Sunday 14 January 2018

"ती"चा कुंकवा शिवायचा संघर्ष ---! व्यथा


"कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे" धड पेट ही  घेईना आणि विजुन ही जाईनां!

कुंकू तस सौंदर्य अलंकारांतील एक भाग मात्र कधी ते भाग्य- अभाग्य आणि सौभाग्य या समाजांच्याखुळ्या कल्पणा आणि  समजूतीचे वर स्वर होवुन ते जीवन मरणाचे प्रतीक तर नाही ना? याचा विचार कारवांच लागेल --स्वतंत्र पूर्व काळात सती प्रथा बंद करण्या साठी चा संघर्ष आज विधवा प्रथा बंद करण्या साठी आवश्यक आहे --त्या वेळी एकदाच्या मरणाने दुःख संपत होते--मात्र आज कुंकवा विरहीत आयुष्य म्हंजे  समाजाने पेट्वलेल्या सरणावर धूपत धूपत जळणे 
धड पेट ही  घेईना आणि वीजुन ही जाईनां अशीच काही स्थिती असते --यात दोष काय असतो "त्यांच्या" मरनाने मरून गेलेला जोडीदार मात्र "हिच्या" आयुष्यत समाजाच्या विखारी आणि विषारी बिजाची पेरणी करून जातो 

हळदी कुंकवाचा सण म्हणजेच मकरसंक्रांती  प्रेमाचे स्नेह मिलन आणि दुःख वेदनेवर  फुंकर घालून आनंद गीत गात महिलांनी धरलेला फेर हाच या सणाचा मुख्य उद्देश -- मात्र या उत्सवात तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश ही दिला जातो पण खरंच आपण अस वागतो का ? आपल्याच घरांतील जिचा पती वारला "ती" -- मुलगी.आई .बहिण चुलती मामी आत्या मावशी  या  महिलांना आजच्या दिवशी सन्मान देतो का ?  संक्रांतीची साडी घेतो का ? हळदी कुंकू जावूद्या पण तीळ गुळासाठी सन्मानाने बोलावणार आहोत का ! तर  या शुभेच्छाला  महत्व आहे - नाही तर संस्क्रुतीच्या  नांवाने गळे काढून कित्येकांच्या भावविश्वाचे बळी घेणार आहोत! पती पत्नी च्या पवित्र नात्यांत दुर्दैवाने अकाली जोडीदार गमावलेल्या ती च्या बाबतीत थोड़ा विचार केला तर बर  होईल.कारण "ती" सुद्धा समाजातील माणूस म्हणून जीवनाचा संघर्ष करणारी आहे --एका कार्यक्रमात गेलो आणि जे पाहिले त्याने चीड आली कुटल्या आधुनिक युगात जगतो की अश्मयुगात या प्रश्नाच उत्तर मिळालं नाही!

वाजंत्री वाजवत होती .तरुणाई नाचत होती--निमित्त होत लग्नाच्या हळदी समारंभाच  सर्वजण आनंदात होते.नवरा मुलगा पाटावर येवूं बसतो --हळदी च ताट पुढं येत तसी नवऱ्या मुलांची बहीण ते ताट हातात घेवून हळद लावण्यासाठी समोर येते हळद सुरू असते.पण त्याचं वेळी मुलींची मोठी बहीण हळद लावण्या साठी ताट हातात घेते तेव्हा "ति"च्या हातुन ताट हिसकावून घेण्यासाठी स्पर्धा लागल्यागत धडपड सुरू होते .हळद लावतांना हातातील ताट विस्कवून घेण्यात आल् याच कारण तिचा पती काही दिवसा पूर्वी मयत झालेला होता.बहिणीच्या अंगाला हळद पण लावता येत नसल्याने स्वताच्या नशीबाला दोष देत डोळ्यातलं पाणी आवरन्यासाठी कोपऱ्यात जाऊं अश्रू ला वाट वेगळी करून देणारी दुर्दैवी बहीण  पहिली आणि धस्स झाला --- डोकं सुन्न झाल 


बऱ्याच शुभप्रसंगी (चांगल्या कामी)जस की लग्न मुंज आदी करून आनंदच्या प्रसंगी आपण (जिचा पती वारला) "ती" या बाबतीत काय विचार करतो --जरा लक्षात आणा!  भावाचं लग्न होत असतांना हळद लावण्याचा मांन कलवरी म्हंणुन बहिणी चा आहे .मात्र कुंकू नसेल तर कित्येक बहिणीला रोखलं जात --काय वाटत असेल यांनी यात तिचा काय दोष --या पुढे ओवाळणी करणं ओटी भरणं आदी.महिलांच्या कार्यक्रमात या माऊली कडे तोऱ्यात मिरवणाऱ्या कुंकू वाली कडून वारंवार हिणवले जात एव्हडंच काय तर --कां काय होत जर का तीन भावाला हळद लावली ओन्टि भरली तर काय होणार आहे पण नाही आणखी बुरसटलेले विचार डोक्यातून गेलेच नाहीत. दुर्दैव आपण फक्त कुडा च्या घरातुन सिमेंट च्या बंगल्यात आलोत "भिंताड" सुधारली पण "छाताड"नाही याच वाईट वाटत 

-दुःखी माणसाला आधार द्या त्याचे अश्रू पुसा हे सर्व ग्रंथ शास्त्र सांगत आणि आपण काय करतो त्यांच्या जखमेवर मीठ सिंपडतो. ईथेच थांबतो का तर नाही उलट तिच्या कमजोर पोकळी ची जाणीव सतत व्हावी या साठी वारंवार टाळलं जात.बोलूं तर कधी क्रतीने हेटाळल जात हे विचित्रच आहे एकीकडे समतेचे झेंडे मिरवून स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरिकडे सुशिक्षीत लोकांनीच "सुवासिनी"सौभाग्यवती"या मोठं विषेशनांच्या नांवाने पुन्हा दुसरी दरी निर्माण करायची .यात पुरुषा पेक्षा महिला जास्त जबाबदार आहेत.कुटल खुळ डोक्यांत घेतील समजत नाही.मात्रा "ती" अव्हेर न्याची कोणतीच संधी सोडत नाहीत.

प्रवास असो की सामाजिक प्रसंग यात कुंकू नसलं की टपून बसलेला डोम कावळे  आणि त्यांच्या विषारी भेदक नजरा चुकवण्यासाठी करावी लागणारी धडपड ही  "ती" ला रोजचीच असते येव्हडेच काय तर त्रास देणारे आणि चोच मारणारे कावळे यांच्या पासून संरक्षण व्हावं म्हणून  छोटी टिकली लावते अस एका माऊली ने सांगितलं --

जन्म आणि  मर्त्यू कोणाला  चुकलाय का ? मग  जिवंत माणसाकडे आपण एव्हड्या हिंन भावनेने का पाहतो ! की त्यांच्या माणूस पणावरच आपलां संशय आहे --सुखाने जगण्यासाठी माणसाने समाज निर्माण केला यात समाजातील कुटुंब संस्था ही प्रमुख समजली जाते  --पुरुष आणि स्त्री ही  संसार रुपी रथाची दोन चाके असतात --मात्र कधी कधी या  सुंदर रथाला नियतीची द्रष्ट लागते आणि  एक चाक निखळून पडते --मात्र जबाबदारी चा रथ एका चाकांवर सुरू असतो यात पुरुष असेल तर "नवं"चाक म्हंजेच दुसरं लग्न करायला लगेच तयार होतो मात्र स्त्री ला याची संमती दिली जाते का ? तर याचं उत्तरं नाही असंच येतं काही ठिकाणी मिळतंही  असेल परवानगी पण क्वचित -बरं मग या संसाररथाच्या जबाबदाऱ्या पेलताना काय वाढून ठेवलं जात याची कल्पना केली तरी अंगावर काटे उभे राहतात -- लग्नात शुभेच्छा आणि भेट वस्तू घेवून आलेले नातेवाईक अशा दुःखद प्रसंगी श्राध्द झालं की मोकळे होतात आणि सुरू होतो तो  नसंपणाऱ्या आयुष्याच्या प्रवासाचा टप्पा ज्यात "ती" एकलीच असते 


 हाडा मांसाची आणि रक्तानात्याची माणसे ज्यांच्या  आशीर्वाद आणि शुभेच्छाने  "ती" चा सुरू झालेला सुवासिनीचा सुमधुर प्रवास मात्र पती च्या अकाली जाण्याने खडतर होवुं जातो --पती निधनाने "ती"च  आयुष्यंच हिसकावून घेण्याचा समाज प्रयत्न करतो अस करणारे  काही दूर चे नसतात मात्र खुळचट रुढी आणि परम्परा यांचे पालन करण्यांत आसुरी आनंद मिळतो का यांना--दुःख सागरात बुडालेल्या त्या असाह्य माऊली ला आधार देण्यायाऐवजी कुंकू पुसण्याची  आणि मंगळसूत्र तोडण्याची घाई का असते --तसही चालतं बोलत आधार देणार माणूस निघून गेल्यावर निर्जीव रंगात आणि धातू मधें काय असतं --त्यांची आसक्ती थोडी असते? जीव लावलेलं माणूस निघून गेल्यावर कशात जीव अडेकेलं का पण किती --निष्ठूरपणे सर्वा समक्ष कुंकू पुसणारी आणि मंगळसूत्र तोडून दुःख सागरात डकलुन देणार्यानी  तिच्या वेदांनाचा विचार केला कां? जखमेवर मीठ चोळनारी  ही  कुटंली घाणेरडी मानसिकता थांबलं पाहीजे कुटं तरी हे कुंकवाशिवाय चा संघर्ष काय असतो तो नाही कळणार --?

ऐन तारुण्यात वादळी आयुष्याची सुरुवात करून स्वप्नांच्या पाऊलवाटा शोधणाऱ्याला मनाला असा अचानक धक्का बसतो आणि आयुष्याची सुंदर रांगोळी विस्कटू जीवनाची घडी बिघडून जाते -- यात समाजाने कूट तरी "ती"ला सावरलं पाहिजे.आधार देवून सन्मानाने वागवलं पाहिजे .जगण्यासाठी चा संघर्ष तर  प्रतेक जण करतो मात्र अशा प्रसंगी धीर आणि आधार महत्वाचा असतो.

एकीकडे शहिदांच्या बाबतीत विचार करतो पण  वीर पत्नीला सन्मानाने जगू देतो का ? यांच आत्म परीक्षण व्हाव -- या संक्रांति दिवशी विधवाना सन्मानाने वागणूक देवून त्यांच्या बाबतीत विचार करायला लागलो तर खरी संक्रांत गोड होईल-- 


काल काकड हिरा  गावात अशीच वेगळी संक्रांत पहिली आनंद वाटला -- मनीषा जायभाये आणि प्रतिभा हावळे या दोन शिक्षिका विधवा प्रथेविरोधात चळवळ उभी करत आहेत.काल रात्री ही संक्रांत  85 विधवा महिलाना तिळगूळ आणि साडी वाटप करून संपन्न झाली---अशादायक चित्र समोर उभा राहील चळवळ व्हावी.


सुरेश जाधव 
9404204008

Tuesday 2 January 2018

फक्त दगड त्यांचे होते! फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती


फक्त दगड त्यांचे होते!  फेकणारे हात आणि फुटणारी डोकी आमचीच होती

सड्कि डोकी जरा शांत ठेवा! किती दिवस इतिहासावर दगड मारणार!

विचाराचा इतिहास शिकवणाऱ्या महापुरुषानी जाती वादांची बंधने  झुगारून  निकोप  समाज निर्मिती  साठी  दिलेलं  बलिदान आज आम्ही  विसरलो अहोत  काय?

बुरसटलेल्या मेंदू वाल्याच्या सडक्या डोक्यांन  पुण्याच्या शांतंतेत  मीठ टाकलं विध्वंसक मानसिक तेणें  पुन्हा  बहुजनांच्या पोरांना तोफेचा गोळा  करुन ठिणगी पेटवली खऱ्या इतिहासावर दगड मारून तो  काय पुसला जाणार  होता का मात्रं किळस वाना त्यांचा प्रयत्न होता यानं आमचं खुप मोठं नुकसान  झालं ओ जाती च्या मोर्चा ने निर्माण  झालेली  दरी  आणि दुरावले मन विसरून  माणूस कसा बसा एक येत होता त्या ऐकतेला खिंडार पाडन्याचे शड्डयंत्र रचल गेलं  आणि  त्यात आमची  पोरं भरडली  गेली हातात  दगड दिली बसले तमाशा पाहात! फक्तं दगड  त्यांचे  होते!  फेकणारे हात  आणि  फुटणारी  डोकी आमच्याच बांधावाची होती! कायदा  हातांत घेतो तेव्हा कायद्यांच्या  कचाट्यात अडकनारे पण आमच्याचं समाजातील  कोणाचे नातेवाईक नक्कीच  असणार  त्यांचं  भविष्य काय ? कुटुंबाचं काय? का  फक्तं --बदला आणि सूड ज्याला बुड टेकवायची  अक्कल नाही त्यांला सूडाच्या मागचं गूढ राजकारण काय कळणार! इंग्रज  गेले पण  200 वर्षा नंतर भेद  नीती तशीच आहे तोडाफोंडा आणि राज्य करा. काय?  डोकी गहाण ठेवल्यागत वर्तन  सुरू आहे.इशाऱ्यावर नाचणारी आणि शिकवलेलं बोलणारी पीड़ित पिढी निर्माण होते हेच दुर्दैव. यातच  जातीवाद आणि समाज कारणाचे  अर्ध हळकुंड उगाळून पीलेली काही भगवी  झालित तर  काही निळी पिवळी पडली आहेत.हीच ब्याद तर मुळांवर आलीय.वैचारिक लढा उभारुन प्रश्न सोडवन्यपेक्षा खऱ्या खोट्या भूतकाळावर आज युद्ध सुरू आहे. हे  अतिशय चूक आहे. या  विघ्नसंतोशी व्रतीच्या मुसक्या आज  ना उद्या आवळ्या जाणारच आहेत.

 
गुण्या गोविंदा ने हातात हात घालुन ताटाला ताट नाही  तर ताठ माने ने ताटात जेवण करणारी आमच्या पिढी ची घडी बिघडवू पाहणाऱ्यां शन्ड लोकांची तोंड पाहायची इच्छा नाहीए!  शिकणाऱ्या लोकांची डोकी जास्त भडकतात का? चूक  बरोबर  खरं  खोटं  याची  चिकित्सा  सोडा  पण  शहानिशा पण  करायचं  सोडून  बेताल सोशल मीडिया वर  स्वार व्हायला तयार  होतातच कसे ? वाईट वाटत ज्यांच्यात आपण  वावरतोय  त्यांच्यावर  दगड  कसाचं  उचलला  जातो  घटनां भीमा कोरेगाव ची निंदनीय आहे निषेध आणि  फक्तं निषेध हेच प्रत्येकाचे उत्तर आहे  पण आज  महाराष्ट्रातील गावा गावांत विश्वासा च्या भिंतीचे अंतर आता भीती वर पोचले विश्वासाला तडा जायची वेळ नाही तर परिस्थीती निर्माण झाली!शहरात भागत ओ  कर्फ्यू लावून. आठवड्याचं नियोजन असतं आणि  पर्याय  ही असत्यात. गावांत काय करणार पोट भरण्यासाठी आज ही रोजंदारीवर जावं लागत तेव्हा चूल पेटती त्यात तुमच्या असल्या दगड  फेकीने आमची संस्कृती उध्वस्त होती. या च्या  परिणामांचा कधी  विचार  होणार  आहे  का ? पुन्हा मुहल्ले नगर आणि वाड्यात विभाजन करायचं ! रोज  एक मेका ची तोंड पाहणं चुकणार आहे का ! नाही  ना  मग  गरम  डोकं  जरा  शांत  ठेवा ! बाबासाहेबाची लोकशाही आणि संविधान  तुमच्या सोबत  आहे  ना ! जगाला  शांतता काय असते  हे  शिकवणारे  आमचे आदर्श युगपुरुष बुध्द आमच्य बुद्धीत आहेत का ? फक्तं  फोटो पुरतेचं यांचाही विचार होणं गरजेचं आहे!

कालची घोषणा ऐकली आणि वाईट  वाटलं नमो तस् भगवतो अर्हतो-- या  प्रार्थनेचा वेगळाचं  वापर केला यातचं बुद्ध नको  युद्ध हवं हा  सूर तरुणाई आळवत  होती! ही  धोक्याची  पूर्व घंटा आहे कां याचा  विचार  हिं  व्हायलाच हवा.समाज जीवनाचे खरे तत्व माणुसकी आम्ही  विसरत अहोत.जातीवाद पुन्हा प्यारा वाटू लागलाय इथे माफ करा बाबा मात्र आम्ही  चुकतोय हे कळत असूनही वळत नाही! उचलेला  दगड जशी जात विचारत नाही तो  त्याच  काम करतो तसं फूटनारी काच कितेक तुकड्यांत विभागतें तिच्या नुकसानीचं मोल लावता येत! कदाचीत त्याची  किंमत  कमी जास्त  असेल ही  मात्र  समाज मनाच्या -हदयाला पडलेली  चिर तीच काय? यांचा  विचार करा.हात जोडून विनंती.

मूठभर लोक सुशिक्षित झालेत त्यांचं सोडा खंडीभर  तसेच आहेत.भाकरी चा प्रश्न  तसाच आहे.आकाशाचं पांघरूण करुन  कुडकुडत पडलेली कुटुंब यांचे प्रश्न? कुपोषण?  झोपडपट्टीची व्यथा? शेतकरी आत्महत्या! दहशदवाद? नक्षलवाद? याचा  कधी  विचार  केला  का? दोस्ता हो!


आमची बुध्द शिव शाहू फुले आंबेडकराची लेकर जाती वादांची भाषा बोलायला लागले आपलं तूपलं  याही पेक्षा मप्लंची ची संकुचित शिकवन नडत आहे.असेच किती दिवस विष प्रयोग करणार यानं कुणाचं  बरं झालं आणि  पदरात काय पडलं  याचं ही उत्तर  शोधा. गरीबांची लेकरं दमडी कमवायचे सोडून आयुष्यं गमवायची भाषा करतात अन् पिसाळलेल्या गत बुद्धी भ्रष्ट होवुन कुणाच्याही मागे धावतात हातात पदरात  काहीचं  मिळतही  नाही  आणि  काय  करतो ते  कळत देखील  नाही अशा वेळी  कोण  जिंकतो ? कोण हरतो? या  पेक्षा समाजा ची पार वाट लागते पिढी बर्बाद होते. या क्षणांची  वाट पाहातोय का ? डोकं ठिकान्यवर ठेवा! न्याय व्यवस्था ; कायदा आणि  राज्यघटना या वर विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या  संकल्पानेतूंन  साकारलेल्या खऱ्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.

नसता बिघडल्यागत  असेच किती दिवस इतिहासावर दगड मारणार ! सड्कि डोकी जरा शांत ठेवा!



सुरेश जाधव
9404204008