Thursday 21 September 2017

ठसाची" चेष्टा,कर्ज माफ़ी चे गाजर

ठशाची" चेष्टा,कर्ज माफ़ी चे गाजर किती हाडभाड़ घेणार,
----
बाळा माझे ठसे उमटत नाहीत रे ,सात दिसा पासून चकरा मारते "माय"---ते आधार कार्ड मागत हाईत,मह्य नवर्याच्या नावावर 40 हजार कर्ज हाय,-- "त्याचे" ठसे उमटले "माय" पण भांडी घासुन अन् पाण्यात काम करून माझे हात उंगळलें की काय?म्हहे उमटू नाय राहिले, तू तरी सांग बावीस तारखी पत्तूर उमटतिल का?




साठीपार करून सत्तरीच्या उमबरठ्यर असेलेल वयोवृद्ध म्हाताऱ्य आज्जी चा हा प्रश्न येकुण धस्स झाल, काठीचा "आधार" घेवुन निराधार जीवन व्यतीत करणाऱ्याला "आधार" च्या रांगेत उभाकरून  छळ चालू केलाय,अख्ही हयात कष्ट उपसुण-- हातचे कातडे निर्जीव चामडे झाले ,कित्तेक वेदने चे फोड़ संवेदना हरवल्या गत याच तळहातावर जिरुन गेले, चटणी मिटाचा मलम लावून,भाग्यरेषा न शोधता आयुष्य रेषा ओलांडणाऱ्या या लोकांना आज रांगेत उभा पाहिले आणि वाईट वाटल,

प्रत्येक बँके समोर च वास्तव खूप भयंकर आहे,यात" सेतु सुविधा केंद्र आणि आपल सरकार" यासर्व ठिकाणी कर्ज माफ़ी साठी रांगेत उभी नाहीतर आडवी झालेली मानस फक्त आशेने उभीआहेत ,यात नेट प्रॉब्लेम, लाईट अडचण,त्यात सर्वर जाम,आणि नंतर आधार मधील बोट यासगळ्याअडचणीचा सामना करत गावापासून बीड पर्यतचे 15 कीमी अंतर कापून आठ दिवस चक्रा मारणार्या याआज्जी आजोबाचे काय चुकलं वो-- बीड तहसीलच्या समोर आधार दूरूति केंद्राच्या रांगेत झाडाखाली बसलेले कुटुंब--- तोंडावर सुर्कुत्य पड्लेल्या आणि थोडा काळजी वजा खिन्न चेहरा,हातात कागद हिरव लुगडे आणि डोक्यावर पदर घेवुन नंबर येण्याच्या प्रतिक्षेत बसलेल्या आजी आणि ताटकळत उभा राहून वैतागून आडवा झालेला त्या म्हातारी चा म्हातारा , मळकट फडक्यत बांधून आणलेली भाकरी,अन् येण्या जाण्याचा होशोब करणारी आणखी काही अनपढ़ मानस, येकर दोन एकर चे मालक पण पूर्ति पंचायत करून टाकली ,आठदिवस चक्रा मारून आधार ने अडवले, शेवटी ठश्याच्या दुरुस्ती न झाल्याने हे कुटुंब पुरते वैतागून गेलय --

गावातिल प्रत्येकजण सुशिक्षित आहे या अवीर्भावाने कर्ज माफ़ी चा फॉम दीड मिनिटात भरन्याचा दावा  मुख्यमंत्री साहेब करत आहेत,एसी च्या खोलीत, बदामचा शिरा तुंप टाकून गँसवर करून खावू घालनाऱ्या तुमच्या मँडमच्या बोटाचे ठसे बघून तुघलकी निर्णय घेतायराव,बाँधावरच कष्ट करून हातावर कूट रेषा राहतात का? जरा ईचार करा दमडी भर कर्जा साठीचामड़ी ची अट कशाला लावता,तिकडे गोर्या कातड्याच्या लोकांसनी विनाअट न मांगता कोट्यावधी देताराव,हा कातड्याचा दोष की सड़क्या मेंदूचा सांगा तरी, साहेब वाटत होत आमच जगण भी आपल्याला मान्य हाय पण ते सपशेल खोट ठरले! शेवटी तुम्ही तुमच्या बेभरवंशाच्या जातीवर आले,
आणि शेतकरी बोगस आहे , त्याच कष्ट नाटक आहे म्हणू लागले,बाप म्हातारा झाला म्हणून त्याच्या कामाच माप काढुण आईच्या कष्टाचा लिलाव करण थांबवा ! जरा लाई लावून वाईन पीनारे कधी पाहिलेत का? डोक जागावर ठेवुन सर्वा समक्ष कर्ज माफ़ी चा विठ्ठलाला दिलेला शब्द पाळा!

काय पोरखेळ लावलाय,अशा किती रांगा लावून आमची वाट लावताय हा भाबडा प्रश्न शेतकरी विचारतोय, त्यात तुमचे मंत्री10 लाख बोगस शेतकरी असल्याचा जावई शोध लावून जखमेवर मीठ चोळण्यचा प्रयत्न करत आहेत,मग साधा प्रश् पडतो सर्व हिशोब ठोकताळे आणि याद्या तुमच्या हातात आहेत, आधार बँक आणि पॅनकार्ड सगळा डेटा तुमाच्या घशातआहे मग रिकाम आमच्या लोकाची धावपळ का करताय लाज वाटू द्या जरा? शेतकर्या च्या घामाची कदर ,कष्टाचा आदर नसेल तर ही गाजर कर्ज माफ़ी देवून पाने कशाला पुसता त्या लोकांना तुम्ही रांगेत उभा करत,सनासुदिचे दिवस यातच आजारी,किती हाडभाड़ घेणार

हे वास्तव आहे कर्ज माफ़ी च्या गाजराच, आधार लिंक केल्यावर परत पुन्हा बोटाचे  ठसे उमटत नाहीत तर आधार च्या डेटा सुरक्षित ठेवण्यची जबाबदारी कुणाची , एक दोन बाबतीत ठीक आहे पण गावातील 100- कुठे 200 लोकांची बोट उमटत नसतीलतर विचार करावा लागेल. तुमच्या अपयशाचे खापर सामान्य गौरगरीब  शेतकरी अडाणी,वयोवृद्ध, लोकांवर नका लादू--- ज्याला बोट नाहीत त्याला ही संविधानाने जगण्याचा आधिकार दिलाय तो हिरावून घेतय का? तसा बोटाचा इतिहास आणि अंगटयाचा पराक्रम "हाताने" पहिलाय. तस बोट धरून चालायला शिकवणारे आणखी आहेत, लोकांना बोट धरून वाट लावायला वेळ लागणार!

शेतकरीपुत्र- सुरेश जाधव महाराष्ट्र1 प्रतिनिधी बीड
मो-9404204008

Sunday 18 June 2017

"लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"

सुरेश जाधव ,महाराष्ट्र 1 प्रतिनिधी



लक्ष्मणसूत" म्हणजे "मी"माझ्या बापाच नाव लक्ष्मणराव जाधव , गावात प्रत्येक व्यक्ति मला हा जाधवाच्या लक्ष्मण चा पोरगा म्हणूनच ओळख ,तसा लहान पणी मी खूप हट्टी ,आणि हेकेखोर् असायचो ,एखादी गोष्ट नाय मिळाली कि भांडण करायचो, मग लगेच प्रेमाने जवळ घेवुन "भाऊ "(भावंडया) ही प्रेमळ हाक आली कि समजावं आपला हट्ट हक्काने पूर्ण होणार, आमच्या कडे आठवडी बाजार नेकनूर चा त्या दिवशी मात्र डोळे बाजार च्या पिशवी वर असायची ,मग दिवसभर उनड्कि करून दिवस मावळताना बाप बाजार घेवुन येणार याची आठवण व्हायची मग गावच्या सूतारनेटावर , वाट पहात बसायचे ,प्रत्येक टमटम ( रिक्षा ) आला कि पळत जायच ,पण नाय दिसला कि परत फिरायचे , "बापू "आले बापू आले अस ओरडत घराकडे पळायचौ.मग पहीला ताबा पिशवीवर मिळवण्यासाठी आमच्या भावंडात झंगड पकड़ व्हायची ,-----!
प्रत्येकच्या आवडी निवडीसाठी रात्र दिवस काम करणारा बापू माझा आदर्श आहे ,आजही मला चांगल आठवते ,मळकट शर्ट आणि पँट वर ढोरा सारख राबन,काबाड़ कष्ट आणि घामाचे पाट हे फक्त आमच्या साठीच होत,आजही ते सुरूच आहे ,शिक्षणा बाबतीत खूप आग्रही ,कारण त्या काळात 7 वी फस् क्लास पास झालेला,बापू फक्त महया "आज्या"च्या शब्दा खातर नौकरी सोडून शेती पत्करली होती,कारण माझ्या आई वडील यांना इथे कोण सोबती नाय म्हणून नौकरी वर पाणी सोडल हुत,बापू नं ----या निर्णयाबाबतीत आम्ही बऱ्याच वेळी तक्रार केली पण या गोष्टी चा पच्छाताप त्याना नाय,उलट स्वाभीमान आहे ,सुख आल तर हुरळून जावु नये आणि दुःख आल तर खचूनही जावु नये ,हे खुप मोठ "बापकडू"मला मिळाले ,तर माझी आई "आकां" बापु सोबत,खाँद्याला खादा लावून आज तागायत सोबत आहे ,सर्व काम तीला येत नांगरने ,पेरने ,येव्हडे च काय तर बैल गाडी ,असो पुरूषी काम पण कसबाने करते ,पण तीचं नेहमी सांगन ,"रिनकाडून संन नको " अर्धी भाकरी सुखची
आज मी याच छायेत घडत आहे,कित्तेक वेळी पाण्या अभावी  पीक जळत असता खिन्न मनाने बसलेला बाप मी पहीलाय ,अर्ध्या रात्री अर्धे तुकडे भिजवुण होईल म्हणून लाईट ची वाट पहात डोळ्यावर् रात काढनारा बापू ,बाजारात घेवुन गेलेल्य मालाच पैसे आले कि स्वप्न पूर्ण करणार अस आश्वासन पूर्ण करण्या साठी ची धडपड़ पहिली ,त्याच्या ऋणात आणि त्याच प्रेमात न्हाऊ निघन मला आवडत ,आज माझा" बापु" 60 वर्षाचा आहे .माझ्या पाठीवर् प्रेमाचा आणि आधाराचा हात आणि मायेची सावली मला कसलेच ऊन लागू देत नाय ,

बापू च्या डोळ्यातले  ते आनंद अश्रू मी कस विसरेल ,त्यांची इच्छा मी गावात कीर्तन कराव ,तेही वजनात ,ती इच्छा पाँच वर्षा पूर्वीच पूर्ण झाली,सप्ताहात पत्रिकेत नाव टाकल होत, कीर्तनात फेटा बाधुन उभा राहिलो तेव्हा बापू ची बेचैन अवस्था ,कस होत आणि कस नाही हे माझ्या पेक्षा त्याना टेन्शन होत,कीर्तन एकदाच झाल सगळे खुष झाले ,बऱ्याच जणांनी बक्षीसही दिले पण त्याच वेळी बापू ला कोण्ही तरी म्हटलं एकच नंबर् कीर्तन झाल ,तेव्हा खळकण पाणी आल ते सार्थक झाल्याच आणि क्रतर्थ झाल्याची पावतीच मिळाली ,

शेवटी बाप तेव बाप,शब्दात कस सांगू

आज फादर्स डे ! माझ्या "बापू"सह सर्वाच्या बापाला हार्दिक शुभेच्छा !