Monday 22 August 2016

गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :- कारखेल ची व्यथा !



गावच्या रस्त्याने मोडली दिडशे लग्न :-
कारखेल ची व्यथा ! लग्नाच्या वयातल्या पोरांच्या बापाला घोर

तुमच्या गावाला रस्ता नाही ,नको बाबा पोरगी द्यायाची! सात किलो मीटर डोंगर तुडवित यायचे कि काय?असा सवाल मुलींचे बाप करत आहेत .म्हणूनच कि काय कारखेलगावातील  जवळ पास  दीडशे वयात आलेल्या पोरांची शुभ मंगल राहिलीत. गावाला रस्ता नाही म्हणून या  गांवात कोणी मुलगी द्यायला तयार नाही मूलभूत सुविधा पासून कोसो दूर असलेल्या कारखेल गाव ची व्यथा खरंचभयानक  आहे.बातमी बनवण्यासाठी मी कारखेल ला जायला निघालो तर तो अविस्मरणीय रटाळ वाना प्रवास मलाही करावा लागला म्हणुनच  त्यां गावकरर्याचे आणि पोरी न देणार्या बापाचा निर्णय मलाही पटायला लागला स्वातंत्रच्या 70 रीचा  सोहळा साजरा करतांना यांच्या दुखची जाणीव सरकार ला असावी आजही खेड्यात जाताना मैलौ मैल पाई चालत जाव लगत,तेही डोंगरांतून , याचे परिणाम ही वेगळे होत आहेत तर कित्तेकाला प्राण गमवावा लगत आहे

  महाराष्ट्रच्या  ग्रामविकास मंञी महोदयांच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कारखेल गाव, नगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवरील ,व विकासा चा वनवास सहन करणारे लोक  गावची लोक संख्या 2200 गावात इंडो जर्मन या योजने मुळे गावातील पाणी प्रश्ण कायमचा मिटला आणि  बागायती शेती झाली  पण बागायत दाराचीमूल आज लग्नाची बाकी आहेत,गावचा रस्ता पहिला आणि 7 किमी चालत गेल कि पाहूण्यचा इरादाच बदलतो सुविधाच नाहीत तर पोरगी द्यायची कशाल
     गांवात पांरावर बसलेलीं  तरूण मुले गावाला रस्ता नाही म्हणुन संकटात सापडलीं आहेत,चक्क या गांवात 150 तरुण पोराचे सोयरीक जुळवताना रस्ता आडवा येतोय हुन्ड्या साठी कित्तेक लग्न मोड्लेलि एकलीं असतील पण या गांवात रस्ता नाही म्हणून कोणी पोरगी द्यायाला तयार नाही
या गावातील तरुणाशी संवाद साधला पोर संगत होती राव शेती पण भरपूर आहे ,कस बस शिक्षण पण घेतलाय पण वय निघून चालले चार पाच सोयरीक पण आलीं होती,पोरगी पसंत होती पण गावाकडे पहायला आल्यावर सगळ फिसकटल आणि नाहम्हणून सांगितले अस 1नाही दोन नाही तर तब्बल 7ते 8जणांनी सांगितले,म्हणून विश्वास बसला

गांवात याला रस्त्यांची सोय नसल्याने पोरगी च देत नाहीत असे गावातील वयोवृद्ध गावकर्यानी सांगितले ,पोराचा बाप अंधारात मुलीच्या बापाला पैसे देतो तवा कूट एखाद मुलगी द्यायाला तयार होतो अस झुँबरबाई काळे या आज्जी ने सांगितलं तर बाळंतपणातर खुप त्रास सहन कराव लागतो जवळ पास 10 की मी मध्ये कुठेच दवाखाना नाही खुप हाल होतात पोर सोर गाडीवर सायकल वर जातात पण म्हातारी माणसाचे मरण असते अस गुलफाबाई पवार या आज्जी ने सांगितले .तर रस्ता नसल्याने शालेय विद्याथ्याचे हाल होत आहेत विद्याथ्याॅना  शाळेत जाण्यासाठी गुढघाभर पाण्यांतुन जावे लागते तर पावसाळ्यात जास्त पाणी आल्यानंतर आम्हाला  शाळेला दांडीच मारावी लागते.

याच गावच्या रस्ता बाबतीत सरपंच व गावकर्या नी सर्व नेते व प्रशासन याचे दरवाजे ठोठावले पण काहीच उपयोग झाला नाही , आम्ही आमदार महोदयांना विचार तर जिल्हा परिषद ने आत्ता पर्यंन्त दुर्लक्ष  केल आणि अगोदर च्या आमदार वर खापर फोडले आणि जबाबदारी झट्कत उत्तर ही या आमदारांनी दिल गावचा रस्ता खरब आहे खुप त्रास होतोय पण आम्ही रस्ता लवकरच काम हाती घेवुन अस आश्वासन  देवून आमदारांनी सुटका करून घेतली खरी पण रस्ता होईल तेव्हा खरं
          ग्रामविकास  मंञी व  पालकमंत्री  ना.पंकजाताई मुंडे या गावच्या रस्त्या बाबतीत लक्ष देतील कां  योजनांचा गाँजावजा व बडेजाव  मिरवण्या पेक्षा  जिल्ह्यातील 350 वस्ती तंडया पर्यंत रस्ता पोहचला नाही याकडे लक्ष दिले तर या पोरांच्या डोक्यावर अक्षदा पडतील


सुरेश जाधव -9404204008
email-sureahaj99@gmail.com

Monday 15 August 2016

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल

मजुरी शिवाय पेटंत नाही शहीद जवानाच्या पत्नीची चुल--!

घर नाही की स्मारक देखील नाही

सुरेश जाधव

ये मेरे वतन के .लोगो जरा आँखों मे भरीलो पाणी जो शहिद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी 
देशाच्या सीमेवर आपल्या प्राणाची आहुति देणार्या विश्वम्बर जाधव यांच्या पत्नी च दुःख वाटून घेण्या पेक्षा त्रास देणारे व लुबड्नरेच मिळाले अशीक्षित असल्याचा फायदा घेत एकही लाभ मिळू न देणारे नातेवईक आणि सरकार ने पण दुर्लक्ष केले आहे साधे घर देखील नाही बाकी सेवा तर दूरच.सासरच्यानी तर हाकलून दिले माहेर आधार झाल मूल बाळ नसल्याने अख्ख आयुष्य कस जगावं हा प्रश् होतच पण् भाऊ अनिल ने सहकार्य केल यामुळेच अधार मिळाला

बीड जिल्हयातिल नेकनूर येथील शहिद विश्वभर जाधव इंडो पाक वार मध्ये 1971साली कामी आले.तेव्हा पासून संपूर्ण आयुष्य एकटी ने जगत आलेल्या यमुनाबाई जाधव या  शहिदाच्या  पत्नी च्या संघर्षशाचा प्रवास खुपच करूण आहे ,लग्न होवून फ़क्त 2 महीनेच झाले होते तोच पतीच्या शहिद होण्याची बातमी कानावर पडली आणि संसाराची स्वप्न मातीत मिसळून गेली.वयाच्या येन तारुण्यात खडतर  जीवनाला सुरुवात झाली ती 55 व्या वर्षी अध्याप सुरूच आहे.आई वडीला कडे राहणार्या यमुनाबाई ची चुल रोजनदारी वर पेट्ते


हातात फ़क्त कागद पत्रे घेवुन  बसलेल्या यमुनाबाई अशिक्षित आहेत यामुळे काहीच माहिती नाही की प्रशासन हि पोहचले नाही
1971च्या बेसिक च्या आधारावर मिळणारी पेन्शन नेहमी आजारी असल्याने पुरत नाही  म्हणून आज वयाच्या 55 व्या वर्षी हि शेतात रोजंदारि चे काम करून च जगावं लगतआहे
150 रुपये रोज मिळतो आणि काम करून खाते
पण आजही पतीची आठवण आल्यावर फोटो मांडीवर घेवुन बसलेल्या यमुना बाई भूतकाळातील दुःख आठवून एकट्या च रडतात त्यांचे अश्रू पुसनारी 85 वर्षाची वयोवृद्ध आई गेल्या कित्येक दिवसात मुलीची समजूत कांडत आहे,फ़क्त हळदीचा डाग लागला आणि हा वनवास वाटायला आल्ला म्हणताना आई च्या खोल डोळ्यातून अश्रू  आवरता आवरले नाहीत
सगळ्या शासकीय कार्यालयात जावून पाट पुरावाकेल पण् काहीच मदत नाही कलेक्टर  घर देतो म्हणले पण् तेही नाही ,जमीन नाही ,आणि बेसिक कमी म्हणुन पेन्शन पण् कमी आहे स्मारक साठी प्रयत्न केले पण् ग्रामपंचायत जागा देत नाही शेवटी वैतागून सर्व सोडून दिले माझ्या बहिणीला न्याय मिळवा
जय जवान जय किसान हि घोषणा फक्त कागदावरच आहे की काय हा प्रश्ण पडतो साधे स्मारक आणि घर हि देवू न शकल्यामुळे आजही काम होत नसताना मजुरी करून जगण्याचा संघर्ष आजहि सुरूच आहे अशिक्षित  असलेल्या यमुनाबाईनी सुरुवातीला बोलायला नकार दिला आत्ता जाऊदे उभ आयु श्य काडलय सगळ्यानी त्रास दिलाय आत्ता काय होणार आहे पण या माउली चे कहानी खुप काही सांगणारी आहे आजही रक्त सांडलेल्या कुटुंबात सरकार खरी मदत नही पोहचू शकल हे अपयश आहे.या शहीद वीराचे स्मारक व्हावे अशी तिची मनोमन इच्छा आहे ती तरी सरकारने पूर्ण करेल कि नाही आणि समाज फ़क्त बघायची भूमिका घेणार काय?हे प्रश्न तेच राहतात 

Friday 8 April 2016



मरन मरु देईना अन् समाज जगु देईना!


आत्महत्येच्या दारातील ठोंबरे कुटुंब--------
खरचं एड् स बाधिताना समाज स्विकारतोयं?
अशिच अवस्था.वाट्याला आलेल दुख:भोगनार नरसिंह ठोंबरे च कुटुंब दुर्दैवान एड्स च्या विळख्यात सापडलं. मरनयातना भोगनार्या या कुटुंबातील सर्वच या दुर्धर आजाराने बाधित आहेत.काम होत नाहीं करता येत नाहीं  जरी करायचा प्रयत्न केला तर गावात कोनिन देत नाहीं.मग खायच काय? हा प्रश्न या कुटुंबासमोर आहे.
केज तालुक्यात  उंदरी गावातील एच आय व्ही बाधित ठोंबरे कुटुंबाला गावनेच बहिष्कृत केलय. चार वर्षापुर्वी गावातील नातेवाईक अन समाज कंटकानी हाकलुन देत.गावाबाहेर वाळीत टाकलय. गावापासुन २ किमी अंतरावर रस्त्याच्या कडेला आपले बस्तान मा़डले.त्याना गावातील कोन्ही बोलत देखील नाहीं, दुख:तांना आधार तर सोडाच पणपण त्रास द्यायला कमि करत नाहींत.खरंच एच आय व्हि बाबत समाजात जनजागृती झालिय?
समाज व्यवस्थेचा भाग म्हणुन या लोकांना धिर आधार  दिला तर आयुष्य उरलेल आयुष्य सुखाने जगतिल पण हा समाज स्विकारायला तयार नाहींउलट पुंकर घालायची सोडुन जखमेवर मिठ चोळायचे काम करत आहेत.गावातील लोक किराना माल व रेशण सोडाच साध पाणी सुध्दा देत नाहीं.भाजी मिळाली नाहीं म्हनुण उंबराच्या दोडीची भाजी केली सांगताना नरसिंह च्या डोळ डबडबले
खरच दुख:काय असत याच भयान वास्तवमला त्याच्या डोळ्यात जानवलं
या व्यवस्थेशि लडताना नरसिंह ने थेट मुख्यमंत्री महोदया पर्यन्त पत्रव्यवहार केला पोलिसात कंप्लेट केली न्यायालयाात खेटे मारले  पण कोन्हिच मदत केली नाहीं याव्यवस्थेवरचा विश्वास उडाल्याच त्यान सागितल त्यात अपंग असलेल्या नरसिंह च्या पत्निनेतर दुख: चा पाडाच वाचुन दाखवला
किराना आनायला गेल तर दुकानदार संपले आमच्याकडे नाहीं असे सांगतात.दळन दळुन देत नाहींत कि बोलत देखिल नाहीं.जगाव कस बर्याच वेळा माझ्या मालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल तुम्हि गेला तर आमच कस म्हणुन समजुत काडल्याची नरसिंहची पत्नी लतिका ठोंबरे हिने सागीतले खरच किती दुख:कोनत्या थरा पर्यन्त जातोय समाज त्याच वनव्यात होरपळनारा नरसिंह चा मुलगा शुभंम
शाळेत वर्गात बसु दिल नाहीं बर्याच वेळा शिक्षण घेताना अडचनि आल्या.जवळ च्यांनीच त्रास दिला.आत्ता तर तुमच्या मयताला पण ऐनार नाहींत तसेच कोल्हे कुत्र्याची धन व्हा असे भाविकतील नातेवाईक म्हनत आहेत .काय विश्वास वाटेल समाजा बदल हाडामासाची मानस मानुसकि विसरलीका?हा प्रश्न पडतो खरच खेड्यात ले संस्कार संपले काय असच वाटात दुख:जानुन घेवुन कमी करन जमेल का? कागदोपत्री सरकार फक्त एड्स बाबतीत जनजागृतीचा दावा करत आहे। पण समाजात आज असा कित्येक कुटुंबांना समाजाने बहिष्कृत केलय.वाट्याला आलेल दुख। भोगताना समाज  काटे टाकतोय हे खरच भयानक सत्य आहे .
अशा कुटुंबातील लोकांना फक्त उपचार  देवुन सरकारची जबाबदारी संपत नाहीं. रोजी रोटिच काय? ते सोडवन गरजेच आहे
भिक मागीतलीतरी कोन्ही देत नाहीं मरन यातना भोगनारे हे कुटुंब जर मदत मिळाली तरच यांची चुल पेटेल व जगेल, नसता आत्महत्येच्या दारातील ठोंबरे कुटुंब माळरानावरच संपुन जाईल
आणि ज्या समाजाला एड्स बाबतीत जनजागृतीचे दाखले दिले तेकिती फोल आहेत.याला जबाबदार कोन? शासन कि समाज. अन् यांच थोडक आयुष्य सुखान जगवण्यासाठी धिर आधार गरजेचा आहे
माळरानावर राहुन पोटाची भुक गिळताईल पण बोलायला कुन्ही नसेल तर मरन स्वीकार नं हाच पर्याय या कुटुंबा समोर समाजान निर्माण केलाययाच्याकडे सकारात्मक दृष्टिकोणातुन पाहने गरजेचे आहे कारण समाजातिल घटक आहे मानुस आहे पण ---कोन्ही हा प्रश्न सुटत नाहीं.
सुरेश जाधव
महाराष्ट्र १ जिल्हा प्रतिनिधि बीड-9404204008