संवेदनशील एसपी_नवनीत_कावत.. खाकीची आब राखली
विलास घुले हत्या प्रकरणात बीडचे पोलीस
अधीक्षक नवनीत कावत यांनी अत्यंत संवेदनशील पणे हे प्रकरण हाताळले. विशेष म्हणजे नातेवाईक आणि समाज मृतदेह घेऊन पोलीस स्टेशनमध्ये तब्बल सात तास ठिय्या करून बसलेला होता. मागण्यावरती ठाम होता. तीन दिवसापासून मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत होता.यातच गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील आणि राज्यातील समाजाचे नेते, प्रतिनिधी,पोलीस स्टेशनच्या दारात बसलेले होते. कुटुंबाचा आक्रोश काळीज पिळून टाकणार होता. अशा परिस्थितीत आक्रमक झालेल्या जमा कुठलाही टोकाला जाऊ शकत होता. त्यातच रस्ता बंद ॲम्बुलन्स वर दगडफेक अशा किरकोळ घटना घडत होत्या. हे लक्षात घेऊन ही सामंजसपणे पाऊल उचलणं आवश्यक आहे.ती सगळी जबाबदारी पूर्वक पाऊले पोलीस प्रशासनाने उचलली. विशेष म्हणजे तीन दिवसापासून जमावाची मानसिकता, रास्ता रोको आंदोलन, वाहतूक कोंडी, कडकडीत बंद या सगळ्या परिस्थितीला हाताळण्यात #आयपीएस_एम_व्यंकटराम यांची भूमिका ही तेवढीच महत्त्वाचे ठरली..
कडकडीत बंद, मुख्य चौकात रास्ता रोको सुरू असताना राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे आंदोलकांशी फोनवरून संवाद. यावेळी आंदोलकांची आक्रमकता. तीन दिवसापासून प्रेतावर अंत्यविधी न झाल्याने होणारा संताप. धनंजय मुंडे यांनी अधिवेशनात पोट तिडकीने सांगितले घटनेचा गांभीर्य यात पोलिसा संदर्भात उपस्थित केलेले प्रश्न. अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेताना पोलीस अधीक्षक यांनी दाखवलेली समय सूचकता अत्यंत महत्त्वाची आहे. नऊ आरोपी पैकी आठ आरोपींना दोन दिवसात अटक करण्यात आली. कुटुंबासोबत वारंवार संवाद साधून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला.
शेवटी पोलीस स्टेशन समोर प्रेत घेऊन बसलेला जमाव, आक्रमक समाजाचे नेते, ग्रामीण भागातील अशिक्षित नातेवाईक,राजकीय नेत्यांचा दबाव,अधिवेशनामध्ये यासंदर्भात झालेली चर्चा, मुख्यमंत्र्यांपासून या प्रकरणावर लक्ष,सामाजिक पातळीवर होणाऱ्या चर्चा, वस्तुनिष्ठ पुरावे, एकीकडे आणि दुसरीकडे कायद्याची चौकट या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक नवनीत कावत सरांनी मध्यस्थीची भूमिका बजावली ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे.
सर्व आंदोलकांना सांगत असताना ज्या गोष्टी प्रकर्षाने सांगितल्या त्यात "प्रत्येक गोष्टीचा तपास करून कोणाचीही चूक असेल पुरावा असेल त्याच्यावर कठोर कारवाई करू. प्रत्येक गोष्टी पुराव्याच्या आणि फॅक्टच्या आधारावर कारवाई होईल *
विशेष म्हणजे एखाद्या गोष्टीचा चुकीचा पायंडा पडू नये याच्यासाठी घेतलेली कठोर भूमिका ही देखील महत्त्वाची ठरली. जमाव आणि नातेवाईक यांचा संताप सहाजिक आहे. मात्र न्यायालयाच्या चौकटीत गेल्यावर उत्तर मात्र तपासी अधिकाऱ्यांना द्यावा लागतो. त्या ठिकाणी खाकीवर्तीची आब राखली जावी. आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून पोलिसिंग होत आहे ही गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. अगोदरच सामाजिक परिस्थिती बीड जिल्ह्याचे संवेदनशील असताना. समाज माध्यमावर याची उलट सुलट प्रतिक्रिया येत असताना. दूरगामी परिणामांचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित होतं.
शेवटी विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपीवर कठोर शासन शिक्षा झाली पाहिजे. एक कुटुंब उघड्यावर आलं एका पत्नीने स्वतःचा पती गमावला वडिलांनी मुलगा गमावला आईचं काळीज हिरावल गेल या सगळ्या बाबीचा विचार करून आरोपीला कायद्याने दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झालंच पाहिजे. पण हे सगळं होत असताना निरपराध देखील भरडला जाऊ नये यासाठी पोलिसांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. आणि ती बीड पोलिसांनी बजावली याबद्दल अभिनंदन. मात्र अशा संवेदनशील प्रकरणाची दखल थोडी अगोदर आपण घेतली असती तर तीन दिवस अंत्यविधीसाठी वेळ लागला नसता ही देखील खंत आहे.
#लक्ष्मणसूत(सुरेश जाधव)
#BEED #पोलिसअधीक्षक #BeedPolice #विलासघुलेहत्या #बजरंग_सोनवणे #लक्ष्मणहाके #DM #धनंजयमुंडे #सुरेशधस

No comments:
Post a Comment