Tuesday 12 June 2018

अष्टपैलू गणू (गण्या )---!(सरपंच)

अष्टपैलू गणू (गण्या )---!(सरपंच)

पत्रकारिता शिकण्याचा श्री "गणेशा" स्व वसंतराव काळे महाविद्यालयातून सुरू करतं सकाळ सारख्या दैनिकात दमदार पत्रकारिता करणारा "गण्या"  आजचा पत्रकार गणेश  सावंत (सरपंच )
आमची ओळख कॉलेज मध्ये झाली तसा तो  गावाकडून आलेला आणि मी खेड्यातला लवकर घट्टी जमली . दोघांना शहर ही समस्या काय हे लवकर न उमलणरी  होती. कॉलेज मध्ये जास्त कोणी ओळखीचं नव्हतं.शोधायचं झालं तर गावाकडंच़ कोणी तरी म्हणून गणेश' प्रकाश' ची मैत्री झाली. पण त्यावेळी अनेक शहरातील मुलं मुली कॉलेज ला यायची त्यांच़  राहणीमान गाड़ी वैगेरे वैगेरे  सर्व काही पाहून आम्ही त्यांच्याशी तुलना करण्याच्या भानगडीत पडत नसतं. भांडण वैगेरे पासून दूर असतं.मुली काय पण मुला कडे पहायला पण भीती वाटायची पण त्यावेळी आम्हाला प्रा गणेश सर प्रा बापूसाहेब  सर
व्यंकटेश सर प्रा सानप सर याचं मार्गदर्शन लाभलं.पत्रकारिते चे पाट गिरवताना वक्तृत्व स्पर्धां मध्ये मात्र बाजी मारली.विषयाची मांडली पासून ते स्टेज करेज या सगळ्या गोष्टी कॉलेज मध्ये  या माझ्या दोस्ता चा कोणी हात धरू शकत नव्हतं .धरलातर  फक्त पायच  शिल्लक होते.सुरवातीला बुजरा स्वभाव पण गुरु च्या तालमीत असा पट्टया तयार झाला की  युवक मोह्त्सव असो की कोणती स्पर्धा त्यात नंबर एक च़ बक्षीस "गण्याच़" ठरलेल.आम्ही दोघांनी बऱ्याच वाद विवाद स्पर्धा केल्या.नंतर  अमोल आणि  गणेश स्पर्धेला जायचे त्या यात के एस के  मध्ये तर ठरलेल असायचं पत्रकारितेचे विद्यार्थि आले की बक्षीस घेवून जाणारच़  हा शिक्का होता.याच कालावधी "गणेश" ला विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.मग एन एस एस कँप असो की युथ फेस्टिवल .संस्कृतीक कार्यक्रम सगळ्या मध्ये अग्रेसर राहिला. त्याच वेळी माणूसकी ग्रुप च्या माध्यमातून जेल मध्ये(कारागृह ) अनेक कार्यक्रम घेतले.तसं जेल वर "गण्याच़" जास्तच़ प्रेम असल्यामुळं ते शक्य व्हायचं ! पण तो "कैद"झाला नाही .

 कॉलेज मध्ये तर बरेच वेगवेगळया  प्रकऱणाचा तसा तो साक्षीदार आहे..यात "मध्यस्थ" म्हणून भूमिका महत्वाची ठरली.कॉलेज करतं सकाळ मध्ये पत्रकरिता केली. याच पत्रकारितेचेच्या जोरावर गावांत लोकांची कामे करतं सत्ता मिळवली वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचा सरपंच म्हणून ओळख निर्मान केली.मग सरपंच परिषद पासून ते  सर्व शासकीय आणि राजकीय व्यासपीठावर आवाजाचा दबदबा कायम होताच़ . पाच वर्षात काय कमावलं गमावलं या पेक्षा समाजकारनातून खुप मोठी हुशारी आणि जबाबदारीची समजदारी मिळवली.आजही गावातील  लोक त्याच नाव घेतात. एकाच इनिंग मध्ये बाय बाय करत.पुन्हा सामजिक क्षेत्रात सक्रिय झाला यात  क्रांती मोर्चा पासून ते  माणुसकी ग्रुप या सर्व पातळ्यावर दांडगा जनसंपर्क घेवून आज कार्यारंभ मध्ये पुन्हा  पत्रकारितेचा आरंभ करत बीड च्या पत्रकारिता मध्ये  मध्ये गणेश सावंत (सरपंच ) हे नाव कमावलं आहे.बऱ्याच वेळा एकमेकाच्या  बापाच्या नावांचा उधार करणारे आम्ही एकमेकाचे सल्ले घेतोच. आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वक्तृत्व स्पर्धेतील  शेतकऱ्यांच्या वेदना जागवणारी कथा कायम लक्षात राहते.

सकाळी सकाळी --- वांगे तोंडताना पारुश्या  हातात गूसलेला काटा टच दिशी डोळ्यात पाणी आणतो.मात्र माझं कुटुंब जगवायच़ म्हणून अनेक सलत्या काट्या -हदयात दडपून वांगे बाजारात मांडणाऱ्या माझ्या बापाला जेव्हा गावाकडे जाताना पैसे कमी पडतात तेव्हा त्या सलनाऱ्या काटया पेक्षा जास्त वेदनांच त्यांच्या डोक्यात काहूर माजत कारण बाजार ची वाट पाहणारी मुलं आणि हातातली रिकामी पिशवी.-----! हे दुःख तुम्हांला काय समजणार !  हा सवाल  -हदयाचा ठाव घेणारा असायचा !

गणू आत्ता महापुरुष व्याख्यानातून सांगत आहेत.तर  लेखणीतून  सामान्यचे प्रश्न सोडवत आहेत.तसा माझ्या मित्रा चा पाटील वाडा तयार झाला.फक्त -----_ ची वाट पाहत आहे. त्या वाड्यात चतुर्भज होवून प्रवेश लवकरच होणार असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांकडून समजली. असो.अशा माझ्या मित्राला.यशस्वी माजी सरपंचाला. हुश्शार राजकारन्याला. हरहुन्नरी पत्रकाराला. शब्दप्ररचुर वक्त्याला.पाटलीनीची वाट पाहणाऱ्या पाटलाला अर्थात गणेश सावंत यांना प्रगट दिनाच्या खुप खुप शुभेच्छा ! 

सुरेश जाधव (लक्ष्मणसूत)