Tuesday 13 February 2018

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

नाक कापल तरी ------ शिल्लक आहेच ! कारण गलिच्छ राजकारण

चिंगारी पेटलीय वणवा पेटेल

(वळखण ) मातीतल्या माणसाचा मातीत जाई पर्यंत चा संघर्ष माणुसकी च्या नात्याने समजून घेता येईल का ? अस्मानी सोबत सुलतानी जीवावर उठते तेव्हा वाली कोण हा प्रश्न आजही अधांतरी च आहे. आत्महत्यावर  राजकारण करणारे  सर्वच जण  एका माळेचे मनी आहेत.राजकीय पोळी भाजण्यासाठी सरनाची  होळी  कमी  पडते की काय? याचा विचार  करतात लोकांच्या सेवेची हमी देणारे हमखास धोका देतात याच  उत्तर  70 वर्षाच्या स्वातंत्र्यात मिळाल नाही. जगण्याचा संघर्ष थांबला नाही तिथे आश्वासन देण्यात आणि स्वप्न दाखवण्यात डिजिटल पणा आलाय.खर तर चटणी मीठ  पाण्या सोबत ओली झालेली हक्काची भाकर मिळण्याचे स्वतंत्र जरी देवू शकलात तरी महापुरुषाचे लोकशाही चे स्वप्न पूर्ण होइल.अन्यथा इथली संवेदना विरहात स्वार्थी लबाड मंडळी लोकशाही चे कधी न सरनारे  ग्रहणच म्हणाव लागेल

---- लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगा! विकास होईल ही भोळी अशा घेवून जगणारा मतदार तरी कुठे राहिला आहे ,आणि अजेन्डा घेवून वागणारा उमेदवार तरि कुठं राहिला ,कारण !सत्ता आणि पद हे जर लोकशाही चे भ्रष्टाचार पोसनारे कुरन असेल तर ,सामान्य मतदार त्याचा हक्क बजावत नाही तर ,या कुरणाला कुंपण लावत आहेत ,समिकरण ठरलय ,राजकारणात भांडवल गुंतवताना किती पट परत येईल याच गणित मांडलेल असत ,किती उल्लू बनवता राव ,एका रस्त्याला 10 नावं ,गावातल्या पाण्यात पाप ,आणि लोकांच्या अन्नात माती कालवणाऱ्या लोकां नि जणांची नाही तर मनाची तरि बाळगायला पहिजे . ज्याच्या बूढ़ा खाली सायकल नव्हती तो आज जनतेच्य छतडावर  एसी च्य गाड्या घेवून फिरवतो.हे कस शक्य होत ,गोर् गरीब लोकांच्या मुलाच्या खाऊ मध्ये डोकावनारे ,खाऊ राजकारनात आल्याने कुठली लोकशाही सम्रध होणार हा खरा प्रश्न आहे  बहिणी बाळी च्या कुंकवाला दारूचे व्यसन लावून समाज भूषण म्हणून मिरवणाऱ्या षंड आणि स्वःतला गुंड म्हणवून घेणार्या लोकांनी समाजाची इज्जत वेशिला टांगली आहे !

आर ! बस करा या तमास गिराचा कलुशित गैर व्यवहार ,नीति आणि मती गुंग झाल्या नंतर राजनीति च्या नादी लागलेल्या माकडा गत अवस्था आज यांची झालीय , लोकांची ----पुसण्या पर्यंत पुंड पुंड करणार्या आवलादी ची कमी आज  राजकारणात  नाही .

    त्यांच ही एक परती खर लोक घड़ी चा विचार करतेत तिथं पीढ़ी चं त्यांना काय देन घेण !पण आयुष्य बर्बाद करून मताचा घोळ आणखी कळून घेवु शकले नाहित तर भोगा आपल्या कर्मची फळ ! सुविधाच्या नावान असुविधा निर्माण करून समाजाला उध्वस्त करणारी लोक संधी साधु टपुन आहेत !
       लोक प्रतिनिधी म्हणून छक्के पंजे करण्या पेक्षा हे काय करतात . गाव आणि स्वःताची मानस ज्यालोकाना फक्त नावं वापरण्यासाठी लागतात त्या ठीकाणी राक्षसी वर्त्ती बळावलेली असतें ! कधी कधी नाक कापल तरी भोक शिल्लक आहे अस म्हणणारे काहि कमी नाहित ,आन ,भाका घेवून आणि पदरात घ्या म्हणणारे आणि  ,लोकमातेच्या पदराला भोक पाडून मातेचा पदर फाडनारे आज ही औसा पुणवेला उगवत असतात.अरे हलकटा नो कुठंल्या तोंडाने मत मागता !लाज वाटू द्या .स्वतःच्या स्वार्थ ची झोली भरण्यासाठी बंगल्यावर बंगले बंधून ,भूत पैदा करण्यासाठी आणि पोसण्य साठी  हे जर करत असाल तर याद राखा , तर छी थूक आहे तुमच्या जिन्याची ,दाडा आणि झेंडा कोणता यापेक्षा कोणत्या लोकांच्या समस्या सोडवूं शकतो याच चित्र माँडा म्हणावं ,काय लागत ओ सामान्य लोकांना ,कोणत्या?गरजा आहेत त्यांच्या जरा समजून घ्या !नुसते जाहिर नामे आणि प्रचार सभा घेवून लाखो रुपयाच्या उधळण करून मिळवलेला विजय आणि त्यानंतर निर्माण झालले प्रश्न हे वर्षानूः वर्ष तसेच आहेत !उन्माद आणि माजोरी पणा आता सोडून द्या ,तुम्हि मेंबर नंतर आहत आधी गावात माणूस आहत याच भान विसरून कस चालेल!बर् लोकशाही मध्ये पद आणि अधिकार काय कुणाच्या बापाची जहागिरी थोडीच आहे ! जे जमत नाही तें पुन्हा करण्याचा प्रयत्न का करता ! आत्ता तू नाही तर तुझा बाप दुसरा अस म्हणून धडा शिकवणे गरजेचं आहे!

शेवटी माझ पोरगं कुटं शिकल ,पहिजे पोरगीने काय केल पाहिजे घर कस असल पहिजे !दार कुटं  हे जस ठरवता ना .मग! विवेक जागा असेल तर माझा समाज कसा आहे ,कदाचित तो मझ्या आयुष्याशी तितकासा महत्वाचे नसेलही पण परिणाम करणारा तर नक्की आहे ! या कडे मी डोळस पणे लक्ष दिल पहिजे !पाच वर्षा साठी आपल प्रतिनिधीत्व आपन मत देवून बहाल करणार आहोत !फक्त नंतर लाज वाटू देवू नका आत्ता वेळ आहे , पुन्हा ------:----- म्हणण्याची वेळ येवू नये !

 इतिहास बदलायला मशाल गरजेची असते आज बेरोजगार आणि बेकार  युवक एकत्र  होवून  संघर्ष  करत आहेत.इथल्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत ला प्रश्न  विचारत  आहेत  याला दुर्लक्ष करून चालणार नाही शेवटी. चिंनगारी  छोटी असली तरी  वणवा पेटवायला कारणीभूत  असेते !


सुरेश जाधव