आणि अजेन्डा घेवून वागणारा उमेदवार तरि कुठं राहिला ,कारण !सत्ता आणि पद हे जर लोकशाही चे भ्रष्टाचार पोसनारे कुरन असेल तर ,सामान्य मतदार त्याचा हक्क बजावत नाही तर ,या कुरणाला कुंपण लावत आहेत ,समिकरण ठरलय ,राजकारणात भांडवल गुंतवताना किती पट परत येईल याच गणित मांडलेल असत ,किती उल्लू बनवता राव ,एका रस्त्याला 10 नावं ,गावातल्या पाण्यात पाप ,आणि लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगायला पहिजे . ज्याच्या बूढ़ा खाली सायकल नव्हती तो आज जनतेच्य छतडावर  एसी च्य गाड्या घेवून फिरवतो.हे कस शक्य होत ,गोर् गरीब लोकांच्या मुलाच्या खाऊ मध्ये डोकावनारे ,खाऊ राजकारनात आल्याने कुठली लोकशाही सम्रध होणार हा खरा प्रश्न आहे  बहिणी बाळी च्या कुंकवाला दारूचे व्यसन लावून समाज भूषण म्हणून मिरवणाऱ्या षंड आणि स्वःतला गुंड म्हणवून घेणार्या लोकांनी समाजाची इज्जत वेशिला टांगली आहे !

आर ! बस करा या तमास गिराचा कलुशित गैर व्यवहार ,नीति आणि मती गुंग झाल्या नंतर राजनीति च्या नादी लागलेल्या माकडा गत अवस्था आज यांची झालीय , लोकांची ----पुसण्या पर्यंत पुंड पुंड करणार्या आवलादी ची कमी आज  राजकारणात  नाही .

    त्यांच ही एक परती खर लोक घड़ी चा विचार करतेत तिथं पीढ़ी चं त्यांना काय देन घेण !पण आयुष्य बर्बाद करून मताचा घोळ आणखी कळून घेवु शकले नाहित तर भोगा आपल्या कर्मची फळ ! सुविधाच्या नावान असुविधा निर्माण करून समाजाला उध्वस्त करणारी लोक संधी साधु टपुन आहेत !
       लोक प्रतिनिधी म्हणून छक्के पंजे करण्या पेक्षा हे काय करतात . गाव आणि स्वःताची मानस ज्यालोकाना फक्त नावं वापरण्यासाठी लागतात त्या ठीकाणी राक्षसी वर्त्ती बळावलेली असतें ! कधी कधी नाक कापल तरी भोक शिल्लक आहे अस म्हणणारे काहि कमी नाहित ,आन ,भाका घेवून आणि पदरात घ्या म्हणणारे आणि  ,लोकमातेच्या पदराला भोक पाडून मातेचा पदर फाडनारे आज ही औसा पुणवेला उगवत असतात.अरे हलकटा नो कुठंल्या तोंडाने मत मागता !लाज वाटू द्या .स्वतःच्या स्वार्थ ची झोली भरण्यासाठी बंगल्यावर बंगले बंधून ,भूत पैदा करण्यासाठी आणि पोसण्य साठी  हे जर करत असाल तर याद राखा , तर छी थूक आहे तुमच्या जिन्याची ,दाडा आणि झेंडा कोणता यापेक्षा कोणत्या लोकांच्या समस्या सोडवूं शकतो याच चित्र माँडा म्हणावं ,काय लागत ओ सामान्य लोकांना ,कोणत्या?गरजा आहेत त्यांच्या जरा समजून घ्या !नुसते जाहिर नामे आणि प्रचार सभा घेवून लाखो रुपयाच्या उधळण करून मिळवलेला विजय आणि त्यानंतर निर्माण झालले प्रश्न हे वर्षानूः वर्ष तसेच आहेत !उन्माद आणि माजोरी पणा आता सोडून द्या ,तुम्हि मेंबर नंतर आहत आधी गावात माणूस आहत याच भान विसरून कस चालेल!बर् लोकशाही मध्ये पद आणि अधिकार काय कुणाच्या बापाची जहागिरी थोडीच आहे ! जे जमत नाही तें पुन्हा करण्याचा प्रयत्न का करता ! आत्ता तू नाही तर तुझा बाप दुसरा अस म्हणून धडा शिकवणे गरजेचं आहे!

शेवटी माझ पोरगं कुटं शिकल ,पहिजे पोरगीने काय केल पाहिजे घर कस असल पहिजे !दार कुटं  हे जस ठरवता ना .मग! विवेक जागा असेल तर माझा समाज कसा आहे ,कदाचित तो मझ्या आयुष्याशी तितकासा महत्वाचे नसेलही पण परिणाम करणारा तर नक्की आहे ! या कडे मी डोळस पणे लक्ष दिल पहिजे !पाच वर्षा साठी आपल प्रतिनिधीत्व आपन मत देवून बहाल करणार आहोत !फक्त नंतर लाज वाटू देवू नका आत्ता वेळ आहे , पुन्हा ------:----- म्हणण्याची वेळ येवू नये !

 इतिहास बदलायला मशाल गरजेची असते आज बेरोजगार आणि बेकार  युवक एकत्र  होवून  संघर्ष  करत आहेत.इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत ला प्रश्न  विचारत  आहेत  याला दुर्लक्ष करून चालणार नाही शेवटी. चिंनगारी  छोटी असली तरी  वणवा पेटवायला कारणीभूत  असेते !


सुरेश जाधव

Sunday, 14 January 2018

"ती"चा कुंकवा शिवायचा संघर्ष ---! व्यथा


"कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे" धड पेट ही  घेईना आणि विजुन ही जाईनां!

कुंकू तस सौंदर्य अलंकारांतील एक भाग मात्र कधी ते भाग्य- अभाग्य आणि सौभाग्य या समाजांच्याखुळ्या कल्पणा आणि  समजूतीचे वर स्वर होवुन ते जीवन मरणाचे प्रतीक तर नाही ना? याचा विचार कारवांच लागेल --स्वतंत्र पूर्व काळात सती प्रथा बंद करण्या साठी चा संघर्ष आज विधवा प्रथा बंद करण्या साठी आवश्यक आहे --त्या वेळी एकदाच्या मरणाने दुःख संपत होते--मात्र आज कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे  समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे 
धड पेट ही  घेईना आणि वीजुन ही जाईनां अशीच काही स्थिती असते --यात दोष काय असतो "त्यांच्या" मरनाने मरून गेलेला जोडीदार मात्र "हिच्या" आयुष्यत समाजाच्या विखारी आणि विषारी बिजाची पेरणी करून जातो 

हळदी कुंकवाचा सण म्हणजेच मकरसंक्रांती  प्रेमाचे स्नेह मिलन आणि दुःख वेदनेवर  फुंकर घालून आनंद गीत गात महिलांनी धरलेला फेर हाच या सणाचा मुख्य उद्देश -- मात्र या उत्सवात तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश ही दिला जातो पण खरंच आपण अस वागतो का ? आपल्याच घरांतील जिचा पती वारला "ती" -- मुलगी.आई .बहिण चुलती मामी आत्या मावशी  या  महिलांना आजच्या दिवशी सन्मान देतो का ?  संक्रांतीची साडी घेतो का ? हळदी कुंकू जावूद्या पण तीळ गुळासाठी सन्मानाने बोलावणार आहोत का ! तर  या शुभेच्छाला  महत्व आहे - नाही तर संस्क्रुतीच्या  नांवाने गळे काढून कित्येकांच्या भावविश्वाचे बळी घेणार आहोत! पती पत्नी च्या पवित्र नात्यांत दुर्दैवाने अकाली जोडीदार गमावलेल्या ती च्या बाबतीत थोड़ा विचार केला तर बर  होईल.कारण "ती" सुद्धा समाजातील माणूस म्हणून जीवनाचा संघर्ष करणारी आहे --एका कार्यक्रमात गेलो आणि जे पाहिले त्याने चीड आली कुटल्या आधुनिक युगात जगतो की अश्मयुगात या प्रश्नाच उत्तर मिळालं नाही!

वाजंत्री वाजवत होती .तरुणाई नाचत होती--निमित्त होत लग्नाच्या हळदी समारंभाच  सर्वजण आनंदात होते.नवरा मुलगा पाटावर येवूं बसतो --हळदी च ताट पुढं येत तसी नवऱ्या मुलांची बहीण ते ताट हातात घेवून हळद लावण्यासाठी समोर येते हळद सुरू असते.पण त्याचं वेळी मुलींची मोठी बहीण हळद लावण्या साठी ताट हातात घेते तेव्हा "ति"च्या हातुन ताट हिसकावून घेण्यासाठी स्पर्धा लागल्यागत धडपड सुरू होते .हळद लावतांना हातातील ताट विस्कवून घेण्यात आल् याच कारण तिचा पती काही दिवसा पूर्वी मयत झालेला होता.बहिणीच्या अंगाला हळद पण लावता येत नसल्याने स्वताच्या नशीबाला दोष देत डोळ्यातलं पाणी आवरन्यासाठी कोपऱ्यात जाऊं अश्रू ला वाट वेगळी करून देणारी दुर्दैवी बहीण  पहिली आणि धस्स झाला --- डोकं सुन्न झाल 


बऱ्याच शुभप्रसंगी (चांगल्या कामी)जस की लग्न मुंज आदी करून आनंदच्या प्रसंगी आपण (जिचा पती वारला) "ती" या बाबतीत काय विचार करतो --जरा लक्षात आणा!  भावाचं लग्न होत असतांना हळद लावण्याचा मांन कलवरी म्हंणुन बहिणी चा आहे .मात्र कुंकू नसेल तर कित्येक बहिणीला रोखलं जात --काय वाटत असेल यांनी यात तिचा काय दोष --या पुढे ओवाळणी करणं ओटी भरणं आदी.महिलांच्या कार्यक्रमात या माऊली कडे तोऱ्यात मिरवणाऱ्या कुंकू वाली कडून वारंवार हिणवले जात एव्हडंच काय तर --कां काय होत जर का तीन भावाला हळद लावली ओन्टि भरली तर काय होणार आहे पण नाही आणखी बुरसटलेले विचार डोक्यातून गेलेच नाहीत. दुर्दैव आपण फक्त कुडा च्या घरातुन सिमेंट च्या बंगल्यात आलोत "भिंताड" सुधारली पण "छाताड"नाही याच वाईट वाटत 

-दुःखी माणसाला आधार द्या त्याचे अश्रू पुसा हे सर्व ग्रंथ शास्त्र सांगत आणि आपण काय करतो त्यांच्या जखमेवर मीठ सिंपडतो. ईथेच थांबतो का तर नाही उलट तिच्या कमजोर पोकळी ची जाणीव सतत व्हावी या साठी वारंवार टाळलं जात.बोलूं तर कधी क्रतीने हेटाळल जात हे विचित्रच आहे एकीकडे समतेचे झेंडे मिरवून स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरिकडे सुशिक्षीत लोकांनीच "सुवासिनी"सौभाग्यवती"या मोठं विषेशनांच्या नांवाने पुन्हा दुसरी दरी निर्माण करायची .यात पुरुषा पेक्षा महिला जास्त जबाबदार आहेत.कुटल खुळ डोक्यांत घेतील समजत नाही.मात्रा "ती" अव्हेर न्याची कोणतीच संधी सोडत नाहीत.

प्रवास असो की सामाजिक प्रसंग यात कुंकू नसलं की टपून बसलेला डोम कावळे  आणि त्यांच्या विषारी भेदक नजरा चुकवण्यासाठी करावी लागणारी धडपड ही  "ती" ला रोजचीच असते येव्हडेच काय तर त्रास देणारे आणि चोच मारणारे कावळे यांच्या पासून संरक्षण व्हावं म्हणून  छोटी टिकली लावते अस एका माऊली ने सांगितलं --

जन्म आणि  मर्त्यू कोणाला  चुकलाय का ? मग  जिवंत माणसाकडे आपण एव्हड्या हिंन भावनेने का पाहतो ! की त्यांच्या माणूस पणावरच आपलां संशय आहे --सुखाने जगण्यासाठी माणसाने समाज निर्माण केला यात समाजातील कुटुंब संस्था ही प्रमुख समजली जाते  --पुरुष आणि स्त्री ही  संसार रुपी रथाची दोन चाके असतात --मात्र कधी कधी या  सुंदर रथाला नियतीची द्रष्ट लागते आणि  एक चाक निखळून पडते --मात्र जबाबदारी चा रथ एका चाकांवर सुरू असतो यात पुरुष असेल तर "नवं"चाक म्हंजेच दुसरं लग्न करायला लगेच तयार होतो मात्र स्त्री ला याची संमती दिली जाते का ? तर याचं उत्तरं नाही असंच येतं काही ठिकाणी मिळतंही  असेल परवानगी पण क्वचित -बरं मग या संसाररथाच्या जबाबदाऱ्या पेलताना काय वाढून ठेवलं जात याची कल्पना केली तरी अंगावर काटे उभे राहतात -- लग्नात शुभेच्छा आणि भेट वस्तू घेवून आलेले नातेवाईक अशा दुःखद प्रसंगी श्राध्द झालं की मोकळे होतात आणि सुरू होतो तो  नसंपणाऱ्या आयुष्याच्या प्रवासाचा टप्पा ज्यात "ती" एकलीच असते 


 हाडा मांसाची आणि रक्तानात्याची माणसे ज्यांच्या  आशीर्वाद आणि शुभेच्छाने  "ती" चा सुरू झालेला सुवासिनीचा सुमधुर प्रवास मात्र पती च्या अकाली जाण्याने खडतर होवुं जातो --पती निधनाने "ती"च  आयुष्यंच हिसकावून घेण्याचा समाज प्रयत्न करतो अस करणारे  काही दूर चे नसतात मात्र खुळचट रुढी आणि परम्परा यांचे पालन करण्यांत आसुरी आनंद मिळतो का यांना--दुःख सागरात बुडालेल्या त्या असाह्य माऊली ला आधार देण्यायाऐवजी कुंकू पुसण्याची  आणि मंगळसूत्र तोडण्याची घाई का असते --तसही चालतं बोलत आधार देणार माणूस निघून गेल्यावर निर्जीव रंगात आणि धातू मधें काय असतं --त्यांची आसक्ती थोडी असते? जीव लावलेलं माणूस निघून गेल्यावर कशात जीव अडेकेलं का पण किती --निष्ठूरपणे सर्वा समक्ष कुंकू पुसणारी आणि मंगळसूत्र तोडून दुःख सागरात डकलुन देणार्यानी  तिच्या वेदांनाचा विचार केला कां? जखमेवर मीठ चोळनारी  ही  कुटंली घाणेरडी मानसिकता थांबलं पाहीजे कुटं तरी हे कुंकवाशिवाय चा संघर्ष काय असतो तो नाही कळणार --?

ऐन तारुण्यात वादळी आयुष्याची सुरुवात करून स्वप्नांच्या पाऊलवाटा शोधणाऱ्याला मनाला असा अचानक धक्का बसतो आणि आयुष्याची सुंदर रांगोळी विस्कटू जीवनाची घडी बिघडून जाते -- यात समाजाने कूट तरी "ती"ला सावरलं पाहिजे.आधार देवून सन्मानाने वागवलं पाहिजे .जगण्यासाठी चा संघर्ष तर  प्रतेक जण करतो मात्र अशा प्रसंगी धीर आणि आधार महत्वाचा असतो.

एकीकडे शहिदांच्या बाबतीत विचार करतो पण  वीर पत्नीला सन्मानाने जगू देतो का ? यांच आत्म परीक्षण व्हाव -- या संक्रांति दिवशी विधवाना सन्मानाने वागणूक देवून त्यांच्या बाबतीत विचार करायला लागलो तर खरी संक्रांत गोड होईल-- 


काल काकड हिरा  गावात अशीच वेगळी संक्रांत पहिली आनंद वाटला -- मनीषा जायभाये आणि प्रतिभा हावळे या दोन शिक्षिका विधवा प्रथेविरोधात चळवळ उभी करत आहेत.काल रात्री ही संक्रांत  85 विधवा महिलाना तिळगूळ आणि साडी वाटप करून संपन्न झाली---अशादायक चित्र समोर उभा राहील चळवळ व्हावी.


सुरेश जाधव 
9404204008

Tuesday, 2 January 2018

फक्त दगड त्यांचे होते! फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती


फक्त दगड त्यांचे होते!  फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती

सड्कि डोकी जरा शांत ठेवा! किती दिवस इतिहासावर दगड मारणार!

विचाराचा इतिहास शिकवणाऱ्या महापुरुषानी जाती वादांची बंधने  झुगारून  निकोप  समाज निर्मिती  साठी  दिलेलं  बलिदान आज आम्ही  विसरलो अहोत  काय?

बुरसटलेल्या मेंदू वाल्याच्या सडक्या डोक्यांन  पुण्याच्या शांतंतेत  मीठ टाकलं विध्वंसक मानसिक तेणें  पुन्हा  बहुजनांच्या पोरांना तोफेचा गोळा  करुन ठिणगी पेटवली खऱ्या इतिहासावर दगड मारून तो  काय पुसला जाणार  होता का मात्रं किळस वाना त्यांचा प्रयत्न होता यानं आमचं खुप मोठं नुकसान  झालं ओ जाती च्या मोर्चा ने निर्माण  झालेली  दरी  आणि दुरावले मन विसरून  माणूस कसा बसा एक येत होता त्या ऐकतेला खिंडार पाडन्याचे शड्डयंत्र रचल गेलं  आणि  त्यात आमची  पोरं भरडली  गेली हातात  दगड दिली बसले तमाशा पाहात! फक्तं दगड  त्यांचे  होते!  फेकणारे हात  आणि  फुटणारी  डोकी आमच्याच बांधावाची होती! कायदा  हातांत घेतो तेव्हा कायद्यांच्या  कचाट्यात अडकनारे पण आमच्याचं समाजातील  कोणाचे नातेवाईक नक्कीच  असणार  त्यांचं  भविष्य काय ? कुटुंबाचं काय? का  फक्तं --बदला आणि सूड ज्याला बुड टेकवायची  अक्कल नाही त्यांला सूडाच्या मागचं गूढ राजकारण काय कळणार! इंग्रज  गेले पण  200 वर्षा नंतर भेद  नीती तशीच आहे तोडाफोंडा आणि राज्य करा. काय?  डोकी गहाण ठेवल्यागत वर्तन  सुरू आहे.इशाऱ्यावर नाचणारी आणि शिकवलेलं बोलणारी पीड़ित पिढी निर्माण होते हेच दुर्दैव. यातच  जातीवाद आणि समाज कारणाचे  अर्ध हळकुंड उगाळून पीलेली काही भगवी  झालित तर  काही निळी पिवळी पडली आहेत.हीच ब्याद तर मुळांवर आलीय.वैचारिक लढा उभारुन प्रश्न सोडवन्यपेक्षा खऱ्या खोट्या भूतकाळावर आज युद्ध सुरू आहे. हे  अतिशय चूक आहे. या  विघ्नसंतोशी व्रतीच्या मुसक्या आज  ना उद्या आवळ्या जाणारच आहेत.

 
गुण्या गोविंदा ने हातात हात घालुन ताटाला ताट नाही  तर ताठ माने ने ताटात जेवण करणारी आमच्या पिढी ची घडी बिघडवू पाहणाऱ्यां शन्ड लोकांची तोंड पाहायची इच्छा नाहीए!  शिकणाऱ्या लोकांची डोकी जास्त भडकतात का? चूक  बरोबर  खरं  खोटं  याची  चिकित्सा  सोडा  पण  शहानिशा पण  करायचं  सोडून  बेताल सोशल मीडिया वर  स्वार व्हायला तयार  होतातच कसे ? वाईट वाटत ज्यांच्यात आपण  वावरतोय  त्यांच्यावर  दगड  कसाचं  उचलला  जातो  घटनां भीमा कोरेगाव ची निंदनीय आहे निषेध आणि  फक्तं निषेध हेच प्रत्येकाचे उत्तर आहे  पण आज  महाराष्ट्रातील गावा गावांत विश्वासा च्या भिंतीचे अंतर आता भीती वर पोचले विश्वासाला तडा जायची वेळ नाही तर परिस्थीती निर्माण झाली!शहरात भागत ओ  कर्फ्यू लावून. आठवड्याचं नियोजन असतं आणि  पर्याय  ही असत्यात. गावांत काय करणार पोट भरण्यासाठी आज ही रोजंदारीवर जावं लागत तेव्हा चूल पेटती त्यात तुमच्या असल्या दगड  फेकीने आमची संस्कृती उध्वस्त होती. या च्या  परिणामांचा कधी  विचार  होणार  आहे  का ? पुन्हा मुहल्ले नगर आणि वाड्यात विभाजन करायचं ! रोज  एक मेका ची तोंड पाहणं चुकणार आहे का ! नाही  ना  मग  गरम  डोकं  जरा  शांत  ठेवा ! बाबासाहेबाची लोकशाही आणि संविधान  तुमच्या सोबत  आहे  ना ! जगाला  शांतता काय असते  हे  शिकवणारे  आमचे आदर्श युगपुरुष बुध्द आमच्य बुद्धीत आहेत का ? फक्तं  फोटो पुरतेचं यांचाही विचार होणं गरजेचं आहे!

कालची घोषणा ऐकली आणि वाईट  वाटलं नमो तस् भगवतो अर्हतो-- या  प्रार्थनेचा वेगळाचं  वापर केला यातचं बुद्ध नको  युद्ध हवं हा  सूर तरुणाई आळवत  होती! ही  धोक्याची  पूर्व घंटा आहे कां याचा  विचार  हिं  व्हायलाच हवा.समाज जीवनाचे खरे तत्व माणुसकी आम्ही  विसरत अहोत.जातीवाद पुन्हा प्यारा वाटू लागलाय इथे माफ करा बाबा मात्र आम्ही  चुकतोय हे कळत असूनही वळत नाही! उचलेला  दगड जशी जात विचारत नाही तो  त्याच  काम करतो तसं फूटनारी काच कितेक तुकड्यांत विभागतें तिच्या नुकसानीचं मोल लावता येत! कदाचीत त्याची  किंमत  कमी जास्त  असेल ही  मात्र  समाज मनाच्या -हदयाला पडलेली  चिर तीच काय? यांचा  विचार करा.हात जोडून विनंती.

मूठभर लोक सुशिक्षित झालेत त्यांचं सोडा खंडीभर  तसेच आहेत.भाकरी चा प्रश्न  तसाच आहे.आकाशाचं पांघरूण करुन  कुडकुडत पडलेली कुटुंब यांचे प्रश्न? कुपोषण?  झोपडपट्टीची व्यथा? शेतकरी आत्महत्या! दहशदवाद? नक्षलवाद? याचा  कधी  विचार  केला  का? दोस्ता हो!


आमची बुध्द शिव शाहू फुले आंबेडकराची लेकर जाती वादांची भाषा बोलायला लागले आपलं तूपलं  याही पेक्षा मप्लंची ची संकुचित शिकवन नडत आहे.असेच किती दिवस विष प्रयोग करणार यानं कुणाचं  बरं झालं आणि  पदरात काय पडलं  याचं ही उत्तर  शोधा. गरीबांची लेकरं दमडी कमवायचे सोडून आयुष्यं गमवायची भाषा करतात अन् पिसाळलेल्या गत बुद्धी भ्रष्ट होवुन कुणाच्याही मागे धावतात हातात पदरात  काहीचं  मिळतही  नाही  आणि  काय  करतो ते  कळत देखील  नाही अशा वेळी  कोण  जिंकतो ? कोण हरतो? या  पेक्षा समाजा ची पार वाट लागते पिढी बर्बाद होते. या क्षणांची  वाट पाहातोय का ? डोकं ठिकान्यवर ठेवा! न्याय व्यवस्था ; कायदा आणि  राज्यघटना या वर विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या  संकल्पानेतूंन  साकारलेल्या खऱ्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.

नसता बिघडल्यागत  असेच किती दिवस इतिहासावर दगड मारणार ! सड्कि डोकी जरा शांत ठेवा!



सुरेश जाधव
9404204008