Tuesday 20 March 2018

माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार! दिल्लीवारी एकअनुभव भाग 2

माफ कर  "विठ्ठला" आज फराळ तर करणार!  

आपुलीकीचा अविस्मरणीय पाहुणचार दिल्लीवारी एकअनुभव 


सारे भारतीय माझे बांधव आहेत-
--
सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर विठ्ठला आज फराळ तर करणार. --असेच काही किस्से अविस्मरणीय 

प्रवास करतांनाचे काही प्रसंग कदचित कधीच विसरता येत नसतात. मानस ओळखीची नसली तरी  आपुली आणि प्रेम मिळाले की कायम स्वरूपी -हदयात घर करून राहतात.असाच अचानक दिल्ली जाण्याचा प्रसंग आला.नियोजन कुटलेच  नव्हते फक्त आमच्या दोघांवर निर्भेळ प्रेम करणारे हरिदास (भाऊ) जोगदंड यांच्या अति आग्रहामुळे शेवटीटाळता  आले नाही.बीड वरून निघालो प्रवास करत औरंगाबाद वरून धुळे - इंदौर प्रवास सुरू झाला.सहज गप्पा  सुरू आसताना .इंदौर शहरातून बाय पास ने चाललो होतो. जोगदंड भाऊ नी सहज विषय काढत इथे आपल्या कडचे अंकुश भवर आहेत.त्यांना फोन केला तर लगेच घरी या तसे जावू देणार नाही.आग्रह मोडता येन शक्य नव्हत.बाय पास ने 10 किमी पुढे गेलेलो परत गाडी फिरवली.शहरात प्रवेश केला.

घर शोधत रस्त्याने फिरताना इंदौर शहराच्या स्वच्छतेच्या प्रेमात पडायला वेळ लागल नाही.प्रत्येक चौकात सुंदर झाडे आणि शिस्तीत चालणारी वाहतूक रस्त्याच्या दुतर्फा ग्रीन बेल्ट विशेष त्यात झाडे होती.अन तीही हिरवीगार.यामुळे सुंदर शहर असल्याचा खास अनुभव आला.20 ते पंचवीस किलोमीटर च्या विस्तीर्ण भूभागात पसरलेल शहरात आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे घाण नजरेस पडलीच नाही.शोधत शोधत घरी पोचलो.कोल्हे यांच्या घरी सुंदर जेवण टचुन खाल्ले. अन ढेकर देते वेळी नकळत मनातल्या मनात सुंदर जेवण बनवणाऱ्या ताई चे आभार मानले.सहज गप्पा निघाल्या इंदौर मध्ये आम्ही शिवजयंती मोठ्या थाटात करतो अख्ख इंदौर पाहतच राहत.अस म्हणताणा त्यांच शिवछत्रपतीवरील प्रेम पटकन डोळ्यात टिपले.आम्ही  प्रत्येक महिन्याला सप्ताह करतो.खुप महाराज मंडळी येतात.आम्हला वारकरी संप्रदाय इथे मोठ्या वैभवात टिकून ठेवायचा.दिवसभर काम करायच कीर्तनात तेवडं सर्व विसरून सहभागी होतो यात आमचा स्वार्थ काहीच नाही.हे वाक्य एखाद्या महाराजा पेक्षा महत्वाच वाटल. पण शेवटी नाळ कीर्तनात जोडलेली आहे. 20-30वर्षा पूर्वी गाव सोडलेली ही मानस या अपरिचित प्रदेशात लहान मोठे उद्दोग करत. स्वतःच अस्तित्व निर्माण करून आहे

त गाव सोडून चांगला जम बसला म्हणत आसताना अर्धा इंदौर मध्ये महाराष्ट्रातील मानस आहेत.एक मेकांना मदत करत आम्ही गुण्यागोविंदाने राहतो.आता इथल्या महानगर पालिकेत काही नगरसेवक आहेत.एक आमदार आहे अस अभिमानांने सांगत होती.त्या वेळी आम्हाला गड काबीज केल्या गत आपुलकी आणि दुसऱ्या क्षणी आनंद वाटला.

त्यांचा निरोप घेवून पुढं निघालो.उज्जैन मध्ये महा कालेश्वर दर्शन घेतले. तिथेच कालभैरव मंदिरात गेलो देवाला दारू पाजताना पुजारी पाहिले मंदिराच्या समोर देशी विदेशी सर्व प्रसादालय होती.श्रध्देने लोक घेऊन यायचे मूर्ती समोर बसलेल्या पुजार्याच्या हातात. ती शिलबंद बाटली द्यायची .मग येटित बाटली चे झाकण फोडून समोर ठेवलेय छोट्या प्लेट मध्ये अर्धी ओतून देवाच्या समोर धरली हळू हळू हात कानोडा करत अर्धी बाटली मूर्ती च्या तोंडात ओतली.अर्धी प्रसाद म्हणून दिली हे सगळं आम्ही दुरून पाहत होतो. मला हे मुळीच आवडल नाही.आमच्यातील एक जण सांगत होता.दारू कुठे जाते याचा पत्ता लागत नाही. मनात वाटत इथे किती ब्रँड एकत्र होत आहेत.आत मध्ये कॉकटेल होत असेल.कस पचवत असेल.परत हे पुजारी सर्वजण गेल्यावर आतली दारू कशी काडत असतील कदचित त्याच मंदिरात देवाचा प्रसाद  म्हणून कॉकटेलचा चेस तर होत नसेल. असा विचार करत मंदिरतून  बाहेर पडताना सहज वाक्य सुचले.यहाँ  प्रसाद के  तौर पे शराब मिलता है! टोपण टोपण सर्वजण घ्या म्हणत सर्वजण गाडीत बसलो.

मध्य प्रदेश मधील रस्त्याने थेट शिवपुरी मार्गे आग्रा  सर करायचे डोक्यात होते.जवळजवळ 600किमी चा प्रवास होता.रात्री थांबायचे कोठे विचार सुरू होता. लगेच जोगदंड भाऊ च्या डिक्शनरी मधील माजी सैनिकाचे नाव समोर आले.अशोक शीकदल याना फोन  केला. किती वेळ झाला तरी घरी या.वाट पाहतोय अस फोन वरून सांगितले.प्रवास करत पहाटे 2वाजता  पोचलो यात गुगल मैप असल्यामुळे अपार्टमेंट च्या समोर गेट वर गाडी उभा केली.सेकुरिटि ने विचार पुस केली.2 वाजता कॉल केला की लगेच तो माजी  सैनिक गेट वर हाजर.गाडी बंगल्यासमोर पार्क केली लागलीच सर्वजण उतरलो.घरात गेलो पाणी घेतल.आराम करायला सांगितले.सकाळी जेवण केल्याशिवाय जायच नाही."भाऊसाहेब "अस सांगितलं आम्ही उपवास आहे.काही करू नका ! बोलणार तेवडयात आम्हाला पण एकादशी असते उपवासाचे करू म्हणत तुम्ही आराम करा सांगून काकू निघून गेल्या  प्रवासामुळे पटकन  आम्ही सर्वजण झोपलो पण हे मेजर आणि त्यंच्या पत्नी तीन वाजल्या पासून तयारीला लागले झोपेत त्यांची कुजबुज आणि धडपड येकु येत होती.

सकाळी सहा वाजता आम्ही उठलो सात जण आंघोळ करून तयार होई पर्यंत काकूनी गरम चहा आणून दिला.सकाळचे साडे सात वाजता सर्वजण निघण्यासाठी तयार झालो.तोच मेजर काका नी फराळाला बसा सर्व तयार आहे.असा आवाज दिला आम्ही तर भारावुन गेलो.येव्डया सकाळी कधी बनवलं. विचार करत डायनिंग टेबल वर बसलो तोच समोर चे फराळाचे पदार्थ पाहून आश्चर्यचा धक्का बसला. गाजर काकडी आणि मुळा स्नैकस भरलेली प्लेट आली. दुसऱ्या ताटात भेंडीची भाजी डाळ अन् गरम गरम गव्हाची रोटी उपवास आहे म्हणणार तोच आमच्या चेहऱ्यावर चे भाव पाहून किचन मधून काकू बाहेर आल्या हिंदी मध्ये उपास के दिन  प्याज और लसूण नही खाते ? अस उद्गारल्या आम्ही शांत झालो.समोर ताट पाहिले अन् मनात म्हटलं माफ कर "विठ्ठला" आज फराळ तर करणार. सकाळी तीन वाजल्यापासून आग्रहाने स्वयंपाक करणारी माऊली आणि तिला मदत करण्यासाठी धावपळ करणारे मेजर भेंडी चिरून देण्यापर्यंत कष्ट आणि त्यामागच प्रेम.सकाळी 7.30वाजता प्रेमाने  सात जणांसाठी स्वयंपाक करून आग्रहाने वाढणारे शीकदल  दांपत्य आणि पुढे एकादशी ठरवले चला यांचे मन मोडायच नाही.

म्हणून पोटभर जेवण केल.स्वीट म्हणून काकूनी त्यांच्या माहेर अर्थात कोलकाता येथून आणलेला स्पेशल पेढा दिला.तो खाण्याचा सर्वात जास्त आनंद संतोष जोगदंड यांना मिळाला.शेवटी जेवण झाल्यावर आम्ही निघण्याच्या बेताने बाहेर आलो तर ते कुटुंब भारावून गेल डबडबल्या डोळ्यानी त्यांनी निरोप दिला."भाऊसाहेब" थोडा और लीजीए हा त्यांनी उच्चारलेला शब्द आज ही कांनात घुमतोय. सकाळी तीन वाजता स्मित हास्य चेहर्यावर  घेवून स्वागत करतांनाचा भाव आणी तीच स्माईल निरोप देतांना.भेटून आनंद वाटला या माणसाला तस पाहिलेतर आम्ही मित्राचे मित्र म्हणजे पाहुणे नाही तर रावले होतो मात्र त्यांनी केलेला पाहुणचार चिर स्मरणात राहील.किती प्रेमळ मानस तेही ना नात्यातले ना गोत्यात आणणारे खुप काही शिकवून गेले.शेवटी नाना महाराज यांच त्यावेळी बोललेल वाक्य आठवले भाग्यवान आहोत देशभक्ताच्या घरी एकादशीचा  फराळ मिळाला.मी त्यांना हिंदीत हे वाक्य सांगितले हसत मुख त्यानी आनंदने हमे भी तो वारकरी महराज के सेवा का अवसर मिला! हम धन्य हो गये. बोलत बोलत निरोप घेतला.सहज विचार मानत आला भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत याचा अनुभव आला -- या दांपत्य बाबतीत मूळ  पश्चिम बंगाल चे रहवाशी. राहतात  आग्ऱ्यात आणि महाराष्ट्रीयन  लोकांशी आपुलकी चे नाते हा अनोखा योगा योग अविस्मरणीय ठरला.

असो शेवटी आपुलकी आणि माणुसकी या मुळेच सर्व ठिकाणी प्रेम मिळत 
--
सुरेश जाधव 

Wednesday 14 March 2018

दिल्लीवारी एक सुंदर अनुभव. हवा हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !

हवा ! हवाई प्रवास प्रेरणादाई सफर !


दिल्लीवारी एक सुंदर अनुभव

विमानात बसणे हा तसा माझा पहिलाच  अनुभव तेवढी हाय फाय लाईफ स्टाईल फक्त  येकुन होतो. कसे असेल विमान या  बाबतीत आम्ही लहान असताना अनभिज्ञ होतो पुन्हा चित्रपटात पाहिल्यावर दुरून डोंगर साजरे तशी ओळख झाली.लहान असताना गावात  कागदाची विमान बनवणे आणि  हवेत उडवणे.तर  जहाज बनवणे तेही कागदाचे पुन्हा वड्या ला जावून पाण्यात सोडणे ईतकेच शहाणे आम्ही! कधी काळी शाळेत आणि चित्रपट पडद्यावर च्या हवाई सफरीचा अनुभव घेण्याचे खुप दिवसा पासून चे ईप्सित होते. 

गावातून शहराकडे आलो तरी याचं कुतूहल होतच.तिकीट कसे असेल?  किती पैसे लागतील? विमानात चहा किती रुपया ला असेल? जेवण घ्यायच की  नको?  सीटबेल्ट कसा बांधायचा?   आणि पदार्थ खाताना काय कशासोबत खायचे? त्यात शाकाहारी मांसाहारी ची भानगड ? मग नकोच का ? काय  सोबत घेवू?  आणि काय नको? गर्ल होस्टेस कशी असते? इथ पासून ते कदचित पोहचायला तर उशीर होणार नाही ना? विमानातून खाली पाहिल्यावर कसे दिसेल? या अनंत प्रश्नानी गोंधळ घातला होता. या सर्व  प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वेळ जवळ येवून ठेपली..

तस अचानक दिल्ली ची वारी घडली याच कारण ही  वेगळच-- पंढरी च्या वाळवंटातील टाळ थेट दिल्ली मध्ये वाजणार होते.म्हणजे विराट ज्ञानेश्वरी पारायन सोहळा रामलीला मैदान दिल्ली या ठिकाणी प्रकाश महराज बोधले यांच्या कुशल नियोजनाने भव्य सप्ताह सुरू होता  त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे  भाग्य लाभले धन्यवाद जोगदंड (भाऊ )
---जाताना प्रवास "बाय कार"आणि परत लवकर बीड ला यायचे म्हणून  मी आणि  नाना महाराज यांनी अनेक अडचणीचा सामना करत अखेर दिल्ली गाठली.सप्ताहात सहभाग घेतला कीर्तन येकेले.दिवसभरात दिल्ली दर्शन केल यात बऱ्याच नवनवीन गोष्टी पहिल्या भारतीय लोकशाही चे पवित्र मंदिर पाहिले.त्याच वेळा मी ज्या जिल्ह्यातून येतो तो बीड आणि त्या चे प्रश्न दिल्लीत मांडणारे  दिल्लीत मधील 25लाख लोकांचे प्रतिनिधी आठवले.आम्ही या विषयावर बरीच चांगली वाईट चर्चा केली--संबंधित प्रतिनिधी अर्थात --"लोकसेवक " यांच्याशी संपर्क केला.काही काम मुळीच नव्हत मात्र 1400किमी प्रवास करून आल्यावर आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधी ची सहज भेट ही महत्वाचीच असते पण शेवटी नाहीच झाली --यात काही चांगले वाईट अनुभव गाठीशी बांधून विषय सोडून दिला.

सर्वात आठवणारी कायम लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे आदरनिय शरद पवार साहेब यांची भेट त्याच बरोबर खा सुप्रिया ताई सुळे सोबत चर्चा यातच आय टी च्या विद्यार्थी यांच्या सोबत पवार साहेब यांच्य मनमोकळ्या गप्पा ऐकण्याचा  योग आला   -- परत दिल्लीतील वारकऱ्यांना भेटायला येणार हा दिलेला शब्द --यात फोटो काढताणाचा बाणेदारपणा आजच्या दिवसाचा वेगळा अनुभव होता नंतर  काढलेले फोटो घेण्यासाठी करावी लागलेली धावपळ आणि तिथे मिळालेली वागणूक यामुळे वरच व्हीव्ही आयपी आणि शिष्ट पण ही अनुभवले असो.

यासर्व घटना क्रमात  जनपथ--राष्ट्रपती भवन --संसदभवन --इंडिया गेट --अमर ज्योत --गांधी संग्रहालय --लाल किल्ला --चांदणी चौक मार्केट --राजघाट -- पाहिले अप्रतिम आणि सौंदर्य तसेच भव्य तेचा दिव्य अनुभव देणारे ठरले. गर्मी आणि ऐसी या दोन्ही वातावरणात शरीराची होणारी पंचाईत सहन करत .. दिवस ढळतला--दिवस मावळा होता.पाय थकले होते.पण  शेवटी नाना महराज यांनी महाराष्ट्र सदन नावांची वास्तू कोणती ती पाहण्याकरता आग्रह धरला.मग आम्ही जायच ठरवल अशा ठिकणि  जिने बऱ्याच जणांचा" वास्तू" करून टाकला. मोबाईल मध्ये लोकेशन टाकून पोचलो.तर भव्य इमारत इमारतीत गेट वर कोमल आवजात नमस्कार शब्द ऐकला.आत प्रवेश करून  रिसेप्शन मधे रूम विचारल्या तर 6 हजार आणि  मंत्र्याची  किँवा आमदार खासदार यांची शिफारस अट ऐकल्यावर धक्काच बसला.आपल्या बजट मध्ये बसत नाही .म्हणून सहज फेर फटका मारला तर  फाईव्ह स्टार हॉटेल ला लाजवेल असे फर्निचर आणि शाही बडदास्त पाहून थक्क झालो.नक्की अस असल पाहीजे शेवटी महाराष्ट्र साम्रद आहे.पण  मूठभर  लोकानाच त्याचा फायदा गरिबाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली वास्तू पुन्हा पैसे उकळन्यासाठी सज्ज हे विक्षिप्त वास्तव पहिले. चहा पिऊन थोड फोटो सेशन करत जय महाराष्ट्र ठोकला.

आत्ता रात्रीचे आठ वाजले होते परत गाड़ी सप्ताह मंडपात आली होती कीर्तन सुरू होते मस्त कीर्तन रंगात आले होते.तोच यमक करणाऱ्या केंद्रीय नेत्याचे आगमन झाले.त्याचे स्वागत वैगेरे वैगेरे झाले.परत त्यांना टाळ "आठवले" आणि वारकरी टोपी घालण्यावर चारोळी झाली.एकमेकाना टोप्या घातल्या नेते प्रेम दाखवून निघून गेले.--कीर्तन डिस्टर्ब होत पुन्हा सुरू झाले. 10 वाजता ज्ञानेश्वर माऊली ने कीर्तन संपले. आता विमान प्रवास त्यांच चक्र डोक्यात फिरत होत.कसे बसे  काही घास पोटात ढकलून हात धुवून रेडी.त्यात एअरपोर्ट वर  फोटो  काढायचे म्हणून मोबाईल चार्जिंगला लावला.कधी  12वाजतील आणि कधी  पोचेल अस झाल होत.11.30ला एअरपोर्ट कडे निघालो.गाडी सोडायला आली होती.मैप लावला पण भरवश्याच्या  म्हशी ने टोणगा दिला.मैप मध्ये रस्ता चुकला अक्षरश 1तास फिरत राहिलो रस्ते मोठे ट्राफिक त्यात महिती नाही.आणि  वेळ चुकते की काय याची चिंता पण सोडवायला आलेल्या संतोषराव आणि अशोक घोडके दाजी(भाऊ चे जावई) यांच्या मुळे एकदाचे टर्मिनल 3च्या गेटवर  पोचलो.ड्रॉप करायला आलेल्याचा निरोप घेतला .

पहिल्यांदा अंतर राष्ट्रीय विमान भव्य विमानतळावर जरा सा गोंधळलेल्य अवस्थेत आम्ही दोघो अंदाजे गेट वर तिकीट दाखवून आत प्रवेश केला.इंग्रजीच थोड बहुत ज्ञान कामी आला ! plz म्हणून गोऱ्या मुलीला तिकीट दाखवल.तिनी बोर्डिंग साठी चेकिंग पोस्ट ला जाण्याची सूचना केली. लाईन मध्ये  उभा राहिलो पण शांत नव्हतो कारण महिती काहीच नव्हत  पुन्हा काऊंटर वर जावून  विचारत अतिक्रमण केल .एकदा चा बोर्डिंग पास मिळाला. आत्ता शांत पणे वेटिंग रूम कडे जाता ना मॉल पेक्षा जास्त घमघमाट आणि रात्री चे  1 वाजले आसताना सकाळची घाई आणि लगबग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. फोटो काढायचे का ? नको म्हणत हळूच सेल्फी घेतली.जिकडे पहावे तिकडे नवे द्र्श्य होत नवा अनुभवखूप काही शिकवून जातो. बरेच फोटो  टिपले.1तास वेटिंग केल्यानंतर 2वाजता विमानाच्या दरवाजा जवळ वेलकम करणाऱ्या सुंदरी चा कोमल आवाज कानावर पडला.मग सीट वर जावून बसलो.शेजारी कोण ? हा आणखी कुतूहलाचा प्रश्न ? पण मुंबईचा अंजान मित्र भेटला.बेल्ट अंदाजे लावला.परत माहिती असल्यासारखे अज्ञान झाकत नकळत शेजार्याला फॉलो करत.सर्व क्रिया केल्या.

एकदाच  2.25 मी विमान टेक ऑफ झाल.ताऱ्यांच्या सानिध्यात भारत भूमीचे लुकलुक नारे सुंदर दर्शन घडले. बऱ्याच दिवसाचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होताच! हेड फोन कांनात घालून लिव्हल वेळ कसा गेला समजल नाही. मधल्या सर्व सुविधाचा लाभ घेत.सकाळी 5 वाजता मुंबईत  लैन्ड झालो  -- पुन्हां काही वेळाने परत टेकअप झालो थेट औरंगाबाद सकाळी 6.20 एअर पोर्ट मधून दोघे बाहेर  पडलो. तो निर्धार करत पुन्हा प्रवास करायचा ! व्ही आय पी म्हणून ! संपूर्ण प्रवास प्रेरणादाई झाला
 
धन्यवाद
सुरेश